Pages

Thursday, December 8, 2016

पाण्यात विरघळणारे प्लॅस्टिक

भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

या पिशव्या इको फ्रेंडली आहेत

लोकसत्ता ऑनलाइन | December 7, 2016 3:38 PM


प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या बनत चालली आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पण भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने चक्क पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक बनवले आहे. विशेष म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होणार नाही.



अश्वथ हेगडे हा उद्योजक मुळचा मंगलोरचा पण सध्या कतारमध्ये राहतो. त्याच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बायोडिग्रेटेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा मानस आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. ३ रुपयांच्या आसपास त्या पिशव्या बाजारात उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.



या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळतील असा दावा हेगडे यांनी केला आहे. या पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्या तरी त्यांना अपाय होणार नाही असेही हेगडेंनी सांगितले आहे. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनत चालली असून पर्यावरणाला त्यामुळे खूप हानी पोहचत आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे, हेगडे यांना भारत प्लास्टिकमुक्त बनवायचा आहे.

     

Monday, November 21, 2016

गणिताच्या वर्गात खडू - फळ्याला सुट्टी

गणिताच्या वर्गात खडू-फळ्याला सुट्टी

मणी, नोटा, वेगवेगळ्या आकारांचा पर्याय

प्रतिनिधी, पुणे | November 20, 2016 2:07 AM

 गणिताच्या वर्गात खडू-फळ्याला सुट्टी

शिक्षण विभागाकडून शाळांना आदेश; मणी, नोटा, वेगवेगळ्या आकारांचा पर्याय

राज्यातील शाळांमध्ये आता गणिताच्या वर्गात खडू-फळ्यावरील आकडेमोडीला सुट्टी मिळणार आहे. गणित हा विषय सर्वाधिक विद्यार्थ्यांना कठीण वाटत असल्यामुळे तो मणी, नोटा, वेगवेगळे आकार अशा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिकवण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.

आतापर्यंत हात कसे धुवावेत, शाळा स्वच्छ कशी ठेवावी अशा बाबींचे शासन आदेश काढल्यानंतर आता वर्गात गणित कसे शिकवावे याचाही आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. गणित शिकवण्याची जुनी पद्धत न वापरता नवे शैक्षणिक साहित्य वापरून गणित शिकवण्यात यावे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांची गणित आणि भाषा विषयातील प्रगती समाधानकारक नाही. गणित या विषयाची भीती वाटत असल्यामुळे मुले या विषयामध्ये मागे असल्याचे शासकीय पाहणीतून समोर आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर गणित हा विषय वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातूनच शिकवण्यात यावा असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. रंगित मणी, मण्यांच्या माळा, शंभर एकक ठोकळे, दहा दशक दांडे, पाच शतक पाटय़ा आणि हजाराचा ठोकळा, नाणी आणि नोटा, वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे, मॅचिंग सेट्स, गणितीय जाळी, संख्या कार्ड, जिओ बोर्ड, मीटर टेप, केसांना लावण्याच्या पिना, दोरी आणि पाटय़ा असे साहित्य प्रत्येक शाळेने गोळा करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने सोडले आहे. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात हे साहित्य शाळांनी उपलब्ध करायचे आहे. हे साहित्य कसे वापरायचे याचेही प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे.

गणित साहित्य संचही सीएसआरमधून?

एकीकडे शिक्षण विभागाच्या विविध योजना अमलात आणताना त्यासाठीचा खर्च सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च करू इच्छिणाऱ्या कंपन्या (सीएसआर), लोकसहभाग, पालक यांच्या माध्यमातून उभा करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना देण्यात येतात. गणित संचाच्या शैक्षणिक साहित्याचा खर्चही सीएसआर किंवा लोकसहभागातून उभा करण्याची विभागाची सूचना आहे. खर्चाची रक्कम उभी न राहिल्यास त्याचा खर्च स्थानिक प्रशासनाने करायचा आहे. सहा विद्यार्थ्यांच्या गटासाठी असणाऱ्या एका संचाची किंमत ही ४ ते ५ हजार रुपये आहे.

न्यूनगंड

न्यूनगंड मार्गदर्शन

एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!

हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!

💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
   ☄Be Positive☄,,,

💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

भित्तीचित्र

कॅन्व्हास पेंटिंग ते भित्तीचित्र
- आभा भागवत
"कला संस्कृती" - दिवाळी २०१६

कॉलेजमध्ये असताना एक खूप मोठं चित्र तयार होताना बघितलं होतं. साधारण ८ X २५ फुटी असेल. तेव्हापासूनच मोठ्ठ्या चित्राचे अंदाज केवढे वेगळे असतात याची कल्पनाही आली आणि ओढही निर्माण झाली. मोठा कॅन्व्हास आणि भरपूर रंग हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतंच. बरेचदा वेळेचं आणि आर्थिक गणित न जमल्यामुळे लहान कॅन्व्हासवर समाधान मानावं लागायचं. छोट्या कागदावर चित्र काढायची मजा वेगळी आणि मोठ्या आकारात विचार करण्याची मजा वेगळी. मोठ्या अवकाशाची अवाढव्यता, मोकळीक हवीहवीशी वाटू लागली. संपूर्ण शरीर जणू त्या द्विमितीय प्रचंड पृष्ठभागाचा अंदाज घेत चित्र काढत असतं, नव्हे नाचतच असतं. कोणे एके काळी शिकलेलं संगीत आणि नृत्यही त्यात डोकावत असावं बहुदा! त्या भव्य आकारापुढे आपण इतके लहान असतो की त्यात माझं 'मी' पण गळून जातं. जादू व्हावी अशी मी स्वतःला विसरून त्या चित्रात विरघळून जाते. चित्र म्हणजेच मी आणि मी म्हणजेच चित्र होते. सगळा दिवस संपतो तरी चित्रातून मी बाहेरच येत नाही इतकी एकरूपता अनुभवाला येते. साऱ्या जगाचा विसर पडतो आणि ध्यान लागावं तशी तल्लीनता जाणवते.

वेगळा असा स्टुडिओ नसल्यामुळे छोट्या चित्रांबरोबर मोठाल्ले कॅन्व्हासेसही घरीच रंगवले. भिंतीवरचं चित्र असेल तेव्हा मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगळं सामान नेऊनच चित्र काढायचं असतं. ही मोठी चित्र तयार होताना बघताना घरी मुलांनाही राहववायचं नाही. त्यांनाही मोठ्ठ्या आकारावर चित्र काढावीशी वाटू लागली. मुलांना माझ्या चित्रात शिरकाव नाही हे समजल्यावर घरातल्या भिंतींनाच त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलं. घराच्या भिंती पार छतापर्यंत मुलांनी रंगवल्या. हळू हळू लक्षात आलं की सगळीच मुलं अशी मोठ्ठी चित्र काढायला फार उत्सुक असतात. माझ्या मुलांच्या मित्रमैत्रिणींनाही आमच्याकडच्या भिंती बघून चित्र स्फुरू लागली. हे मित्र-मंडळींशी बोलत असताना एक दोघांनी त्यांच्या घराच्या भिंती खुल्या करून दिल्या. मुलांनी मोकळेपणानी तरीही माझ्या मार्गदर्शनाखाली चित्र काढावी अशी कल्पना पुढे आली. यातून, प्रत्येक मुलाची वेगळी क्षमता चाचपडत, तिला भिंतीवर मोकळी वाट करून देत मोठं भित्तीचित्र काढण्यासाठी खास शैली निर्माण करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या चित्रांमुळे 'मुलांनी भिंतींवर केलेली चित्र' ही अतिशय अभिनव संकल्पना फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पोहोचली. कॅनडा, यू. एस. ए. आणि सिंगापोर मधील काही गटांनी स्फूर्ती घेऊन मुलांसाठी भित्तीचित्र कार्यशाळा योजण्याची कल्पना उचलून धरली.

