Pages

Friday, June 3, 2016

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

एखाद्या शाळेत तुम्ही गेलात, तिथे सर्वत्र शांतता असेल, सगळे विद्यार्थी ठोकळ्यांसारखे एका जागी बसले असतील आणि फक्त शिक्षक एकासुरात शिकवत असतील, एकंदरीतच वातावरणात काहीसे औदासिन्य असेल तर अशी
शाळा तुम्हाला आवडेल का ? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल.

शाळा म्हणजे कसं प्रसन्न वातावरण, हसती खेळती मुले आणि त्यांचा सहभाग घेऊन शिकवणारे शिक्षक असावेत असं अपेक्षित आहे. मात्र सद्यस्थितीत भारतातील अनेक शाळांमध्ये हे वातावरण आढळून येत नाही हे वास्तव आहे.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी मुळात शाळेत विद्यार्थ्यांकरीता पोषक प्रसन्न वातावरण असले पाहिजे. तसेच कल्पकतेने विचार करण्याकरीता विद्यार्थ्यांना वेळोवेळी
उद्युक्त करण्याचे महत्वाचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. मग विद्यार्थ्यांनाकल्पक विचार करण्याची सवय लागावी यासाठी शिक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल असे मला येथे सांगावेसे वाटते.

ही विशेष मेहेनत म्हणजे वेळोवेळी स्वतःची कल्पकता वापरणे त्याचबरोबर विविध साधनांचा वापर करणे. तसेच उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कल्पक दृष्टीकोन विकसित करता येऊ शकतो. त्यासाठी
भरपूर पैसे, महागडे इन्फ्रास्ट्रक्चर यांची अजिबातच गरज नाही.

प्रत्येक शिक्षकाला काही नवीन उपक्रम राबवायचा म्हणजे वर्गातला गोंधळ वाढणार ही सर्वात मोठी भीती वाटते. यावर महत्वाचा उपाय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त रूजवणे हाच होय. किंबहुना हीच कल्पनाशक्तीला चालना देण्याची पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. समजा गणित हा विषय मैदानात शिकायचा असं ठरवलं तर मुलांनी रांगेत जावं, शांततेत जावं आणि त्याकरीता जो लीडर असेल त्याचं ऐकणं हे नियम स्वतः मुलांनी बनवले तर त्यांचा सहभाग अधिक वाढतो. यामुळे आपोआपच त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढीस लागते. ही जाणीव वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.माझा सहभाग महत्वाचा आहे हे मुलांना वाटल्यानंतरच ही जाणीव रूजते.कल्पकतेकडे नेणारी ही दुसरी पायरी. त्यानंतर शिक्षकांनी विविध साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. त्यासाठी सहज उपलब्ध असलेली साधऩे वापरणे अधिक श्रेयस्कर. उदाहरणार्थ पाने, फुले, दगड, माती, पाने, फुले वगैरे.
याखेरीज तक्ते, कोडी अशाप्रकारच्या विविध बाबींचा अवलंब करण्यात येऊ शकतो. तसेच एकाचवेळी अनेक उपक्रम राबवण्यापेक्षा एकच उपक्रम राबवा त्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी मुलांना पूर्वतयारी करण्याचा वेळ द्या. उपक्रम
कोणता राबवायचा, साहित्य काय निवडायचं हे विद्यार्थ्यांचा कल ओळखून ठरवा. उदा. गणित विषय शिकवताना विद्यार्थ्यांचे गट करणे, खेळाच्या माध्यमातून सम विषम संख्या शिकवणे ई.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे उदाहरण येथे घेता येईल. ते जेव्हा टस्कगीच्या शाळेत गेले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ मायक्रोस्कोप हे एकमेव साधन होते. त्यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हती. मग त्यांनी मुलांना घेऊन कच-यातून साधनं गोळा केली. जसे पत्र्याला भोकं पाडून चाळणी तयार केली, काचेला काजळी लावून त्याद्वारे फोकस्ड बीम तयार केला आणि असं करत करत प्रयोगशाळा उभारली.

शिक्षकांनी स्वतःच्या वागण्यात कल्पक दृष्टीकोन बाळगला, स्वतःची कल्पकता वापरून ज्ञानदान केले तर त्यांच्याकडून मुलांना प्रेरणा मिळेल आणि कल्पकतेने विचार करण्याची सवयच लागेल. मात्र त्यासाठी शिक्षकांना थोडसं धैर्य दाखवावं लागेल. इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं लागेल.

कल्पकता हा एक गुणांचा समूहच आहे. धैर्य, वेगळा विचार करण्याची क्षमता, तो मांडता येण्याची क्षमता, इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, आत्मविश्वास असे अनेक गुण या एका माध्यमातून वाढवता येतात. मात्र त्यासाठी सातत्य व
मेहनतीची जोड देणे अत्यावश्यक आहे.

Shirin Kulkarni
Director
Council for Creative Education - CCE Finland Oy

शिक्षणात कल्पकतेचा वापर

शिक्षणात कल्पकतेचा वापर

आजची शिक्षणपद्धती ही केवळ परीक्षा केंद्रीत आहे हे सर्वमान्य आहे. ही शिक्षणपद्धती बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणावर विचारमंथनदेखील होत आहे.मात्र सद्यस्थितीतील शिक्षणपद्धती अशीच का याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जगाच्या इतिहासात डोकवावे लागेल.
1930 सालच्या जागतिक मंदीनंतर ज्या शाळा सुरू झाल्या त्यांची पद्धत कारखान्यांसारखी होती. कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने काम चालते त्याचपद्धतीने शाळांचे कामकाज चालू लागले. कामगारांच्या शिफ्टस्प्रमाणे विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या वेळा, परीक्षापद्धतीचे प्रमाणीकरण अशा अनेक बाबींचे उदाहरण याबाबत घेता येईल. शाळांधील उत्पादन म्हणजे विद्यार्थी. मग हे उत्पादन चांगले, दर्जेदार असावे याकरीता शाळांकडून एकाच पद्धतीने विचार
करण्यात आला व त्यासाठी सर्व शाळांमध्ये एकच पद्धती अवलंबण्यात आली.

खरे पहाता विद्यार्थी म्हणजे कोणी उत्पादन नव्हे. त्यामुळे त्यांना जोखण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी त्यांच्या कलाने त्यांना वाढवणे महत्वाचे. परंतु शाळांमधून हा मूळ विचारच नाहीसा झाला. विद्यार्थी परीक्षार्थी बनले. गुण मिळवण्यासाठी शिक्षण असेच समीकरण झाले. त्याचबरोबर शिक्षण पद्धतीद्वारे कारखान्यांना उपयुक्त ठरेल असे उत्पादन निर्माण करण्याकडे कल वाढला.त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला कारखान्यामध्ये उपयुक्त ठरतील अशी कौशल्ये शिकवण्याकडेच शिक्षणपद्धतीचा ओघ वाढला. तत्कालिन परिस्थिती पहाता त्यावेळी तशा पद्धतीचे शिक्षण योग्यच होते. मात्र तशी शिक्षणपद्धती आजच्या काळाला अनुरूप मात्र नाही हे तितकेच खरे आहे.

बाजारपेठेत झालेले मूलभूत बदल हे शिक्षणपद्धती घडवण्यास कारणीभूत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आजच्या बाजारपेठा बघता नावीन्य आणि कल्पकता या बाबींना अत्यंत महत्व आले आहे. म्हणूनच शिक्षणातील कल्पकतेचा वापर वाढवणे हे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे. विद्यार्थ्यांमध्ये कल्पक दृष्टीकोन विकसित होण्याकरीता शाळा व शिक्षकांबरोबरच पालक देखील तितकेच जबाबदार ठरतात.

आपल्या पाल्याला वाढवताना पालकांनी विशेषत्वाने त्यास कल्पक दृष्टीकोन दिला पाहिजे. किंबहुना त्यास तशी सवयच लावली पाहिजे. याचे कारण विद्यार्थी हे काही कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन नव्हेत. तुमचा पाल्य ही व्यक्ती आहे. त्यामुळेच त्यास भावभावना, विचारक्षमतादेखील आहे. वेगळ्या विचारानी जगण्याकरीता, समाजात काही भरीव कामगिरी करण्याकरीता परंपरेपेक्षा वेगळा विचार करण्याची गरज असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला कल्पक
दृष्टीकोनाची देणगी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्याकडे मात्र अनेक पालक व शाळा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावण्याबाबत काहीसे उदास दिसतात. आपल्या व्यस्त दिनक्रमातून मुलांची जडणघडण नेटकी व्हावी याकरीता ती जबाबदारी पालक
शाळेवर ढकलतात याउलट शाळांवर विशिष्ट शिक्षणपद्धती राबवण्याची सक्ती असल्याने शाळा देखील विद्यार्थ्यांना घडवण्यात अयशस्वी ठरतात. वर्गातील चुणचुणीत मुले कायम सर्व ठिकाणी चमकतात त्यामुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. खरंतर शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याकरीता ज्या विद्यार्थ्याला शिक्षणात ज्या बाबीमध्ये अडचण येते त्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसते.