मी एकटीने एक भित्तीचित्र करायचं ठरवलं तर आठ - दहा दिवस तर काही वेळा महिना महिना एकाच चित्राचं काम चालतं. त्यात कसबही अर्थात जास्त चांगलं उतरतं. ते चित्र संपूर्ण माझं असतं. त्या चित्राचं आर्थिक मूल्यही त्यामुळे वाढतं. चित्र ही श्रीमंतांची मक्तेदारी त्यामुळेच वाटते. ज्याच्या खिशाला असं महागातलं चित्र परवडतं तोच चित्र विकत घेऊ शकतो अथवा चित्रकाराला कमिशन्ड वर्कची ऑर्डर देऊ शकतो. मग ज्यांना एवढे पैसे खर्च करणं शक्य नाही, त्यांना मोठ्या चित्राचा आनंदच मिळू नये का? का चित्रकारानी स्वतःचं मूल्य कमी करून कमी पैशात काम करायचं? याचा सुवर्णमध्य हळू हळू सापडत गेला, तो भित्तीचित्र या माध्यमातून. एक तर यासाठी भिंत हाच पृष्ठभाग वापरायचा असल्यामुळे कॅन्व्हास, कागद यांवर खर्च करण्याचा प्रश्नच मिटला. भिंतीवरचे रंग तुलनेनी स्वस्त असल्यामुळे साधनांचा खर्चही कमी झाला. आणि कमीत कमी एक लिटरचा रंग विकत घेतल्यामुळे भरपूर रंग अनुभवायची संधी, अर्थात मोकळेपणाने हव्या तेवढ्या रंगात खेळण्याची मुभा मिळाली. छोटे, अपुरे, महागडे रंग काटकसरीने वापरण्यातलं दडपण नाहीसं झालं. 'फ्रीडम' अनुभवण्याचा जणू नवा रस्ताच सापडला म्हणूया ना! मुक्त होण्याची ज्याला ओढ असते तो माणूस स्वतःच्या कामात मुक्ती शोधतोच, तसंच काहीसं घडू लागलं.

ही भित्तीचित्र मी एकटीने न करता त्यात सर्वांचा सहभाग असावा याची इतरही कारणं आहेत. सामान्य माणसाला जर सौंदर्य म्हणजे काय याची व्याख्याच करता आली नाही, सुंदर काय असतं याचा अनुभवच आला नाही, तर त्या माणसाचं स्वतःचं काय राहिलं? भित्तीचित्र करताना अनुभवाला येणारा सौंदर्यानुभव हा सहभागी व्यक्तींना अंतर्मुख करतो; इतकंच नव्हे तर सौंदर्य शोधायची, जाणायची गोडी निर्माण करतो. त्यामुळे या कामाला एक नवीन उंची प्राप्त होते. केवळ मी, माझी चित्रकला, माझा कॉपीराईट, माझी सही, माझा मोठेपणा अशा संकुचित दृष्टिकोनाच्या खूप पलीकडे हा अनुभव घेऊन जातो. सहभाग घेणाऱ्यांना थोडंसं चित्रकाम करूनही 'हे चित्र त्यांचं स्वतःचं आहे, तसंच सर्वांचं आहे' अशी जवळीकीची, आपुलकीची, मालकीची भावना चित्राबद्दल वाटते. त्यामुळे त्या चित्राशी, भिंतीशी आणि त्या ठिकाणाशी सर्व सहभागी एका सुंदर जाणिवेने बांधले जातात. जेवढी मोकळीक मी स्वतः अनुभवते, तेवढीच सर्व सहभागी चित्रकारांनाही अनुभवता आली पाहिजे हे सूत्रच ठरवून घेतलं आहे. प्रत्येकाची चित्रातील तयारी, चित्र काढण्याचा आत्मविश्वास, क्षमता, चित्र आवडण्याचा परीघ हा वेगळा असतो. या सर्व वैविध्यपूर्ण बंधनांना संपूर्णपणे स्वीकारूनच समूहचित्र करणं शक्य आहे. त्यासाठी स्वतःच्या स्वीकारकक्षा मला सतत रुंदावत न्याव्या लागतात. समूहगान आणि समूहनृत्य जसं सर्वसामायी आहे, तसंच हे समूहचित्र आहे. एकत्र येऊन निर्मिती करण्यातली ऊर्जा अवर्णनीय आनंद तयार करते. मी जरी त्याची दिशा ठरवत असले तरी सर्वांच्या अभिव्यक्तीला, कौशल्याला न्याय देणं देखिल सातत्यानं त्यात करावं लागतं.

ज्यांना कागदावर चित्र काढायला फार मजा येत नाही त्यांनाही भित्तीचित्रात आनंद मिळू शकतो, हे पाहून मलाही आश्चर्य वाटतं. म्हणजे चित्रकला ही फक्त चित्रकाराचीही मक्तेदारी राहिलीच नाही. सर्वांनी मिळून केलेली ती एक सामायिक कलाकृती बनते. It's a form of Public Art. याला कदाचित कम्युनिस्ट गंध येऊ शकेल, पण हा त्याहून खूप वेगळा विचार आहे. यात सर्वांच्या क्षमतांचं सपाटीकरण नाहीये, उलट सर्वाना जे येतं त्याची भर घालणं आहे. त्याचं कौतुक करणं आहे; मुलांचा आत्मविश्वास वाढवणं आहे; चित्रातून कलोपचाराचे फायदे मिळवणं आहे; चित्रात स्वतःला झोकून देणं आहे; स्वतःला हरवणं आहे; मुलांची ऊर्जा सकारात्मकरित्या उपयोगात आणणं आहे. मुलं यातून आयुष्यभरासाठी प्रेरणा घेतील. हा अनुभव इतका वेगळा आणि समृद्ध करणारा असतो की त्याचे चांगले परिणाम चिरकाल दिसतील. खरं तर मोठ्या माणसांनाही अशा समूहचित्रातून खूप आनंद आणि समाधान मिळतं.

लहान मुलांच्या क्षमतांना समाजाने कायमच दुय्यम लेखलं आहे हेही यातून प्रकर्षानं जाणवू लागलं. बालचित्रकलेच्या अभ्यासातून मुलांमधील विविध वयोगटातील चित्र क्षमता ही केवढी विलक्षण देणगी आहे हे समजत होतं. त्याचा अनुभव भित्तिचित्रांतून येऊ लागला. एका चित्रामध्ये सात वर्षाच्या वीस मुलांचा सहभाग होता आणि चित्रातील झाडाला प्रत्येकाने तीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं काढली. मुलांना अजून जागा दिली असती तर प्रत्येकाने शंभर वेगवेगळे प्रकार नक्की काढले असते. नंतर जेव्हा मुलं दमली आणि पालक फुलं काढू लागले तेव्हा पालकांनी नवीन काही करण्याऐवजी मुलांच्या फुलांची नक्कल केली. नवनिर्मितीसाठी उत्सुक असलेल्या प्रौढांनी हे लक्षात घेण्याजोगं आहे की मुलं हा सृजनशीलतेचा उगम आहे. त्यांना फक्त मोकळी वाट मिळायचा अवकाश आणि ती खळाळून वाहू लागतात.

कर्नाटकातल्या काही दुर्गम भागांत छोट्या गावांमध्ये शेतकरी मुलांबरोबर अशी भित्तीचित्र काढण्याची सुंदर संधी नुकतीच मिळाली. शहरी मुलं एका विशिष्ट पद्धतीने विचार करतात. त्यांचं विश्व हे एका आखून दिलेल्या सीमेच्या आतपर्यंत मर्यादित असतं. मी स्वतः शहरी असल्याने गावातली मुलं किती हुशार असतात आणि त्यांचे अंदाज कसे वेगळे असतात याची मला पुरेशी ओळख असण्याचं काहीच कारण नव्हतं. या मुलांना चित्रात सामावून घेणं हे मोठंच आव्हान होतं. कानडी भाषा मला येत नाही आणि त्यांना मराठी येत नाही. मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये संभाषण करताना, चित्र ही एक स्वतंत्र मजबूत भाषा आहे याची प्रचीति आली. रेषा रंगांच्या माध्यमातून त्या मुलांच्या जवळ पोहोचायला फक्त काही मिनिटं लागली. भिंतीवरच्याच चित्राने भाषेची भिंत फोडणारं असं हे विलक्षण माध्यम आहे.