फिनलंडमधील शिक्षणपद्धतीचे उदाहरण येथे मला द्यावेसे वाटते. येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.शाळेतील विद्यार्थ्याला येणारी अडचण सोडवणे, जे कौशल्य येत नसेल त्यावर
अधिक भर दिला जातो आणि विशेष म्हणजे याकरीता शिक्षक देखील अधिक वेळ खर्ची घालण्यास तयार असतात. आपल्याकडे देखील असे शिक्षक आहेत मात्र दुर्दैवाने त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

कल्पकतेचा शिक्षण पद्धतीत वापर करण्यासाठी पालक व शिक्षकांचा अधिक व नेमका सहभाग अपेक्षित आहे याबाबतचे विवेचन पुढील लेखात ..

शिरीन कुलकर्णी
संचालक,काऊन्सिल फॉर क्रीएटीव्ह एज्युकेशन, सीसीई फिनलंड

कल्पकतेचे मूल्यमापन

मागील लेखापासून आपण कल्पकतेचे मूल्यमापन या गोष्टीवर चर्चा करतो आहोत. ई. पी. टोरांस यांच्या समकालीन अनेक संशोधकांनी कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. जसे कि जे. पी. गिल्फ़ोर्ड , त्यांनी विशेषत: Divergent थिंकिंग या पैलूवर संशोधन करून त्यांची चाचणी विकसित केली. त्यानंतर चीकचेन्क्मिहाली या संशोधकाने एखादी निर्मिती हि त्या क्षेत्रातले तज्ञ कशाप्रकारे स्वीकारतात यावरून ती निर्मिती खरच सृजनशीलतेचा नमुना आहे कि नाही हे ठरवण्याची पद्धत विकसित केली. ही पद्धत फारच संकुचित आणि एकांगी असल्याचं संशोधकांना वाटलं.

या सगळ्या संशोधकांनी विशेषत: व्यक्तिगत कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. एखाद्या निर्मितीचा समाजात कसा स्वीकार होतो यावरून त्या कलाकाराची कल्पकता मोजण्याचे पण प्रयत्न केले पण कल्पकता केवळ याच परीघांमध्ये राहून मोजता येईल का? त्यातून सध्याच्या कालानुरूप कल्पकतेची व्याख्या आणि तिचे मोजमाप करत येईल का?

या प्रश्नान वर जर विचार करू या. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात कल्पकतेचं  मूल्य खूपच वाढलं आहे. दर दिवशी नव्या योजना, नवीन उत्पादने बाजारात येत आहेत. सगळी अर्थव्यवस्था कोण किती कमीतकमी वेळात पुढचं  चांगलं  उत्पादन बाजारात आणु शकतय  आणि विकू शकतय यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत फक्त एक माणूस स्वत:पुरता कल्पक असून चालेल का? तर नाही, त्याला इतरांबरोबर काम करतानाही कल्पक राहावं  लागेल आणि एक संघ म्हणून कल्पक असावं लागेल.

याच संकल्पनेला अनुसरून सध्या फिनलंडमध्ये एक चाचणी विकसित करण्यात आली आहे. त्या चाचणीचं नाव आहे Know Your Creativity Index (KYCI)! या चाचणीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमची वैयक्तिक कल्पकता तर मोजली जातेच पण तुम्ही इतरांबरोबर काम करत असतांना ती कल्पकता कशी वापरता हेही समजतं. जरा उदाहरण घेऊन समजावून घेऊ या. अमित नावाचा एक चुणचुणीत मुलगा आहे. तो पटापट गोष्टी करून टाकतो. त्याला फारसं एका जागी बसवत नाही. शाळेत गुण वर खाली होत असतात कारण अभ्यासात सातत्य नाही. मित्र मात्र भरपूर आहेत. आता या सगळ्यावरून सामान्यपणे आपण काय अंदाज बांधू? एक म्हणजे हा मुलगा जरा  उनाड दिसतोय. त्याला नुसतीच मजा करायला आवडते. अभ्यासाची आवड नाहीये मग बहुधा कल्पकता पण फार असेल असं वाटत नाही. हे झालं आपल सर्व सामान्य मत.

आता या मुलाची KYCI चाचणी कशाप्रकारे घेतली जाईल ते बघू या. या चाचणीचे दोन भाग आहेत. एक भाग आहे पेपर सोडवण्याचा. यामध्ये अमितला एक पेपर दिला जाईल कि ज्यामध्ये त्याला काही चित्रं काढायची असतील. त्या साठीच्या सूचना त्याला वेळोवेळी दिल्या जातील. हि सगळी चित्रं काढण्यासाठी त्याला एकूण ४५ मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर त्याच्या सारखाच पेपर सोडवलेल्या इतर चार मुलांबरोबर त्याचा एक संघ बनवला जाईल. या संघाला एकत्रितरीत्या करण्यासाठी काही काम दिलं जाईल. हा संघ हे काम जेव्हा करत असेल त्यावेळी एक निरीक्षक तिथे उपस्थित राहून नोंदी घेत असेल. या मध्ये कोण कशाप्रकारे काम करतय? त्यात नेतृत्व कुणाकडे आहे? कोण निर्णय घेतय असे अनेक पैलू बघितले जातात. हा कालावधी साधारणपणे ९० मिनिटांचा असतो. एकुण या चाचणीचा कालवधी जास्तीत जास्त अडीच तास असतो.

चाचणी झाली कि ३-४ आठवड्यात रिपोर्ट दिला जातो. या ३-४ पानी रिपोर्टमध्ये अमितची कल्पकता कशी आहे ते सांगितलं  जातं. कल्पकता मोजण्याचे जे मापदंड आहेत जसे कि एखादी गोष्ट बघून किती कल्पना सुचतात, त्यात किती कल्पना पूर्णत: नवीन आहेत? एखाद्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्याची क्षमता आहे कि नाही, याबद्दल माहिती दिली जाते. त्यावरून त्याची वैयक्तिक कल्पकता कशी आहे ते कळते. याच रिपोर्ट मध्ये त्याची संघात काम करण्याची क्षमता कशी आहे हेहि सांगितलं जातं. तो इतरांबरोबर काम कसं करतो? त्याला ते आवडतं का? जमतं का? काही सुधारणा करण्याची गरज आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात दिली जातात.
रिपोर्ट तयार होत आला कि एकदा पालकांशी चर्चा करून त्याबद्दलची काही इतर समस्या किंवा पार्श्वभूमी जाणून घेतली जाते जेणेकरुन त्या समस्यांची उत्तरेही रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतील. यामुळे त्या मुलाची कल्पकता तर समजतेच पण ती कशामुळे तशी आहे हे लक्षात घेतल्याने त्याबद्दलच्या काही उपाय योजनाही सुचवल्या जातात.

आता हि चाचणी नक्की कशी असते हे तर आपल्याला समजलं. अमितची चाचणी घेतली गेली त्याचा रिपोर्ट पुढच्या लेखात वाचू या. निकालाची उत्सुकता थोडी ताणायला नको का?

शिरीन कुलकर्णी
सीसीई फिनलंड
 shirin.kulkarni@ccefinland.org

ज्ञानरचनावाद

रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं!
- रमेश पानसे

रविवार, 22 मे 2016

Share Link:
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N769KN
Tags: saptarang, ramesh panse

*जिल्हा परिषदांच्या शाळांमधून रचनावादी शिक्षणपद्धती आता मूळ धरू लागली आहे. क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपात बदल, मूल्यवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी आदींच्या माध्यमातून ती रुजत आहे. मूल्यवर्धनाचे कार्यक्रम शाळांमधून राबवणं हे या शिक्षणपद्धतीमधलं पुढचं पाऊल म्हणता येईल. महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या काही शाळांमधून पुढच्या महिन्यापासून (जून २०१६) मूल्यवर्धनाचे कार्यक्रम पथदर्शी स्वरूपात सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या रचनावादी शिक्षणपद्धतीविषयी...*



मध्यंतरी माझ्याकडं एका शहरातले एका क्‍लबचे प्रमुख भेटायला आले. मागं पडलेल्या शाळांमधल्या काही निवडक शिक्षकांसाठी त्यांना प्रशिक्षण घ्यायचं होतं. तसं ते ठरवून आले होते. ते म्हणाले ः ‘‘मी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून, त्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावणार आहे’’ नकारार्थी मान हलवली. मी त्यांना सुचवलं ः *‘‘मागं पडलेल्या शाळांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण द्यायचं असेल, तर तुम्ही तथाकथित मान्यवर मराठी शाळा आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा निवडा. सध्याच्या परिस्थितीत त्याच ‘मागासलेल्या’ शाळा आहेत, असा माझा कयास आहे.’’*

आज बहुतांश खासगी मराठी शाळांतून आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांतून, ६० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आणि त्याहीपूर्वी ६० वर्षं जन्माला आलेली, तत्कालीन मानसशास्त्राचा बळकट पाया असलेली वर्तनवादी विचारसरणी अजूनही त्यांच्या व्यवहारात टिकून आहे. पठडीबद्ध, बंदिस्त आणि थोड्यांना यश देऊन, अनेक मुलांना वेगवेगळ्या स्तरांवरचे अपयशी ठरवणारी अशी ही जीवनपद्धती अजूनही अवलंबली जात आहे. या पद्धतीची भलामण करणारे लोक आज जगभरातच फारसे उरलेले नाहीत. फक्त, जुना चर्मरोग जसा खूप काळ टिकतो, तशी ही पद्धती काही शाळांतून टिकून आहे. काही लोक ती अट्टहासानं, तर काही लोक, शालेय शिक्षक व व्यवस्थापन यांच्या सोईसाठी, तर अन्य काही लोक आर्थिक स्वार्थापोटी या जुन्या पद्धतीलाच चिकटून आहेत. त्यामुळं साहजिकच अशा शाळा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात कमी पडत आहेत.

या खासगी शाळांच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शेकडो शाळा आपापल्या विद्यार्थ्यांना शिकतं करण्यात आणि आनंदी करण्यात उठून दिसत आहेत.
मी अलीकडं जिल्हा परिषदांच्या शाळांच्या संपर्कात असतो; त्यांच्या शिक्षकांशी बोलतो, त्यांचे वर्ग व विद्यार्थी न्याहाळतो. माझ्या असं लक्षात आलं आहे, की जिल्हा परिषदांचे बरेचसे शिक्षक आणि शिक्षिका, स्वयंप्ररणेनं, प्रत्यक्ष वर्गांमधल्या शिकण्या-शिकवण्याच्या व्यवहारात खूप मोठे, उपयुक्त असे बदल करत आहेत. त्यात त्यांची मानसिक गुंतवणूक मला दिसतं आहे. शिक्षणाच्या वाढत्या गुणवत्तेत त्यांच्याकडून होणारं वर्धितमूल्याचं (व्हॅल्यू ॲडिशन) प्रमाण आहे, हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल. ‘महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे,’ असं ठाम विधान आजच्या घडीला मी स्पष्टपणे करू शकतो.

शिक्षण हक्क कायद्याच्या (२००९) पाचव्या प्रकरणातल्या २९ व्या कलमात म्हटलं आहे ः ‘‘जर विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा रीतीनं वर्गांमधल्या अनुभवांची मांडणी व्हायची असेल तर, शालेय व्यवस्थेत अंगभूत स्वरूपाचे मोठे बदल करावे लागतील.’’
इथं म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात असे बदल होऊ लागले आहेत असं मला वाटतं.
या बदलांचा थोडासा आढावा घेता येईल.
शालेय शिक्षणात, रचनावाद तीन स्तरांवर दृष्टीस पडतो.
एक ः वर्गाच्या, शाळेच्या रचनेत
दोन ः वर्गातल्या शिक्षणप्रक्रियेत
तीन ः शिक्षक-शिक्षिकांच्या मनात
वरील तीनपैकी पहिल्या स्तरावरच्या, म्हणजे शालेय वर्गातल्या-शाळेतल्या रचनेत किंवा व्यवस्थेत, रचनावाद बऱ्यापैकी पसरलेला आहे, असं आज आढळून येतं. अनेक शाळांनी जमिनी हा एरवी शिक्षणप्रक्रियेत न वापरलेला घटक वापरायला सुरवात केली आहे. कित्येकांनी जमिनी शैक्षणिक अंगानं रंगवल्या आहेत. काही खेळ, काही उपक्रम या जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना आकर्षित करू पाहत आहेत. जे काही रंगवलेले आहे, ते छान दिसत आहे; त्यामुळं शाळेत काही बदल होत आहे, हे शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना-गावकऱ्यांना सहजपणे कळतं. सुरवात म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे.

शाळांच्या भिंतींवर मात्र वर्तनवादी आणि रचनावादी अशा दोन्ही विचारांना स्थान दिलेलं दिसतं. अनेक तक्ते, सुविचार, माहिती, शासकीय सूचना अशा गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात. हा बदलाचा सुरवातीचा काळ म्हणून मानता येईल. भिंतीच्या वापराबद्दल फारसा सयुक्तिक विचार मात्र होत नाही, असं जाणवतं. रचनावादी शिक्षणात जमिनींवर, भिंतींवर कोणत्याही गोष्टी कायमस्वरूपी असू नयेत, असा संकेत आहे. काही गोष्टी रोज किंवा आठवड्याला बदलतील आणि काही गोष्टी महिना-दोन महिन्यांनी. शाळांच्या भिंतींवर बरेचसे फोटो टांगलेले असतात, त्यातले शक्‍य तेवढे काढून टाकले, तर मुलांना अशा जागा त्यांच्या अभिव्यक्तीसाठी उपलब्ध होतील. (शाळेत केवळ शिक्षणतज्ज्ञांचे फोटो - भारतीय आणि पाश्‍चात्य - का लावले जात नाहीत?) इयत्तांनुसार भिंतींवरच्या जागांची वाटणी अर्थातच करता येईल. भिंतींवर काय नसावं, याचबरोबर काय असावं, हे महत्त्वाचं आहे. यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे, भिंती हा वर्गवातावरणाचा भाग आहे. त्यामुळं वर्गाच्या शैक्षणिक वातावरणात भिंतींना सामावून घेणं इष्ट ठरतं; तसंच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी भिंत ही एक सोईस्कर जागा असते आणि भिंतींवरचं आपल्या कामाचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणारं असतं.

बाकं हटवून जमिनीवर बसण्याची पद्धत
शासकीय प्राथमिक शाळांमध्ये आणखी एक होत असलेला बदल ठळकपणे लक्षात येत आहे, तो म्हणजे वर्गातल्या बाकांना रजा देऊन मुलांना छोट्या गटांत बसवायला अनेक ठिकाणी सुरवात झाली आहे. कित्येक ठिकाणी, वर्गातून बाकं हलवण्यात काही अडचणी आहेत; पण तिथंसुद्धा बाकं भिंतींशी लावून मध्यभागी मुलांना जमिनीवर बसण्यासाठी जागा मोकळी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी जमिनीवर छोट्या गटांत बसण्याची पद्धत आता रुळायला लागलेली दिसते. तरीसुद्धा शिक्षकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी आहे व ती म्हणजे, गट हे त्या त्या वेळच्या अध्ययनाच्या हेतूंनुसार असावे लागतात. गट हे अनेक कारणांनी बदलतही जातात आणि मुख्य म्हणजे गट हे सहकारी शिक्षणाला पायाभूत असल्यामुळं सहकारी शिक्षणातल्या तत्त्वांचीही झालर त्यांना असावी लागते. या दिशेनं शिक्षक-शिक्षकांनी अधिक माहिती घेणं उपयोगाचं ठरेल.

शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग
चौथा महत्त्वाचा आणि सगळीकडं सर्रास आढणारा बदल म्हणजे, आता शाळांतून शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. काही साधनं शासनानं पुरवलेली, काही साधनं शाळांनी विकत घेतलेली, तर काही शिक्षकांनी स्वतः केलेली आहेत. बऱ्याचदा ही साधनं, अन्य ठिकाणी पाहून तशी तयार करून वापरली जात आहेत, तर काही साधनं शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून नव्यानं निर्माण केलेली आहेत. उत्साहानं साधने निर्माण होणं वेगळं आणि त्यांच्या निर्मितीमागं काही शास्त्रीय दृष्टिकोन असणं वेगळं. जे साधन आपण वर्गात मुलांसाठी वापरू इच्छितो, त्याचं स्वरूप मुलांना हाताळण्यास सोईचं, सुरक्षित आणि मुलांना आवडेल असं तर असायलाच हवं; पण तेवढंच पुरेसं नाही. शैक्षणिक साधनांची शास्त्रीयता ही त्यांच्या हेतुपूर्ण वापरात आणि हेतुपूर्ण विद्यार्थि-प्रतिसादात असते. साधनाकरवी जे घडवायचं, ते नेमकं व स्पष्ट असलं पाहिजे आणि तसं त्यातून अंतिमतः घडलंही पाहिजे. साधनांबाबत काळजी घ्यायला हवी ती अशी, की साधन हे केवळ आपल्याला काय वाटतं यावर किंवा इतरांच्या ऐकीव अनुभवांवर बेतलेलं असून चालणार नाही. त्यामागचा दृष्टिकोन अशास्त्रीय तर नाही ना, याची शहानिशा होणं आवश्‍यक आहे. साधनं वयानुरूप, शिकण्याच्या घटकांनुरूप, तसंच ती विद्यार्थ्यांना आव्हानरूप वाटतील अशी अर्थातच असायला हवीत. साधननिर्मिती आणि साधनांचा वापर याबद्दल शिक्षकांचंही सातत्यपूर्ण प्रशिक्षण व्हायला हवं. राज्यस्तरावर नवनवीन साधनांची सूची सतत तयार होत जाऊन ती सर्वांना उपलब्ध होत गेली पाहिजे.

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतून, शालेय रचनेत होत असलेल्या बदलांचं समाधान देणारं स्वरूप आणि त्याविषयी घ्यायची काही शास्त्रस्वरूपी काळजी इथं व्यक्त केल्यानंतर आजच्या बदलाच्या या पायरीवरून आता अधिक वरच्या पातळीवर जाणं गरजेचं आहे.

शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेवर आता लक्ष हवं
आता वर्गातल्या शिकविण्या-शिकण्याच्या प्रत्यक्ष चालणाऱ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करायला हवं. रचनावादातल्या या शिक्षणप्रक्रिया प्रामुख्यानं गेल्या ५०-६०- वर्षांतल्या, विविध शास्त्रांमधल्या सिद्धान्तांमधून उगम पावलेल्या आहेत. नेहमीच शिक्षणपद्धतींचा फार मोठा संबंध त्यामध्ये असणाऱ्या सैद्धान्तिक विश्‍वाशी असतो. १९५० च्या दशकापर्यंत वर्तनवादी सैद्धान्तिक विचारसरणी आणि स्किनर यांच्या स्वेच्छाप्रतिक्रियेच्या (ऑपरंट कंडिशनिंग) तत्त्वाची चलती होती. म्हणजे असं, की तत्कालीन सारा शिक्षणव्यवहार या अशा तत्त्वांना मध्यवर्ती ठेवून बेतला जात असे. तीच विचारसरणी अनेक शाळांतून आजही ठळकपणे अस्तित्वात असलेली दिसून येते. ती बदलणं हेच तर खरं आजच्या शिक्षणक्षेत्रासमोरचं आव्हान आहे. पियाजे यांचं १९६० पूर्वीचं संशोधन व बौद्धिक विकासाच्या पायऱ्यांचं सिद्धान्तन (थिअरी), त्यावर व अन्य शास्त्रीय संशोधनावर आधारलेलं १९६० च्या दशकातलं आकलनशास्त्र, वायगोटस्की यांच्या समाजसाह्याचा विचार, त्यानंतरच्या काळातल्या ब्रुनर यांच्या आकलनविषयक विकासाचा सैद्धान्तिक विचार, १९७० च्या दशकापासून वेग आलेली मेंदूविषयक संशोधनाची मांदियाळी, १९८० च्या दशकांतला रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्यापनविषयक सिद्धान्त व त्यांचे शिकण्याविषयीचे निष्कर्ष, मेल लेवाईन यांचा चेताविषयक रचनांचा विचार या आणि अशा अनेकांच्या सैद्धान्तिक विचारांनी अध्यापन आणि अध्ययन या वर्गशिक्षणातला मध्यवर्ती संकल्पनांचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आहे. त्यांना नेमकेपणा देऊन शिक्षणव्यवहारांच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. गेल्या शतकभरात सारा शिक्षणव्यवहार वर्तनवादाकडून आकलनवादाकडं आणि तिथून तो ज्ञानरचनावादाकडं वळला आहे.

बदलांमागचं तत्त्वज्ञान आत्मसात व्हायला हवं
महाराष्ट्रातल्या शासकीय शिक्षणातल्या बदलांमागचं हे तत्त्वज्ञान, सिद्धान्तन आणि दृष्टिकोन हा शिक्षकवर्ग व अधिकारीवर्ग यांना पुरेसा आत्मसात होण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या हातून घडणाऱ्या शिक्षणप्रक्रियांना शास्त्रीय रूप मिळणे दुरापास्त होईल. आणखी एक गोष्ट अशी, की शिक्षकांनी सैद्धान्तिक विचार आत्मसात करून त्यांची दैनंदिन शिक्षणव्यवहारांशी सांगड घालत गेल्याशिवाय सिद्धान्तन (थिअरी) आणि व्यवहार (प्रॅक्‍टिस) यात आज असलेलं फार मोठे अंतर भरून निघणार नाही आणि अर्थातच शिक्षणात अपेक्षित असलेली उच्च प्रतीची गुणवत्ताही साध्य होणार नाही.

आजवरच्या पठडीबद्ध शिक्षणकेंद्री शिक्षणात सर्वात मोठी उणीव होती ती म्हणजे, शिक्षकांच्या जबाबदारीबाबतची. आजवर शिक्षकांवर केवळ विषय शिकवण्याचीच जबाबदारी होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिकणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी मानली गेली होती. वास्तविक, शाळा ही शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असते. शिक्षकांची नेमणूक व त्यांना दिले जाणारे पगारही विद्यार्थी शिकावेत म्हणूनच दिले जातात. अशा वेळी त्यांनी करायचं काम हे आपसूकच विद्यार्थ्यांच्या शिकण्याशी जोडलं जातं. शालेय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचं शिकणं महत्त्वाचं असतं आणि ते नीटपणे व सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल हे पाहण्याची, ते घडवून आणण्याची अंतिम जबाबदारी शिक्षकांचीच असते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत असं काही घडवून आणतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार-अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची असते. या अंगाने या संबंधित मंडळींचं प्रशिक्षण होत राहिलं पाहिजे. वर्गांतल्या शिक्षणप्रक्रिया शास्त्रीय आहेत की नाही आणि विद्यार्थी शिकत जात आहेत की नाही, याची तपासणी तपासनीसांनी प्रामुख्यानं करायची आहे. रचनावादी शिक्षणपद्धतीत हे सोपंही आहे. वर्गात विषयांमधले घटक रचनात्मक पद्धतीनं विद्यार्थ्यांपुढं येत आहेत की नाही आणि सर्व विद्यार्थी एकाग्रतेनं, आनंदानं त्यात भाग घेत आहेत की नाही, हे तरी सुरवातीला पाहणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ ः कुणी पाहुणे, अधिकारी वर्गात शिरले तर त्यांना मुलं शिकण्यात रमली आहेत, एकाग्र झाली आहेत, परस्परांशी त्यांचा शैक्षणिक विचारविनिमय चालला आहे, असं दृश्‍य दिसलं पाहिजे. आत्ताच्या सारखं कुणीही, केव्हाही वर्गात शिरो, मुलं उठून ‘गुड मॉर्निंग...’ म्हणतात, त्यांच्या स्वतःच्या कामाचा त्यात अनाठायी वेळ जातो आणि एकाग्रताही भंगते. त्यामुळं अशा औपचारिकता पाळल्या जाणार नाहीत, याची दक्षता शिक्षक, अधिकारी यांनी घेतली पाहिजे.