मुलांना वाचनालयात यावंसं वाटावं आणि स्वतः केलेल्या भित्तीचित्रामुळे वाचनालयाविषयी आपुलकी वाटावी हा या चित्रांचा हेतू होता. पहिल्याच चित्राच्या वेळी एक पाच वर्षाची चिंगुली शेमडी पोर आपल्या एक वर्षाच्या भावाला कडेवर घेऊन पुन्हा पुन्हा चित्र बघायला येत होती. धाकट्या भावंडाला सांभाळायची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिला चित्र आणि वाचनालय या दोन्ही गोष्टी फक्त काही अंतरावरून बघायला मिळाल्या. ही मुलगी म्हणजे अनेक भारतीय मुलींच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. त्या मुलीनी माझ्या मनात घर केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या चित्रात ती मुलगी भिंतीवर चितारायची ठरवली. चांदण्या रात्रीच्या प्रकाशात पांढऱ्या फुलांच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसलेली तीन भावंडं आणि दूरवर उभी, बाळ कडेवर घेतलेली एक छोटी पोर हे चित्र थेट तिथल्या गावातल्या मुलांच्या, गावकऱ्यांच्या हृदयाला भिडलं. नंतर कळलं की ते चित्र बघायला रोज थोडे थोडे गावकरी येऊन जातात. चित्रकाराच्या आयुष्यात याहून आनंदाची गोष्ट ती काय?

चित्रांमध्ये जी जी पुस्तकं आम्ही दाखवली, त्या पुस्तकांची नावं कानडी मध्येच लिहायची होती. मग त्याच मुलांना सांगितलं की तुमच्या मनातलं एखादं पुस्तक, जे अजून कोणीच तयार केलं नसेल अशी नावं लिहा. आणि यातून मुलांच्या मनात खोलवर घर केलेल्या पुस्तक कल्पना बाहेर येऊ लागल्या. सुट्टी मजेची, भिंतीवरची पाल, सगळ्या शाळेत मीच हुशार, पुस्तकातला किडा, टकलू, बदक, विविध मासे आणि अशी खूप मोठी यादी होईल अशी नावं मुलांनी शोधली आणि लिहिली. कल्पनेतल्या पुस्तकाला लेखक म्हणून स्वतःची नावंही घातली. भित्तीचित्रांमुळे मुलांची वाचनालयाशी अशी दोस्ती होईल याची मलाही आधी कल्पना नव्हती.

भिंतीवरच्या चित्रांमधल्या मुलांचे त्वचेचे रंग काळे सावळे दाखवले. एक दोन मुलं खूपच जास्त काळी दाखवली, कारण तेवढी काळी भारतीय मुलं असतात. पुस्तकांमधल्या चित्रांमध्ये कधीच एवढी काळी सावळी मुलं दाखवली जात नाहीत. त्यामुळे सहभागींपैकी काही जण म्हणत होते की रंग बदलू, गोरा करू. पण आपली मुलं अशीच असतात हे त्यांना थोड्यावेळाने पटलं. गावातील मुली जशी परकर पोलकी घालतात तशीच काही चित्रांमध्ये दाखवली, काही मुलांना चक्क समोर बसवून त्यांचं स्केच भिंतीवर उतरवलं. मुलं इतकी खूष झाली. जाता जाता मला पुन्हा येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देऊन ठेवलं. अशी ही भित्तीचित्रांनी माणसं जोडण्याची वेगळीच ताकद हळू हळू समोर येऊ लागली आहे. सहभागींना नाविन्यपूर्ण अनुभव देता देता माझा प्रवासही समृद्ध होतो आहे.

चित्र कसं असावं याचे सर्व नियम मुलं तोडू शकतात. नियम तोडण्यामुळे, प्रयोग करण्यामुळे कधीही न सुचलेल्या असंख्य गोष्टी मुलं शोधून काढतात. स्वतःच प्रश्न निर्माण करतात आणि उत्तरही स्वतःच शोधतात. भिंतीवरची भव्य जागा कशी वापरायची याचे नवे अंदाज तयार होतात. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या काळात जगणाऱ्या आपल्या पिढीमध्ये अनेक स्तरांवर अनेक प्रकारची प्रतिभा अस्तित्वात असते, तिला वाट सापडवून देण्यासाठी मार्ग शोधायची गरज आहे. भिंतीवरच्या चित्रांसारखं मुक्त करणारं माध्यम इतकं सहजी उपलब्ध आहे, की त्याचा आस्वाद आणि अनुभव शक्य तेवढ्या सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं.

दलाईलामा यांचं एक अतिशय आशयघन वाक्य कायम आठवत राहतं - The planet does not need more successful people. The planet desperately needs more peacemakers, healers, restorers, storytellers and lovers of all kinds. असे शांतीदूत निर्माण करण्याची ताकद समूह भित्तीचित्रात आहे. याचं महत्व कोणाला न पटलं तरच नवल!
- आभा भागवत
-----------------

Tuesday, October 25, 2016

Story

*U CAN'T AFFORD TO MISS THIS STORY*

*Just too good*

```At the point of death, a man, Tom Smith, called his children and he advised them to follow his footsteps so that they can have peace of mind in all that they do..

His daughter, Sara, said,
"Daddy, its unfortunate you are dying without a penny in your bank..
Other fathers' that you tag as being corrupt, thieves of public funds left houses and properties for their children; even this house we live in is a rented apartment..
Sorry, I can't emulate you, just go, let's chart our own course..

Few moments later, their father gave up the spirit..

Three years later, Sara went for an interview in a multinational company..
At interview the Chairman of the committee asked,
"Which Smith are you..??"

Sara replied,
"I am Sara Smith. My Dad Tom Smith is now late.."

Chairman cuts in,
"O my God, you are Tom Smith's daughter..?"

He turned to the  other members and said,
"This Smith man was the one that signed my membership form into the Institute of Administrators and his recommendation earned me where I am today. He did all these free. I didn't even know his address, he never knew me. He just did it for me.."
He turned to Sara,
"I have no questions for you, consider yourself as having gotten this job, come tomorrow, your letter will be waiting for you.."

Sara Smith became the Corporate Affairs Manager of the company with two Cars with Drivers, A duplex attached to the office, and a salary of £1,000,000 per month excluding allowances and other costs..

After two years of working in the company, the MD of the company came from America to announce his intention to resign and needed a replacement. A personality with high integrity was sought after, again the company's Consultant nominated Sara Smith..

In an interview, she was asked the secret of her success,,

With tears, she replied, "My Daddy paved these ways for me. It was after he died that I knew that he was financially poor but stinkingly rich in integrity, discipline and honesty".

She was asked again, why she is weeping since she is no longer a kid as to miss her dad still after a long time..

She replied, "At the point of death, I insulted my dad for being an honest man of integrity. I hope he will forgive me in his grave now. I didn't work for all these, he did it for me to just walk in".

So, finally she was asked, "Will you follow your father's foot steps as he requested ?"

And her simple answer was, "l now adore the man, I have a big picture of him in my living room and at the entrance of my house. He deserves whatever I have after God".

Are you like Tom Smith..?
It pays to build a name, the reward doesn't come quickly but it will come however long it may take and it lasts longer..

Integrity, discipline, self control and fear of God makes a man wealthy, not the fat bank account..

Leave a good heritage for your children..

As an agent of CHANGE, please share this true life story with your loved ones..```

Monday, October 24, 2016

डिजिटल विश्वातील तणाव

डिजिटल विश्वातील तणाव

मोबाईल सोबत नसताना तुम्ही अस्वस्थ होतात का? आपल्या घरात काय चाललंय यापेक्षा ऑनलाइन विश्वात काय चाललंय याबद्दल तुम्हाला अधिक रस वाटतो का? सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याचा मोबईल डेटा चालू करतात का?ऑनलाइन बोलणे तुम्हाला आनंदाचा आभास देते का? कुणी तुमच्याशी ऑनलाइन बोलत असताना पलीकडून पटकन reply आला नाही किंवा कोणी ऑनलाइन भेटले नाही तर तुम्हाला वाईट किंवा अस्वस्थ वाटते का? आभासी जगातील तुमचा 'मी' हा वास्तवातल्या 'मी' वर कुरघोडी करतो का? तुमचे शेवटचे प्रत्यक्ष-face to face (facebook वर नव्हे) चांगले बोलणे कुणाशी झाले हे आठवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो का? यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही डिजिटल जगाचे 'गुलाम' आहात आणि ऑनलाइन व्यसनाचे बळी आहात.

तंत्रज्ञान आपले आयुष्य सोपे बनवते; पण आपण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने तणावाला निमंत्रण देतो आणि दुखणे विकत घेतो. मला किती 'Likes' मिळाले? एखादा 'सेल्फी' घेऊन आपण कुठे आहे हे इतरांना दाखवू, त्याने/तिने मला 'Like' का केले नाही? तिचे/त्याचे किती 'Follower' आहेत, Friend आहेत? आणि माझे? हे आताचे प्रश्न, त्यातून येणारा ताण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने निर्माण झाले आहे. ऑनलाइन ताणतणावातून सुटका कशी करायची यासाठी काही उपाय बघूया.

Face to Face-प्रत्यक्ष संवाद:

एक छोटे काम करा. तुमच्या जिवलग मित्र/मैत्रिणीला फोन करा आणि चाय पे चर्चा करत भेट घ्या. तुम्हाला चांगले वाटेल. एकमेकांना न भेटता, ऑनलाइन chatting वर विश्वास ठेवत तुम्ही जर असा विचार कराल की आपण 'connected' आहोत सर्वांशी. तर सावधान! तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला त्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो आणि तो पचवणेही कठीण जाईल. जेव्हा तुम्ही समोरासमोर बोलतात तेव्हा व्यक्तीच्या भावनांचा अंदाज चांगल्याप्रकारे घेता येतो. न बोलताही बऱ्याचदा डोळे, चेहरा, हावभाव यातून मनस्थितीचा वेध घेता येतो. ऑनलाइन chatting हा आभासी जगातील एक आभास असतो. संशोधकांनी सुद्धा मान्य केलंय की आभासी ऑनलाइन संवाद प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊच शकत नाही. तुमच्या वैयक्तिक संवादासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा आणि व्यक्त व्हा.

स्मार्टफोन पासून दिवसातील काही काळ दूर रहा

काहींसाठी ही प्रचंड अवघड गोष्ट असू शकते. पण तुमचा स्मार्टफोन तुम्हाला 'स्मार्ट' बनवत नाही तर तुमचा आत्मविश्वास, उर्मी तुम्हाला स्मार्ट बनवते. स्मार्टफोनमुळे आपली निर्णयक्षमता कमी होत नाहीये ना याकडे लक्ष असू द्या. सतत २४x७ तास सोबत असणारा मोबईल विक्षिप्त वागणुकीबरोबर सायबर सिकनेस, फेसबुक डिप्रेशन इ. ला जन्म देतो.

आभासी जगातून स्वतःला वास्तवात आणा

मोबाईलच्या अतिवापरामुळे एका जागी बसूनही थकल्यासारखे वाटते. कारण तुमचे डोके सतत कशाततरी गुंतलेले असते. मोबईलचे व्यसन लागलेला व्यक्ती वास्तवातील समस्येला भिडताना सैरभैर होण्याची शक्यता असते. वास्तव जगाशी संवाद तुटल्याने 'मी-माझे' याच जगात ते वावरतात, जिथे ते सतत त्यांचे आनंद, दु:ख, प्रतिक्रिया ऑनलाइन मांडत असतात.

संशोधकांच्या मते, जर तुम्ही दिवसातील ७ तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोन, ipad, कॉम्पुटरवर व्यतीत करत असाल तर सामाजिक भावनांचे जाळे असलेल्या मेंदूच्या भागाची हानी होऊ शकते. यातूनच मग तुमच्या आकलनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या थरापर्यंत जाण्यापेक्षा वास्तवात आणि या निसर्गाचा आनंद घ्या.

एकावेळी एकच

जगातील मानसशास्त्रज्ञांचे एकमत आहे की, एकावेळी अनेक कामे – Multitasking मानवासाठी योग्य नाही. मानवाच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत.काही मानसशास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की सतत ऑनलाइन राहणे आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व मेंदूतील रासायनिक अभिक्रिया बदलवते. त्यामुळे आपण चिडखोर, अधीर हेकेखोर होतो.

नव्या युगाचे नवे ‘डिजिटल’ आजार:

    तुमच्या मोबईलची battery कमी होते किंवा बंद पडते तेव्हा तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नोमोफोबिया ग्रस्त आहात.
    जर तुमच्या खऱ्या किंवा कल्पित आजाराच्या लक्षणांसाठी तुम्ही इंटरनेटवर ‘सर्च’ करत असाल तर तुम्ही Cyberchondria चे बळी आहात.
    मोबाईल रिंगटोन वाजत नसतानाही तुम्हाला तसा वारंवार भास होत असल्यास Phantom Vibration Syndrome चे तुम्ही शिकार आहात.