क्रमिक पुस्तकांचं बदलतं स्वरूप रचनावादाला पूरक
शालेय वर्गांमधले (आणि अगदी महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्गांमधलेही!) विद्यार्थी आपणहून शिकण्यास प्रवृत्त होणं ही घटना शिक्षणात मूलभूत आहे. रचनावादी पद्धती ही विद्यार्थ्यांना आनंदानं कृतीयुक्ततेनं स्वयंशिक्षणाला प्रवृत्त करते ही या पद्धतीची जमेची बाजू आहे. आज असंख्य शाळांमधले रचनावादी वर्ग मुलांच्या चेहऱ्यांवर समाधान, उत्सुकता, शिकण्याची ऊर्मी दर्शवत आहेत. याचा अर्थ मुलांना शिकायला आवडत आहे. शाळांचं बाह्य रूपही आकर्षक, सौंदर्यपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होतं, हे आता अनेक सरकारी शाळांना आणि त्यांमधल्या शिक्षकांना चांगलं समजलं आहे. शाळा अधिक सौंदर्यसंपन्न व साधनसंपन्न होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पालकवर्ग आणि गावकरी मंडळी शाळा ‘आपली’ मानू लागले आहेत. शाळांच्या आंतर्बाह्य विकासासाठी त्यांच्याकडून भरभरून मदत येत आहे हे शालेय शिक्षणाबाबतची समाजाची मानसिकता बदलत असल्याचं द्योतक आहे.

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रचनात्मक शिक्षणाकडं नेण्याचा एक खूप मोठा, जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे तो क्रमिक पुस्तकांच्या बदलत्या स्वरूपांतून. धड्यांखालचे प्रश्‍न काही प्रमाणात वर्तनवादी स्वरूपाचे असले तरी, म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरं धड्यांमध्येच आहेत अशी असली, तरीही त्याचबरोबर मुलांना शोध घ्यायला लावणारे आणि कृती करायला लावणारे असेही प्रश्‍न आले आहेत. शिक्षकांनी त्यांचं नीटस पालन केलं तरी मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक सघन होईल.

वर्गखोल्यांबरोबरच जीवनव्यवहारातूनही शिक्षण
शासनाने क्रमाक्रमानं दरवर्षी क्रमिक पुस्तकं नव्यानं तयार केली. त्यात एक वैचारिक प्रवाहीपणा दिसून येत आहे. क्रमिक पुस्तकांचं स्वरूप अधिकाधिक रचनावादी शिक्षणाच्या अंगानं बदललं जात आहे. नुकतीच आलेली सहावीची पुस्तकं याच मालिकेत पुढचं पाऊल टाकणारी आहेत. या पुस्तकांमधून विषयांतल्या घटकांना भिडणारे पाठ तर आहेतच; परंतु मुलांना केवळ पाठातच गुंतवून न ठेवता, त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कृतींकडं वळवण्याचा आणि त्याकरवी वर्गाबाहेरच्या समाजजीवनाशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानं मुलांच्या शिकण्यासाठीचा परिसर वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता त्यांचं अंगणच विस्तारलं आहे. मुलांचं शिक्षण केवळ वर्गांमधून न होता ते आता काही प्रमाणात बाह्य जीवनव्यवहारांतून व्हावं, असा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. हे रचनात्मक शिक्षणाचं पडलेलं पुढचं पाऊल आहे.

विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची जोड
आजवरचं शालेय शिक्षण नैतिक आणि नागरिकत्वाच्या मूल्यांबाबत उदासीन होतं आणि ही शालेय शिक्षणामधील फार मोठी उणीव होती. मूल्यशिक्षणाची सामाजिक जाणीवही फारशी व्यक्त होत नव्हती. शासकीय स्तरांवरून याबाबतचे काही विचार व्यक्त होत होते, काही तुटक आणि त्रोटक प्रयत्नही केले जात होते; पण शाळांमधून ते फारसे गंभीरपणे कधी घेतले गेले नाहीत आणि शिक्षकवर्गानंही ते आवर्जून मनावर घेतले नाहीत. त्यामुळं, क्षमताधिष्ठित शिक्षणाचा प्रयत्न झाला; पण मूल्याधिष्ठित शिक्षणाला वर्गाबाहेर समाजावरच सोपवलं गेलं.

आता आलेल्या सहावीच्या क्रमिक पुस्तकांनी एक मोठा प्रयोग हाती घेतला आहे, असा निष्कर्ष मला काढावासा वाटतो. हा प्रयोग म्हणजे, विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची दिलेली जोड होय. भाषांच्या पुस्तकांमधून हे ठळकपणे प्रत्ययाला येत आहे.

मूल्यवर्धन ः रचनावादी शिक्षणपद्धतीचं पुढचं पाऊल
महाराष्ट्र शासनानं याचबरोबर आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि जीवनोपयोगी निर्णय घेतला आहे आणि येत्या जूनपासून, म्हणजे जून २०१६ च्या नव्या शालेय वर्षापासून, मूल्यवर्धनाचा नवा कार्यक्रम शाळांमधून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा कालोचित कार्यक्रम महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी एका केंद्रपातळीवरच्या शाळांमधून पथदर्शी स्वरूपात होणार आहे. बीड जिल्ह्यांतल्या सुमारे ५०० शाळांतून हा मूल्यवर्धनाचा प्रयोग गेल्या सात वर्षांपासून हाताळला जात आहे. रचनावादी पद्धतीच्या शिक्षणानं, मुलांच्या मुक्त वातावरणातल्या शिकण्याला एकीकडं उठाव येईल, मुलं स्वयंशिक्षणाला उद्युक्त होतील, ती ‘शिकणं’ या हेतूनंच शिकतील, तर दुसरीकडं अनुभवाधारित मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमांतून ती अधिक विचारपूर्वक वागायला शिकतील. या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेतली पायाभूत नागरी मूल्यं, भावी समाजाच्या दैनंदिन व्यवहारांत उतरतील, अशी आशा आपण करू शकतो.

आजच्या शिक्षणानं नेहमीच उद्याच्या जीवनाची घडी घालून द्यायची असते. मुलांच्या शिकण्या-वागण्याला वळण देऊनच हे साध्य होण्यासारखे असतं. महाराष्ट्रात या दिशेनं पडू लागलेली दमदार पावले, उद्याच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Thursday, June 2, 2016

प्राचीन साहित्यकृती

प्राचीन साहित्यकृती :

महाभारत - महर्षी व्यास
  रामायण - वाल्मीक ऋषी
  तुलसी रामायण - तुलसीदास
  पंचतंत्र - विष्णु शर्मा
  गीतगोविंद - जयदेव
  मुद्रराक्षस - विशाखादत्त
  स्वप्न, वासवदत्ता - भास
  अकबरनामा, ऐने अकबरी - अब्दुल फजल
  अर्थशास्त्र - कौटिल्य
  मृच्छकटिक - शुद्रक
  बृहत्कथा - गुणाढय
  शाकुंतल, कुमारसंभव, मेघदुत - कालीदास
  भवभुत्ती - मालती माधव
  शाहनामा - फिरदौसी
  बुद्ध चरितम - अश्वघोष
  नाट्य शास्त्र - भरतमुनी
  नितीशतक - भर्तूहरी
  राजरंगिणी - कल्हन
  कादंबरी, हर्षचरित - बाणभट्ट
  अष्टाधायी - पाणीनी

Wednesday, June 1, 2016

अच्छाई

अच्छाई पलटकर आती है:-

ब्रिटेन में फ्लेमिंग नाम का एक किसान था. एक दिन वह अपने खेत में काम फकर रहा था. तभी उसने किसी के चीखने की आवाज़ सुनी. आवाज़ की दिशा में जाने से किसान ने देखा एक बच्चा दलदल में धस रहा है. आनन-फानन में उसने एक लंबी सी टहनी खोजी और उसके सहारे से बच्चे को दलदल से बाहर निकाला।

दूसरे दिन किसान के घर के पास एक घोड़ागाड़ी आकर रुकी. उसमे से एक अमीर आदमी उतरा और बोला मैं उसी बच्चे का पिता हूँ, जिसे कल फ्लेमिंग ने बचाया था. अमीर व्यक्ति ने आगे कहा मैं इस अहसान को चुकाना चाहता हूँ, लेकिन फ्लेमिंग ने कुछ भी लेने से साफ मना कर दिया और कहा यह तो मेरा कर्तव्य था. इसी दौरान फ्लेमिंग का बेटा बाहर आया. उसे देखते ही अमीर व्यक्ति के मन में एक विचार आया. उसने कहा मैं तुम्हारे बेटे को अपने बेटे की तरह पालना चाहता हूँ. उसे भी वो सारी सुख-सुविधायें और उच्च शिक्षा दी जायेगी, जो मेरे बेटे के लिये होगी. ताकि भविष्य में वह एक बड़ा आदमी बन सके. बच्चे के भविष्य की खातिर फ्लेमिंग भी मान गया।

कुछ वर्षो बाद किसान फ्लेमिंग का बेटा लंदन के प्रतिष्ठित सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूल से स्नातक हुआ और पूरी दुनिया ने उसे महान वैज्ञानिक, पेनिसिलिन के आविष्कारक ‘सर अलेक्जेंडर फ्लेमिंग’ के रूप में जाना।

कहानी अभी बाकी है. कई बरसों बाद, उस अमीर व्यक्ति का बेटा बहुत ही गंभीर रूप से बीमार हुआ. तब उसकी जान पेनिसिलिन से बचाई गई. उस अमीर व्यक्ति का नाम, रैंडोल्फ़ चर्चिल और बेटे का नाम, विंस्टन चर्चिल था, जो दो बार ब्रिटेन के प्रधानमंत्री भी रहे।

इस कहानी से यह प्रेरणा मिलती है कि जीवन में किसी भी तरह किसी की मदद की जायें, तो अच्छाई पलट-पलट कर आपके जीवन में ज़रूर आती है।

Computer /Laptop Shortcut Keys

कुंजी (Shortcut Keys)
Ctrl + N
नई फ़ाइल बनाने के किए
Ctrl + Shift + A
केपीटलाइज करने के लिए
Ctrl + O
फाइल खोलने के लिए
Alt + Ctrl + M
कमेंट देने के लिए
Ctrl + W
फाइल को बंद करने के लिए
Alt + F10
एप्लिकेशन को मिनीमाइज़ करने के लिए
Ctrl + S
वर्ड डॉकयुमेंट को सेव करने के लिए
Ctrl + F
फ़ाइल में किसी भी अक्षर या शब्द को ढूंढने के लिए
Alt + Ctrl + Y
कर्सर को अगले पेज पर ले जाने के लिए
Alt + F5
एप्लिकेशन को रिस्टोर करने के लिए
Alt + Ctrl + 1 - Apply Heading 1
( टेक्स्ट की स्टाइल हेडिंग 1 के लिए )
Alt + Ctrl + 2 - Apply Heading 2
टेक्स्ट की स्टाइल हेडिंग के लिए )
ctrl +H
टेक्स्ट को रिप्लेक्स करने के लिए
Ctrl+ G
दिये गए पेज नंबर पर पाहुचने के लिए
Alt + Ctrl + Home
डॉकयुमेंट को ब्राउज करने के लिए
Ctrl + Z
अन्डु करने के लिए
Ctrl + y
रिडु करने के लिए
Ctrl + Shift + L
लिस्ट में बुलेट देने के लिए
Alt + Ctrl + K
ऑटो फॉरमेट के लिए
F3 or Alt + Ctrl + V
ऑटो टेक्स्ट के लिए
Ctrl + B or Ctrl + Shift + B
बोल्ड करने के लिए
Ctrl + Shift + F5
बुकमार्क देने के लिए
Ctrl + Page Down
अगले पेज पर जाने के लिए
Ctrl + Shift + F
फॉन्ट को बदलने के लिए
Ctrl + Shift + P
फॉन्ट की साइज को बदलने के लिए
Ctrl + Shift + >l >
फॉन्ट की साइज को 2 प्वाइंट बड़ाने के लिए
Ctrl + Shift + l
फॉन्ट की साइज को 2 प्वाइंट घटाने के लिए
Ctrl + ]
फॉन्ट की साइज को एक-एक प्वाइंट बड़ाने के लिए
Ctrl + [
फॉन्ट की साइज को एक एक प्वाइंट घटाने के लिए
Ctrl + I
फॉन्ट को इटालिक करने के लिए
Ctrl + U
फॉन्ट को अंडरलाइन करने के लिए
Ctrl + Shift + D
फॉन्ट को डबल अंडरलाइन करने के लिए
Ctrl + Shift + K
फॉन्ट स्टाइल को बदलने के लिए
Ctrl + = Ctrl + =
सबस्क्रिप्ट करने के लिए
Ctrl + Shift + +Ctrl + Shift + +
सुपर स्क्रिप्ट करने के लिए
Ctrl + 1
एक लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 2 Ctrl + 2
दो लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 5
1.5 लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 0
लाइन के स्पेस को लगाने व हटाने के लिए
Ctrl + E
पेरेग्राफ को सेंटर एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + J
पेरेग्राफ को जस्टीफाइ करने के लिए
Ctrl + L
पेरेग्राफ को दायां एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + R
पेरेग्राफ को बायां एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + Shift + Enter
कॉलम को ब्रेक करने के लिए
Ctrl + Shift + F8
कॉलम को सलेक्ट करने के लिए
Ctrl + C
किसी भी फ़ाइल, फोल्डर व टेक्स्ट मेटर को कॉपी करने के लिए
Ctrl + Shift + C
किसी भी टेक्स्ट फारमेट को कॉपी करने के लिए
Alt + Shift + F7
डिस्कनरी को ऑपन करने के लिए
Ctrl + F5
डॉकयुमेंट को रिस्टोर करने के लिए
Ctrl + T
हेन्डिंग इन्डेंन्ट करने के लिए
F1
किसी प्रकार की मदद के लिए
Ctrl + Shift + H
छिपाने (Hidden करने) के लिए
Alt + F8
मेक्रो को ओपेन करने के लिए
Alt + Shift + K
मेल मर्ज को चेक करने के लिए
Alt + Shift + E
मेल मर्ज मे डेटा सोर्स को बदलने के लिए
Alt + Shift + M
मेल मर्ज को प्रिंट करने के लिए
Ctrl + Enter
पेज को ब्रेक करने के लिए
F2
सलेक्टेड फाइल व फोल्डर को रिनेम करने के लिए
F4
लास्ट एक्सन को रिपिट करने के लिए
F9
सलेक्टेड फिल्ड को अपडेट करने के लिए
F10
मीनू बार को एक्टिव करने के लिए
F11
अगली फिल्ड पर जाने के लिए
F12
फाइल को सेव एज करने के लिए.

मैत्र जीवांचे

॥ मैत्र जीवांचे…….. तसे पण ........॥
-:श्रीरंग चितळे

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केलं की 'ह्यात जे जे कोण आहेत त्यांनी संपर्क करा'. एक महिन्यात सुमारे ३०-३५ मित्र-मैत्रिणी  ४० वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हॉट्स अपवर ग्रुप झाला. सगळ्यांचे स्मार्ट फोन दिवसभर किणकीणायला किंवा खणखणायला लागले. मग “हा कुठे आहे?” “ती कुठे असते?” अशी शोधाशोध पण होत राहिली. हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्ट फोनवर ‘भरायला’ लागला. नंतर त्यांचं एक गेट टुगेदरपण झालं. बालपणीच्या वर्ग मैत्रिणी नव्या रुपात भेटल्यानी आणि आता पुढेही भेटत राहतील ह्या कल्पनेनी मुलं जास्त एक्सायटेड होती...

एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारलं "हल्ली मीना कुठे असते?" दुसऱ्या दिवशी रीस्पोंस आला "मीना तिच्या घरीच बेड रिडन आहे. पाच वर्षानपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यामुळे विकल होऊन पडलीय. तिला चालता पण येत नाही. नवरा आणि दोन मुलं हेच तिचं सर्व काही करत आहेत." ग्रुपला शॉक आणि मग सन्नाटा…..