    जर तुम्हाला इतरांना ऑनलाइन छळायला मजा येत असेल तर तुम्ही online Disinhibitation Effect ने ग्रस्त आहात.
    जर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट, update ऑनलाइन मांडत असाल तर तुम्ही Digital Goldfish च्या जाळ्यात अडकला आहात.

तंत्रज्ञान, नवी साधने वापरुच नये असे नाही पण त्यावर अतिविसंबून राहणे धोक्याचे! सतत गुगल वापरणे आणि माहिती मिळवणे म्हणजे मोठे कर्तृत्व किंवा हुशारी नाही. माहिती आणि ज्ञान यातील फरक समजला तरी धन्य! माहितीच्या प्रचंड महासागरातील लाटेवर स्वार होऊन गटांगळ्या खाण्यापेक्षा त्याचा विधायक वापर करून प्रगतीकडे वाटचाल करणेच योग्य.

संदर्भ : Times Of India

शासन निर्णय व परिपत्रके G.R. वर्ष 1962 ते 2008

Wednesday, October 12, 2016

द्विभाषीक पुस्तके download करा

http://mscert.org.in/index.php/2016-10-01-07-46-23पुस्तके Download click here
या लिंक वर क्लिक करून मराठी पुस्तकाच्या लिंक वर क्लिक करा व सर्व pdf सिलेक्ट करून डाऊनलोड करा

Monday, October 10, 2016

शालेय प्रार्थना

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jMXpUY1RRU0dUVzA/view?usp=drivesdk

समानार्थी शब्द

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jR3hyVVRaajNXaGM/view?usp=drivesdk

संगणकाची माहिती

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jLUVKejJIVWRmQXc/view?usp=drivesdk

शब्दांचा डोंगर

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jeVh4VmtSMWcwNzA/view?usp=drivesdk

कविता - बहिणाबाई चौधरी

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jQlZZOUpvMHEwT2c/view?usp=drivesdk

तक्ते

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jZElpaEsta1AyV1k/view?usp=drivesdk

टीचर

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jZ1J0VS10ME5fSlE/view?usp=drivesdk

श्यामची आई

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jOWt2OUFacFJHdFU/view?usp=drivesdk

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र G.R. 16/09/2016

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jbmR0ODZCaEZldUk/view?usp=drivesdk

ई - पुस्तके वाचन करा

http://www.esahity.com/

Sunday, October 9, 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र G.R. 22/06/2015

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jQjVBd256NjVFUG8/view?usp=drivesdk

नील्स बोर

नील्स बोर*
*भौतिकशास्त्रज्ञ*
*जन्म - ऑक्टोबर ७, १८८५*
नील बोरनी अणूच्या रचनेवर सिध्दांत मांडला.त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतिमध्ये अामूलाग्र सुधारणा घडवून आणल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली.
हर्ट्झ व फ्रांक यांच्या संशोधनावरून असे दिसून आले की, अणूवर इलेक्ट्रॉनाचा आघात होण्याकरिता आघाती इलेक्ट्रॉनामध्ये किमान ऊर्जा असावयास पाहिजे; जेणेकरून अणूमधील विशिष्ट इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतील. इलेक्ट्रॉनामधील किमान ऊर्जेला आयनीभवन वर्चस् असे म्हणतात. हे वर्चस् निरनिराळ्या मूलद्रव्यांसाठी निरनिराळे असते. प्रत्येक मूलद्रव्य प्रकाशाच्या विशिष्ट वर्णरेषा उत्सर्जित करीत असून त्या मूलद्रव्यातील अणूंच्या शक्य असणाऱ्या ऊर्जा-अवस्थेच्या श्रेणींशी तुल्य असतात. ⇨ नील्स बोर यांना या संशोधनाची पूर्वकल्पना आलेली होती आणि त्यांनी ⇨ पुंज सिद्धांता चा उपयोग करून अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती म्हणजे अणूचे स्वरूप स्पष्ट करणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला.

Friday, October 7, 2016

जॅक बोनियो

बाबांनी खेळणे दिले नाही, ८ वर्षांच्‍या मुलाने सुरु केले लिंबू पाण्याचे दुकान,
करतो १६ लाखांची उलाढाल
------------------------
दोन वर्षांपूर्वी जॅक बोनियो आठ वर्षांचा होता. त्याने वडिलांना एक खेळणे मागितले होते. ते महागडे असल्याने तू तुझे विकत घे, असे बाबांनी त्याला सांगितले. जॅकने पैसे जमवण्यासाठी बाबांच्याच मदतीने लिंबूपाण्याचे दुकान उघडले. ऐन उन्हाळा असल्याने योगायोगाने दुकान चांगलेच चालू लागले. विक्री वाढवण्यासाठी स्थानिक मंडईतही लिंबूपाणी विकले. पहिल्याच हंगामात जॅकने सव्वा लाखाचे लिंबूपाणी विकले. त्यात सुमारे साठ हजार रुपयांचा नफा झाला.

बोनियो कुटुंबाने या व्यवसायाला ‘जॅक स्टँड्स’ नाव दिले. आता जॅक दुकानांच्या शाखा सुरू करण्याच्या विचारात आहे. त्याने ‘यंग अमेरिकन्स बँके’कडून तीन लाखांचे कर्ज उचलले आहे. ही बँक मुलांनाच कर्ज देते. जॅकने वेबसाइट तयार केली आणि तीन मंडयांत दुकाने उघडली. काम वाढल्याने त्याने ७ ते ११ वर्षांपर्यंतची मुले सेल्स टीममध्ये ठेवली. सुट्यांत कमाईची इच्छा असलेली मुले त्याच्याकडे येऊ लागली. जॅक त्यांना स्टँडवर काम करणे, शिफ्ट संपल्यानंतर पैसे मोजणे, नफा-तोटा समजावून सांगू लागला. शिफ्ट संपल्यानंतर मुलांना विक्रीच्या हिशेबाने दोन ते तीन हजार रुपये सुटू लागले. गतवर्षी सुट्यांत ‘जॅक स्टँड्स’मध्ये 200 मुले काम शिकली.
जॅक आता 10 वर्षांचा आहे. त्याने यंग अमेरिकन्स सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला आहे. हे केंद्र 6 ते 21 वर्षे वयाच्या मुलांना अर्थशास्त्राचे बारकावे शिकवते.

जॅकला त्याच्या बाबांनी मदत केली, पण मुलाने मेहनत करावी, यावरही भर दिला. घराजवळ दुकान उघडले तेव्हा जॅक घरातील फ्रिजमधून बर्फ व कप तर नेणार नाही, याकडेही नजर ठेवली. म्हणजेच त्याने मेहनतीविना नफा मिळवला असता तर तो काहीच शिकला नसता. त्याला गणिताच्या मूलभूत बाबी शिकवल्या. शाळेतही त्याला याचा फायदा झाला. तो सध्या पाचवीत शिकतोय, पण सातवीची गणितेही सहजपणे सोडवतो. त्याला वस्तूंचे घाऊक भाव, विक्री कर परवान्याच्या अर्जाची पद्धत, बिझनेस रिलेशन सर्वकाही माहीत आहे. गतवर्षी जॅकने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला. काही दिवसांआधी त्याने ‘जॅक मार्केटप्लेस’ही उघडले. येथे 18 वर्षांपर्यंतच्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जातात.

कुरापती उंदीर

कुरापती  उंदीर।                        

एका  ठिकाणी एक मोठा  हत्ती शांतपणे  बसलेला असतो, तेवढयात  एक कुरापती ऊंदराला हत्तीला  चिडवयाचि  हुक्की  येते , तो आपल्या  बिळातुन  येऊन  तो हत्तीला  त्रास देवू  लागतो,  सुरवातीला  हत्ती  दुर्लक्ष  करतो,  पण  नंतर  ऊंदीराला  मजा येवू  लागते,  हत्तीला  त्रास  देण्यात,  हत्ती  जागेवरुन  ऊठतो आणी  ऊंदराला  मारण्या  साठी  त्याच्या  बिळाच्चा  दिशेने   आपल्या  डोक्याने टक्कर  मारू  लागतो,  ऊंदीर  आत  असल्याने ऊंदराला  काहीच  फरक पडत नाही, तो  परत  दुसरी  कडुन त्रास  देत  राहतो,  कारण ऊंदराला  पक्क  माहीत  होत  की  हा  हत्ती  प्रंचड ताकदवर  आहे, तसाच  त्याचा  राग  ही  प्रंचड आहे,  पण  तरीही  तो  आपनास  हरवु  शकत  नाही  ,  कारण  त्याचा  राग  आणी  अतिऊत्साऊ  पणाच त्याला  नडेल,  जितका  ऊंदीर  त्रास  देऊ  लागला,  तितका  हत्तीचा  राग अजुन  वाढु  लागला ,  आणी  आपन कुणाशी  भांडतो  कशासाठी  भांडतोय , हे  हत्तीच्या लक्षात आले  नाही, शिवाय ऊंदाराचे  तर  कामच  आहे  कुरापतीं  करणे,  आपन  तिकडे  लक्ष  न  देता  त्याच्याकडे   दुर्लक्ष  करूण  आपन  ऊंदराला  हरवु  शकतो हेही  हत्ती  विसरला,  ऊंदीर  आपल्याला  आपल्या  ऊद्देशापासुन  लांब  नेतोय  हे  पण  हत्तीच्या  ध्यानातच येत  नसते,  आणी  शेवटी  इतका  मोठा  बलाढ्य  हत्ती , ऊंदराच्या  फालतु  गोष्टीमुळे ,  हत्तीने  आपले  डोके  आपटुन  आपदुन आपला  जिव  गमवाला,,  आता  यात  ऊंदराचे काहीच  नुसकान झाले  का ?  नाही,  उलटे  ऊंदाराने  चागले स्वतःच  मनोरंजन करून  घेतले,  वरून  एका  बलाढ्य  हत्तीला  हरविण्याचा श्रेय  आणी  आनंद  मिळवला ,  हत्ति त्याच्या ताकदीच्या  गर्वाने  झुकवल  आणी बुद्धीने  काम करण थांबवल,  जर  वेळीच त्याने  विचार  केला  असता , आणी त्याप्रमाणे  वागला असता, तर  अस कोणही  त्याची  ताकद  आणी  रागाचा  गैरफायदा घेतला  नसता,,,,,

तात्पर्य,,,,,
   समाजात  पण  असच  होत  असत,  एकदा  का  कळाल  की  आपन गरम डोक्याचे आहात  आणी  रागा  मध्ये  भान  विसरून जातो,  तेव्हा छोटा ऊंदीर ही  आपला  नाश  करु  शकतो,,,,,,,                                     शांत रहा आणी  चांगला निर्णय घ्या , आपल्या  जीवनात  विजयी व्हा,,,,,,,