मग चार-पाच मित्र मैत्रीणीत पर्सनल मेसेजेसची देवाण घेवाण झाली. ग्रुपवर मेसेज आला की "आपण मीनाला भेटायला जाऊया". सगळ्यांनी जाणं व्यवहार्य नव्हतं, म्हणून मग मीनाशी फोनवर आगाऊ वेळ ठरवून १०-१२ मित्र-मैत्रिणी तिच्या घरी गेले. तिच्या छोट्या घरात गेल्यावर आपली ही बाल मैत्रीण अशी अंथरुणाला खिळलेली पाहून बराच वेळ सगळे निशब्द होते.....पण हीच कोंडी फोडायची होती !! एकेकांनी तिच्याशी संवाद सुरु केला. तिची चौकशी केली....अंथरुणावर पडून राहिलेली मीना भरभरून बोलत होती.....तिचं चेहरा, तिचे डोळे....सगळंच बोलत होतं....मैत्रिणीनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मीनाचा बांध फुटला.....ते आनंदाश्रू होते? का तिला उठून बसता येत नाहीये ह्याचं दुख्ख होतं? हे काही कळत नव्हतं. सगळ्यांचेच डोळे भरून आले. ह्या मित्र-मैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू असताना तिच्या नवऱ्यानी आणि मुलांनी खाण्या पिण्याची व्यवस्था केली. ते पाहून सगळ्यांना कौतुक वाटणं आणि गहिवरून येणं हे एकदमचं झालं. "कोणी मदतीला नसताना कसं करत असतील हे सगळे इतकी वर्ष? आणि मीनाचं काय?" हे भाव सर्वजण लपवायचा प्रयत्न करत होते. मित्र- मैत्रिणी परत जाताना मीनाला सांगून गेले की ह्यातून तिला बाहेर पडायला हवं. त्यांपैकी कोणी न कोणीतरी तिला दर आठवड्यात येउन भेटून जातील, तिच्याशी बोलतील आणि तिला अंथरूणमुक्त व्हायला मदत करतील.

त्या दिवसानंतरची बदललेली मीना ही नवऱ्यानी आणि मुलांनी पाच वर्षांनंतर पहिल्यांदा पहिली होती. तिच्या मनानी आता उभारी घ्यायला सुरुवात केली. "आता ह्यातून बाहेर पडायला पाहिजे" असं तिला "आतून" वाटायला लागलं होतं. ह्यात तिला साथ द्यायला तिचं "मैत्र" होतं !! दिलेल्या शब्दाला जागून मित्र मैत्रिणी दर आठवड्याला तिला भेटत राहिले. तिचा आत्मविश्वास दुणावला.

दोन महिने झालेत, ती आता घरातल्या घरत चालायला लागलीय. पंधरा दिवसांपूर्वी मीनानी आपणहून एका मैत्रिणीला फोन करून सांगितलंय की "तुझ्या नविन गाडीतून मला चक्कर मारून आण". मीनाच्या
बरोबर गाडीतून सोबतीला कोणी कोणी जायचं ह्यावरून ग्रुपवर प्रेमळ भांडणं सुरु झालीयत.
……………………..मैत्र जीवांचे, तसे पण !!

तंत्रस्नेही शिक्षण, ब्राझील

🔵जगभरातील  तन्त्रस्नेही शिक्षण पद्धतीचा आढावा घेणारा  लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे🔵



 तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’
प्रयोग….@ रणजितसिंह डिसले




ब्राझील म्हटले
कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे
आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला
दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी
ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल २०१६ मध्ये या
देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा
जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला
आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या
अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली
आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
सेंट लुईस हा
अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा
मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस
अन त्याचा मित्र फर्नांडीस हे दोघे यावर्षी ११
वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच
उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची
परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण
घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय
होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे
—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा
मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी
गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा
प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने
अंमलात आणलेला कृती आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही
शिक्षणाचा ब्राझिलियन प्रयोग’.
सन २००९
साली आपला भारत देश १४ वर्षाखालील मुलांना
मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला
म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी
ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन
याची उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६
अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात
गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला
गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य
करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये
एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात
वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,०००
मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील
ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या
गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक
स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा
शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले
ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच
शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे
उभारण्यात आली.सरकारी मालकीची
दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार व
स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या
टप्प्यात तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही
सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत
सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला
नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण
देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात
कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली
गेली.ब्राझील मधील विख्यात
शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र
अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या
मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या
मुलांची भौगोलिक
परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय
यांच्या अभ्यासातून व्यवसायाभिमुख कौशल्ये
विकसित करत शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट
साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला.
कौशल्याधीष्ठीत अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट
प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी
ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड
केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील
केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत
राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात
होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन
(Classroom-Management ) व
मूल्यमापनाचे ( Evaluation) चे विशेष
प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न
होता अधिक परिणामकारक होण्यासाठी
द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात
आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली
अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत
होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी
ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या
मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित
मुल्यमापनाचा अवलंब करण्यात आला.मुलांचे
मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक
करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या
आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला
गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या
आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील
आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.
प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक
अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना
वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
सलग ३ वर्षे
याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता
पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील
याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा
प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच परिणाम म्हणून
संयुक्त राष्ट्राने ब्राझील मधील एक ही मूल
माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून
वंचित नाही असे प्रशस्तीपत्र दिले.संयुक्त
राष्ट्राने घोषित केलेली शाश्वत विकासाची
उद्दिष्टे गाठण्यासाठी सारे जग प्रयत्न करत
असतानाचा ब्राझीलच्या या यशाने सर्वांसमोर
आदर्श उभा राहिला आहे.
लोकसंख्या व
अर्थव्यवस्थेचा आकार याबाबत भारताशी काही
प्रमाणात साम्य असणारा हा देश जे यश साध्य करू
शकला ते आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी
आहे.ब्राझीलच्या या शैक्षणिक मॉडेल मधील बऱ्याच
बाबी आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.जिथे
वैद्यकीय शिक्षणासाठी सबंध भारतभर ‘नीट’
नेटकी परीक्षा असावी असा आग्रह आम्ही धरत
असतानाच स्थानिक गरजांचे प्रतिबिंब
अभ्यासक्रमात उमटले तर त्याची उपयुक्तता वाढते
हेच ब्राझील च्या नव्या मॉडेल ने दाखवून दिले
आहे.पारंपारिक शिक्षण व अभ्यासक्रम यांची
वास्तविक जीवनाशी असणारी फारकत या
निमित्ताने पुढे आली आहे.महाराष्ट्रासारख्या
राज्यात जिथे मराठवाड्यातून दरवर्षी लाखो मुले
उसतोडीच्या निमित्ताने किमान ६ महिन्यासाठी
शाळाबाह्य राहतात. या मुलांच्या गरजा,
कौटुंबिक परिस्थिती यांचा अभ्यास करून वेगळा
अभ्यासक्रम आखला जाणे गरजेचे आहे.बीड सारख्या
जिल्ह्यात या धर्तीवर पथदर्शी प्रयोग राबवता
येवू शकेल.या पायलट प्रोजेक्ट मधील येणाऱ्या
समस्यांचा अभ्यास करून काही उपाय निश्चितपणे
समोर येतील.या पर्यायांची उपयुक्तता पडताळून
मगच याचे सार्वत्रिकीकरण केले जाणे उचित
ठरेल.मुलांचे होणारे स्थलांतर व गळती
रोखण्यासाठी पालकांचे मन वळवण्याचा पर्याय
दरवर्षीच लागू पडेल याबाबत शंकाच वाटते.मात्र
साखर शाळांचे पुनरुज्जीवन करून तिथे या मुलांच्या
गरजानुरूप अभ्यासक्रम आखून त्याच्या
अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ
शकेल.केवळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात RTE चे यश
मानणे म्हणजे अल्प संतुष्टपणा ठरेल.शैक्षणिक
सुविधांची उपलब्धता याही पुढे जाऊन आपल्याला
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल
करायला हवीय.. ब्राझीलचा हा पॅटर्न आपल्या
गरजानुरूप बदल करून अंमलात आणायला काहीच
हरकत नाही. स्थलांतर स्थानिक गरजा लक्षात घेत
अर्थार्जनासाठी शिक्षण देण्याबाबत आम्हा
भारतीयांना विचार करावा लागेल.असे शिक्षण
देताना ते अधिक लवचिक असण्याची गरज
आहे.संगणक,टॅबलेट आदी साधनाच्या मदतीने
तंत्रस्नेही शिक्षण देण्यात बाबत आपला देश
गोंधळलेल्या अवस्थेत असताना ब्राझील चे
तंत्रस्नेही प्रारूप मार्गदर्शक आहे. तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करून घनदाट जंगलात देखील
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहू
शकते हे यातून दिसून येते. प्रचंड पाऊस व महापूर
हा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अमेझॉन
मधील मुलांच्या अभ्यासक्रमात आपत्ती
व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण यांचा जाणीवपूर्वक
समावेश केला गेला. विषारी साप ओळखणे व साप
पकडण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी सिम्युलेशन ची
मदत घेतली गेली.त्यामुळे सर्प दंशाने मृत्युमुखी
पडण्याचे प्रमाण ब्राझील मध्ये लक्षणीयरीत्या
घटले आहे, असेही निरीक्षण संयुक्त राष्ट्राने
नोंदवले आहे.मुलांना शाळेत शिकण्यासाठी त्यांचे
सामाजिक अभिसरण होणे महत्वाचे असते हा आपला
भारतीय समज देखील यानिमित्ताने फोल ठरला
आहे.कारण अमेझॉन मधील अनेक शाळांमध्ये केवळ २-४
मुलेही शिक्षण घेत आहेत.मुलाच्या दैनंदिन जीवनाशी
निगडीत शिक्षण असेल तर ते शाश्वत शिक्षण ठरते
हेच या निमित्ताने समोर आले आहे.