क्षणांचे सोने

(पु.लं.चा अतिसुंदर लेख)

क्षणांचे सोने...

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.

परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

💐💐💐💐💐💐💐

परिस्थितीची जाणीव

एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल. राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला. हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो." राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले. कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला. त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय." प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."  

Thursday, October 6, 2016

प्रेरक गोष्ट

** प्रेरक गोष्ट **एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूसठेवला .काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .दुसरा मात्र उडेचना.राजा काळजीत पडला ,अगदी सारखे दोन पक्षी एकभरारी घेतोय दुसरा थंड.काय करावे.. काय करावे..?राजाने दवंडी पिटविली,गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .दुसऱ्या दिवशी पहाटेसराजा बागेत आला,बघतो तो दुसरा गरुडपहिल्या पेक्षाही उंचगेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.हे अजब घडले कसे ?आणि केले तरी कोणी !एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला,"महाराज मी केले."राजा : अरे पण कसे ?शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.****तात्पर्य :आपली फांदी कधीतरी सोडून बघा.सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.कदाचित बाहेर अधिक सुंदरखुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.Change ur thought.....May change ur life...."विचार बदला, आयुष्य बदलेल !!!"

बंद मूठ

*बंद मूठ*
*प्रवीण दवणे*
भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, *"मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?"*
आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, "कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर! शेजारच्या घरात नवं बाळ आलंय - स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय!"
भाच्यानं माझा चांगलाच 'मामा' केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, *"अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी गंमत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख! एक ना दोन! जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा! देव म्हणतो, ही कला देतोय - मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते!"*
"म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच?"
*"परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात!"*
"अस्सं! माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं!"
"निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर!"
*आपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच! त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा - काका - आई - बाबा होता येणं हीही कलाच! मूठ उघडून बघा तरी...*

Wednesday, October 5, 2016

ज्ञानरचनावाद - संपूर्ण संकल्पना

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jOGZROGRhT1JKZmc/view?usp=इगdrivesdk

शालेय नवोपक्रम

*शालेय नवोपक्रम*


नवोपक्रम व्याख्या

📚📚📚📚📚📚📚

पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळा, नाविण्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशिल उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय

☘☘☘☘☘☘☘☘

नवोपक्रम कशासाठी?

 📚वेगळ्या वाटेने चालणार्‍या, आगळा वेगळा विचार करणार्‍या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याकरीता संधी मिळते

📚विद्यार्थांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली समस्या स्व—प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी.

📚 धडपडणार्‍या व उत्कृष्टतेचा ध्यास असनार्‍या  शिक्षकाने सातत्याने  स्व—प्रेरना मिळवित राहण्याकरीता

💐💐💐💐💐💐💐💐

नवोपक्रम करणार्‍या शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत

👇🏾👇🏾

♨कल्पकता♨चिकाटी

♨ सर्जनशीलता♨सकारात्मक दृष्टीकोण♨चिकीत्सक♨स्वयंप्रेरणा

🌴🌴🌴🌴🌴🌴

नवोपक्रम निकष📝📝

👇🏾👇🏾

१)नवीनता


अ)कालसापेक्ष नवीनता

ब)स्थलसापेक्ष नवीनता

क)व्यक्तीसापेक्ष नवीनता


२)यशस्वीता


३)उपयुक्तता

❇❇❇❇❇❇❇❇❇


नवोपक्रम कार्यवाही टप्पे

👇🏾👇🏾👇🏾

१)समस्यांची यादी.


२)कारणे.


३)शीर्षक.


४)उद्दिष्टे.


५)नियोजन.


६)कार्यवाही.


७)माहितीचे संकलन.


 ८)यशस्वीता.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


नवोपक्रम अहवाल लेखनाची मुद्दे

👇🏾👇🏾

१)शीर्षक

२)नवोपक्रमाची माझी गरज

३)नवोपक्रमाची माझी उद्दिष्टे

४)नवोपक्रमाचे नियोजन

५)उपक्रमाची कार्यवाही

६)यशस्वीता

७)समारोप

८)संदर्भग्रंथ व परिशिष्टे

९)अहवाल लेखनाचे फायदे

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

नवोपक्रम यादी 👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾➖➖➖➖➖➖➖

१.जो दिनांक तो पाढा

२.पेपरलेस प्रशासन

३.शब्द संग्रह वाढवणे

४.प्रोजेक्ट ई लर्निंग

५. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे

६.   दिवस नवा, भाषा नवी

७ पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती


८.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह

९.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण

१०.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती

११.. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक करणे

१२रद्दीतुन ग्रथालय

१३. एक तास राष्ट्रासाठी

१४.  भाषिक प्रयोगशाला

१५.  पर्यावरण संरक्षक दल

१६. सौरऊर्जा जागरुकता व वापर

१७.  विषय खोली

१८. आम्ही स्वच्छता दूत

१९  तंबाखु मुक्त शाळा

१७.  प्लास्टिक मुक्त शाळा

२०.  विज्ञान भवन

२१.  मैत्री अंकाची , संख्यांची

२२.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन करणे

२३.  एक दिवस गावासाठी, समाजाकरीता

२४  विषय कोपरा - प्रभावी माध्यम

२५.  विशेष विद्यार्थी कोपरा

२६  पुस्तक भिशी

२७.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प

२८.  स्वच्छता  दूत

२९.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा.

३१.  हरित शाळा.

३२.  प्रदूषण हटवा अभियान राबवणे

३३.  चालता बोलता प्रश्न मंजुशा घेणे.

३४. माझा मित्र परिवार

३५. माझे पूर्व ज्ञान

३६. शब्दगंगा

३७. कौन बनेगा ज्ञानपती

३८. वर्ड पॉट

३९.सुंदर हस्ताक्षर मोहिम

४०.  संख्यावरील क्रिया - एक छंद

४१.  प्रश्नमंजूषा

४२.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास

४३.  बालआनंद मेळावे

४४.  सातत्य पूर्ण उपस्थिती

४५.  पुस्तक जत्रा

४६.  फन एंड लर्न

४७.  शंकापेटी

४८. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध

४९.  रोपवाटिका निर्मिती

५०. एक तास इंटरनेट

५१  गांडूळ खत निर्मिती

५२  आजचा  बेस्ट मुलगा

५३.  एक तास मुक्त अभ्यास

५४. समस्या व सूचना पेटी

५५. किशोरवयीन मुलींचे शिक्षण

५६.  लोकसंख्या शिक्षण

५७.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव

५८.  वाचाल तर वाचाल

५९.  बिखरे मोती

६०. पुस्तका करीता एक दिवस

६१.  गावातील विशेष व्यक्तींच्या मुलाखती.

६२.  बालसभा आयोजन

६३.  माझ्या गावचा इतिहास

६४.  परिसरातील भूरुपांची ओळख

६५.  विविध शिबीरांतून विविध प्रकारची यादी करणे.

६६.औपचारीक गप्पा

६७.कथालेखन

६८.कविता लेखन

६९.वाढदिवस ,दिनविशेष च्या माध्यमातुन नैतिक मुल्य रुजवणे

७०.परीसरातील बिया गोळा करणे

७१.अप्रगत करीता ओंजळीणे ग्लास भरणे

७२.प्राण्यांची यादी तयार करणे

७३. बाजार भेट

७४. दुकानातील, बाजारातील,ई. वस्तुंची यादी तयार करणे

७५. टाकावू पासुन टिकावू वस्तु तयार करणे

७६. नाणी नोटांचा संग्रह करणे

७७.एक झाड लावू मिञा.

७८.आपले सण आपली झाडे

७९.मनोरंजनात्मक खेळ

८०.सांस्कृतीक कार्यक्रम

८१.माता प्रबोधन

८२.आनंद दायी शिक्षण

८३.बालमंद्वारे व्यक्तीमत्व विकास

८४.औषधी वनस्पतीची ओळख

८५.गितांचा संग्रह करणे.

८६.निबंध स्पर्धा

८७.वत्तृत्व स्पर्धा

८८.निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे

८९.कागदी पिशव्या तयार करणे

९०.शोभिवंत झाडाच्या कुंड्या तयार करणे.

सत्याचे प्रयोग (अात्मकथा) - महात्मा गांधी

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jb2Z6ek40TmR3R28/view?usp=drivesdk

प्रगत शाळेनंतर पुढे काय.....?

*प्रगत शाळेनंतर पुढे काय............?*
*आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करण्याची  प्रत्येक जिल्ह्यतील शंभर शाळाना संधी*
मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, श्री नंदकुमार साहेब यांची राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेस भेट देऊन आता शाळाना आंतरराष्ट्रीय होण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.
1) महाराष्ट्रातील शाळांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची इच्छा बाळगावी व ही क्षमता महाराष्ट्रातील शाळांमध्ये असल्याचा विश्वास. दर्जा सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांनी PISA, PULSE व STEAM यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी चमकावेत.
2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा करीत असतांना पहिल्या दहा क्रमांकामध्ये शाळा आणण्याचे ध्येय उराशी बाळगण्याचे आवाहन. हिमाचल प्रदेश व तामिळनाडू यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ७४ वा क्रमांक मिळविला असल्याचे प्रतिपादन. महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय दर्जाची योग्यता संपादन करण्याचे आवाहन.
3) काही मुठभर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कसे देता येईल यावर विचार करण्याचे आव्हान. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा सर्व बालकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन.
4) CSR च्या माध्यमातून शाळा आंतरराष्ट्रीय करण्याची दूरदृष्टी मा.नंदकुमार साहेबांनी दिली. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या विदेशी शाळांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय स्पर्धा करण्यासाठी अधिक पटांच्या शाळांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन.
5) राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था राबवीत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती मा.नंदकुमार साहेबांनी घेतली. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीमध्ये मदत होण्यासाठी मराठी-इंग्रजी शब्दकोषाच्या वापरास प्रोत्साहन देण्याची सुचना. संस्था राबवीत असलेल्या Spoken English project च्या यशाबद्दल मा. नांदकुमार साहेबांनी सर्वांचे अभिनंदन केले. पालकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व बालकांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संभाषण करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचा पुनरुच्चार.
6) Continuous Professional Development साठी शिक्षकांच्या कार्यगटांची (Teachers’ Activity Groups) स्थापना व कार्यपद्धती, व यामध्ये ब्रिटीश कौन्सिल व राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था यांची भूमिका मा.नंदकुमार साहेबांनी समजून घेतली. TEJAS प्रकल्पांतर्गत TAG मधील विविध कृती,उपक्रम मा.साहेबांनी समजून घेतले व शिक्षकांचा व्यावसायिक विकास शाश्वत कसा होईल व त्याद्वारे विद्यार्थी विकास कसा होईल याकडे लक्ष वेधले.
7) पालकांच्या इंग्रजीबाबत अपेक्षा पूर्तीसाठी विविध उपक्रम व चाचण्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्यास कशा मदत करू शकतील याबद्दल विचार करून अंमलबजावणी करण्याची व्हावी
या वेळी बैठकीला मा भाऊसाहेब तुपे शिक्षण  उपसंचालक मा रहीम मोगल शिक्षणाधिकारी प्रा, मा भगवान सोनवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक,मा MK देशमुख
SIEM मधील सर्व अधिकारी कर्मचारी आणि SARPs उपस्थित होते.
या वेळी siem मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण डॉ उज्ज्वल करवंदे
यांनी केले
डॉ सुभाष कांबळे
संचालक,राज्य आंग्ल भाषा औरंगाबाद

ज्ञानरचनावाद फरशीवरील फोटो





















Tuesday, October 4, 2016

साळु व साप

📝🍃📝🍃📝🍃📝🍃
➖➖➖➖➖➖
     *साळु व साप*
〰〰〰〰〰〰
*मला आपल्या बिळात जागा द्याल तर* मी तुमची फार आभारी होईन.' अशी एका साळूने सापांना विनंती केली.
          सापांनी अविचारांनी ती तिची विनंती मान्य करून तिला आपल्या बिळात येऊ दिले. ती आत शिरताच तिची काट्यासारखी तीक्ष्ण पिसे अंगास रुतून सापांना फार दुःख झाले.
          मग ते तिला म्हणाले, 'साळूबाई, आता तुम्ही येथून जाल तर बरं होईल. तुमचा हा उपद्रव आमच्याच्याने सहन करवत नाही.' हे ऐकताच साळू म्हणाली, 'मी का जाईन ? मला तर ही जागा फार आवडली, ज्यांना ती आवडत नसेल त्यांनी पाहिजे तर खुशाल जावं.'
〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *काही लोक इतके दुष्ट असतात की एकदा त्यांना दुसर्‍याच्या घरी आश्रय मिळाला की हळूहळू त्याला घरातून बाहेर काढून ते घर ते बळकावून बसतात.*
➖➖➖➖➖➖

Monday, October 3, 2016

बैल आणि चिलट

🌻*बैल आणि चिलट*🌻

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!

🌿🌿तात्पर्य🌿🌿
👉*काही लोकांना आपण फार मोठे आहोत असे वाटते. पण लोक त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत*.

बेअरफुट काॅलेज, तिलोनिया



जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली.

त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला.

त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती.

‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

Sunday, October 2, 2016

मोहनदास करमचंद गांधी

*मोहनदास करमचंद गांधी*

जन्म: ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत

मृत्यू: जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, भारत

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस

पुरस्कार: टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती

प्रमुख स्मारके: राजघाट

धर्म: हिंदू

प्रभाव: लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले

पत्नी नाव: कस्तुरबा गांधी
अपत्ये: हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास


मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.         नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

 १९१५ मध्ये असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली, गांधीजींची "अर्धनग्न फकीर" म्हणून कुचेष्टा केली होती. (It is alarming and also nauseating to see Mr. Gandhi, a seditious Middle Temple lawyer of the type well-known in the East, now posing as a fakir, striding half naked up the steps of the Viceregal palace to parley on equal terms with the representative of the King-Emperor.) त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.

२ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.

गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगितावादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते.

Saturday, October 1, 2016

इ.१ली ते ८वी विषय प्रकल्प यादी

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*
*संकलन - शरद कोतकर*

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

*भाषा -:*
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.  
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.


*गणित -:*
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.


*सामान्य विज्ञान -:*
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.


*इतिहास व ना.शास्त्र  -:*
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.


*भूगोल -:*
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Student Portal

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *३० सप्टेंबर २०१६*
(अतिमहत्वाची माहिती असल्याने सर्वांना share करावी ही विनंती)

             *student पोर्टल विशेष*