Tuesday, May 31, 2016

शिक्षण व्यवहाराशी जोडताना

📝शिक्षण व्यवहाराशी जोडताना...
   प्रसाद मणेरीकर📝

मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. तेव्हा विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर प्रत्यक्ष व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की अभ्यासक्रमाची रचना करणे सोपे होईल.
मुले शिकावीत, अधिक चांगल्या पद्धतीने शिकावीत, यासाठी केलेल्या विविध व्यवस्थांपैकी शाळा ही एक व्यवस्था. मुले शाळेत यावीत, तिथे शिक्षकांकरवी शिकती व्हावीत आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावीत, यासाठी सगळी धडपड असते. मात्र तरीही काही मुले मागे पडतात, काही नापास होतात, काही अर्ध्यावरच शाळा सोडतात, हे वास्तव आहे. मुलांना शाळेत शिकायला आवडत नाही, तिथे त्यांना कंटाळा येतो, असा सार्वत्रिक समज आहे आणि तो काहीसा खराही आहे. वर्गातील अमुक मुले काहीच शिकत नाहीत, त्यांना काहीच येत नाही, असे सांगणारे शिक्षक आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे, म्हणून तर सरकार अप्रगत मुलांसाठी स्वतंत्र वेळ देऊन उपक्रम राबवते; पण तरीही मुले मागे पडतात, हे वास्तव उरतेच.
हे असे का होते याचा धांडोळा घेतल्यास अनेक कारणे पुढे येतात. यातले एक कारण, मुले शाळेत जे शिकतात ते व प्रत्यक्ष व्यवहारात जे करतात ते, यांची सांगड घातलेली त्यांना दिसत नाही व त्यांनाही ती घालता येत नाही. त्यामुळे शाळेतले शिकणे त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ते कंटाळवाणे होते. वास्तविक मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. परिसरातील घटना पाहत, समजून घेत, उपक्रमांत सहभागी होत, विविध व्यक्तींशी संवाद साधत असताना ही शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. किंबहुना शाळेत जायच्या कितीतरी आधीपासूनच ही प्रक्रिया सुरू होते. परिसरात वावरताना सहजपणे, कुणीही न शिकविता त्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होत असतात. मुद्दा असा, की परिसरातून अनुभव घेत मूल शिकत असेल, तर ते "शिकत नाही‘ असे आपण का म्हणतो आणि त्याला "ढ‘ का ठरवतो? म्हणजेच इथे आपली शिक्षक म्हणून जबाबदारी सुरू होते आणि ती दुहेरी स्वरूपाची आहे. एक, मूल ज्या वातावरणातून आले आहे, ते वातावरण समजून घेणे आणि दुसरे मुलाचे अनुभवविश्व लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना करणे. मूल परिसरातून ज्या प्रकारचे अनुभव घेते आहे, त्याचे शालेय शिक्षणात पर्यवसान कसे करायचे, असा तो मुद्दा आहे.
वरवर पाहता ही अवघड बाब वाटेल, कारण प्रत्येक मुलाचा विचार करायचा आणि तशी प्रत्येकासाठी अभ्यासक्रमाची आखणी करायची हे सोपे काम नाही. मात्र अगदी तसेच करायची गरज नाही. कारण ज्या परिसरातून शाळेत मुले येतात, तो परिसर बहुतांश मुलांचा समानच असतो किंवा तसा समान परिसर असणाऱ्या मुलांचे गट करता येतात व त्या आधारे अभ्यासक्रम आखता येतो.
उदा. ग्रामीण व निमशहरी भागांतील मुलांसाठी शेती हा रोजचा अनुभव असतो. ती शेतात वावरतात, शेतीशी संबंधित अनेक क्रिया त्यांना माहिती असतात. याचा आधार घेत भाषा, गणित, परिसर अभ्यास यांतील अनेक संकल्पना मुलांना सोप्या करून सांगता येतील. असेच घरातील व्यवहारांचेही असते. मग या मुलांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर शालेय विषयांतील संकल्पना समजणे सोपे जाईल. तो अभ्यासक्रम अवघड वाटणार नाही आणि दुसरे म्हणजे घरचे आणि परिसरातले व्यवहार ती अधिक समजून-उमजून करतील. या दोन्हीतून मुलांचे आकलन वाढेल.
आपली गफलत झालेली आहे, ती पाठ्यपुस्तक केंद्रिभूत मानून सगळे व्यवहार करण्यातून. खरे तर सरकारही आता त्या मानसिकतेतून बाहेर पडू पाहतेय. विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की पुढची रचना करणे सोपे जाईल.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांना पाठ्यपुस्तकातील धडे समजत नाहीत व वर्गात चालणाऱ्या गणिती क्रियाही समजत नाहीत, हे त्या त्या भागांतले शिक्षकही मान्य करतात. याचाच परिणाम मुलांना शिकण्यात रस वाटण्यावर होतो. नाहीतर दुकानात जाऊन रोजचे व्यवहार करणाऱ्या मुलांना, किंवा आई-वडिलांना भाजीच्या दुकानात मदत करणाऱ्या मुलांना शाळेतील बेरीज-वजाबाकी येणार नाही असे कसे होईल? आणि हे व्यवहाराशी जोडून शिकणे केवळ प्राथमिक इयत्तेच्या टप्प्यावरच नाही, तर माध्यमिक इयत्तांसाठीसुद्धा लागू आहे. कारण न्यूटनचे नियम आपल्याला तोंडपाठ असतात, पण ते रोजच्या जगण्याला लावता येत नाहीत. रस्सीखेच करताना दोरी तुटून पडल्याचा अनुभव अनेक मुलांना असतो. बस सुरू झाल्यावर ढकलले गेल्याचा अनुभवही असतो, पण याच्याशी नियमांचा संबंध ते शिकूनही मुलांना लावता येत नाही. या अशा रोजच्या अनुभवातून नियमांकडे गेलो, तर शब्दश: नियम कदाचित नाही लक्षात राहणार; पण ती संकल्पना समजेल आणि नियम पाठ करण्यापेक्षा ते केव्हाही महत्त्वाचे!
हे मान्य असेल तर यापुढे आपल्याला अभ्यासक्रमाचा विचार वेगळा करावा लागेल. शाळेत जाऊन मुलांना काय आले पाहिजे, हे नीट ठरवावे लागेल. म्हणजे मुलांना पाठ्यपुस्तक वाचता आले पाहिजे, की मुलांची वाचन क्षमता विकसित व्हायला हवी? आणि वाचन क्षमता विकसित व्हायला हवी असेल, तर वाचनाचे कोणते किती आणि विविधांगी अनुभव मुलांना देता येतील, जे सुरवातीच्या टप्प्यावर परिसराशी जोडलेले असतील, हे पाहावे लागेल. कारण ज्या वयात वाचनाची गोडी लागायची त्या वयात अनाकलनीय वाचावे लागले, तर मुले वाचनापासून दूर जाण्याची शक्यताच जास्त. कारण वाचन ही आपली आपण करण्याची व समजून घेण्याची बाब आहे.
सरकारने शिक्षकांचा पाठ्यपुस्तकाधारित शिक्षणाचा भ्रम लवकरात लवकर दूर करायची गरज आहे. प्रत्येक वयोगटासाठीच्या क्षमता निश्चित कराव्यात. या क्षमतांपर्यंत पोचण्यासाठी साह्यभूत होतील, अशा क्रमबद्धपणे घ्यायच्या उपक्रमांची यादी करावी आणि शिक्षकांना अधिकाधिक मोकळीक द्यावी. सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेलही कदाचित, पण तो सरकारचा हातखंडा आहे. मुलांना शालेय शिक्षणाची गोडी लावण्याचा हा एक मार्ग ठरू शकेल.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...