या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी भरलेली माहितीच्या आधारे होणार हे निश्चित झाले होते परंतु अद्याप काही शाळाचे पेंडिंग काम लक्षात घेता आज दिनांक 29 सप्टेंबर २०१६ रोजी *मा.डॉ.श्री सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक बालभारती* यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटिंग मध्ये ही अंतिम मुदत *दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६* रोजी पर्यंत सर्व शाळांना वाढवून देण्यात आलेली आहे.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री १२ वाजेनंतर सर्व शाळांचे online माहिती भरण्याची सुविधा बंद करून शाळेच्या अंतिम पटाची माहिती cluster login ला verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तत्पूर्वी सर्व शाळांनी आपली माहिती व्यवस्थितरीत्या भरून पूर्ण करावी.आपण भरलेली माहिती जी *७ ऑक्टोंबर २०१६ ला cluster login ला system द्वारे automatic forward केली जाणार आहे* .दिनांक १ ऑक्टोंबर पासून मुख्याध्यापक login ला संच मान्यता या नावाची tab उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये आपली कोणती माहिती cluster ला पाठवली जाणार आहे याविषयीचा सविस्तर report दाखवला जाणार आहे.हा report पाहून मुख्याध्यापकाने आपल्या माहितीची खातरजमा करावी आणि कमी जास्त असलेली माहिती update करून घ्यावी.दिनांक ७ ऑक्टोंबर २०१६ रोजी मध्यरात्री सदर माहिती system द्वारे verify करण्यासाठी केंद्रप्रमुखांना verify करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुख्याध्यापकांना सदर माहिती cluster लेवल ला forward करण्याची आवशकता नाही,ती माहिती system द्वारे पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे दिनांक ७ ऑक्टो २०१६ रोजीपर्यंत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अचूक माहिती भरून पूर्ण असणे गरजेचे आहे.यामध्ये कोणकोणती माहिती भरून पूर्ण असावी आणि ती कशा रीतीने पूर्ण करावी याबाबत सदर पोस्ट मध्ये सुचना करण्यात येत आहे,तरी सदर पोस्ट सविस्तर रीत्या सर्वांनी वाचावी अशा सुचना देण्यात येत आहे.

                  *New Entry*

*अ) इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती system ला भरणे* : या वर्षी नव्याने इयत्ता १ ली ला प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व मुलांची माहिती offline excel शीट द्वारे भरण्याची सुविधा मुख्याध्यापक login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.मुख्याध्यापकाने सदर माहिती भरताना मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करून घ्यावी.आणि सदर शीट मध्ये offline पद्धतीने इयत्ता १ ली च्या सर्व मुलांची माहिती अचूक भरावी.आणि सदर शीट ही .csv(comma delimited) या format मध्ये रुपांतरीत करावी आणि पुन्हा मुख्याध्यापक login मधून excel या tab मधून upload personal या बटनावर क्लिक करून सदर file upload करावी.ही माहिती भरत असताना काही शाळांना नविन तुकडी तयार करण्यासाठीचा error दाखवण्यात येत आहे.ज्या शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार करून पुन्हा delete केल्या आणि पुन्हा दुसरी तुकडी तयार केली आहे अशा शाळांना सदर error येत आहे.अशा शाळांनी excel या tab मधून download personal या बटनावर क्लिक करून एक excel शीट download करताना त्या सोबत एक word या format मध्ये असणारी read me file download होते ती काळजीपूर्वक वाचावी.या file मध्ये ६० ते ६२ व्या ओळीमध्ये आपल्या शाळेत पुढील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.आपणास सदर माहिती उदाहरणार्थ म्हणून दाखवण्यात येत आहे.ती वाचावी.

Select division number as,

*Stream* : Not Applicable
*Division No.* : 1
*Division* : A
*Medium* : Marathi

अशा प्रकारे आपल्या शाळेत इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती भरताना stream,division no. , division आणि medium कोणते भरावे हे त्या word format मध्ये असणाऱ्या *read me* या file मध्ये देण्यात आलेले आह.अगदी त्याचप्रमाणे आपण मुलाची माहिती भरताना सदर माहिती भरावी.आणि त्यानंतर .csv format मध्ये सदर file रुपांतरीत करून system ला अपलोड करावी.म्हणजे आपणास वरील error येणार नाही.

काही विद्यार्थी हे मागील वर्षी १ ली होते आणि या वर्षी ते इयत्ता २ री ला आहेत परंतु पालकाने सदर मुलाला जुन्या शाळेतून काढून दुसऱ्या नविन शाळेत दाखल केले आहे परंतु अशा मुलाला त्यांनी नविन शाळेत इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे.अशा मुलांची मागील वर्षी नोंद झालेली असताना नविन शाळा पुन्हा १ ली ला new entry या सुवीधेमधून नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.अशा शाळांनी हे लक्षात घ्यावे की आपण अशा मुलांची duplicate entry तयार करत आहात.हे योग्य नाही आहे.तरी अशा मुलांच्या बाबतीत अशा नविन शाळांनी जुन्या शाळेस ट्रान्स्फर ची request पाठवावी आणि सदर मुलाला standard updation या बटनावर क्लिक करून इयत्ता २ री तून इयत्ता १ ली करून घ्यावी.जुन्या शाळेतून नविन शाळेने दाखला घेतला नसेल तरी जुन्या शाळेने सदर मुलाला ट्रान्स्फर करन्यास हरकत नाही आहे.परंतु कोणत्याही परिस्थितीत नविन शाळेने कोणत्याही विद्यार्थ्यांची माहिती duplicate होणार नाही याची नोंद घ्यावी.अन्यथा अशी duplicate entry असलेले मुले हे संचमान्यता साठी गृहीत धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 
*ब) इयत्ता २ ते १२ वी च्या मुलांची जी मुले मागील वर्षी student पोर्टल मध्ये नोंदवली गेली नाही आहे अशा मुलांची माहिती new entry म्हणून भरणे* :
   सन 2015-16 मध्ये आपण सरल मध्ये आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे,ही माहिती भरत असताना अनावधानाने काही विद्यार्थ्याची नोंद सरल ला करायची राहून गेलेली आहे.सन 2016-17 या वर्षी फक्त 1 ली च्या नवीन मुलांची माहिती offline पद्धतीने सरल मध्ये नोंदवण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.परंतु मागील वर्षीचे राहिलेले विद्यार्थी आणि या वर्षी नव्याने दाखल झालेले इतर वर्गातील मुले *(परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission)* या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा beo लॉगिन द्वारे शाळेला उपलब्ध करून दिली आहे.जर आपल्या शाळेत असे विद्यार्थी नोंद करावयाचे राहिले असतील तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी म्हणजेच beo लॉगिन ला विनंती करावी की ही सुविधा आमच्या शाळेला उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सदर शाळेला ही सुविधा देणे गरजेचे आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि *खात्री करून* ती सुविधा आपल्या लॉगिन मधून उपलब्ध करून देतील,तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर ती शाळा त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वर्गातील मुलांची माहिती ही online भरू शकतील याची नोंद घ्यावी. *गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून एका वेळेला केवळ ३० शाळेलाच ही परवानगी देऊ शकत होते परंतु आता अशी मर्यादा १०० पर्यंत वाढवण्यात आलेली आहे* .ज्या शाळेला परवानगी दिली जाईल त्या शाळेला beo यांनी दिलेल्या विहित वेळेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ही सुविधा त्या त्या शाळेला असेल हे beo त्या शाळेला परवानगी देताना ठरवू शकतील,तसे option त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.शाळेला अशी माहिती भरण्यासाठी किती काळ द्यावा हे beo यांनी काळजीपूर्वक ठरवावे जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळेची माहिती ही *दिनांक ०७ ऑक्टोंबर २०१६* पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाची आहे याची गामभीर्याने नोंद घ्यावी.अशा प्रकारे beo यांनी त्वरित या सुविधेचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांना ही सुविधा शहानिशा करून उपलब्ध करून द्यावी.Beo login मधून सदर काम कसे करायचे याबाबत चे *मराठी मॅन्युअल* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.कृपया या ब्लॉग ला भेट द्यावी.तसेच या सुविधेचा वापर करून काही शाळा इतर शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याना ट्रान्सफर करून न घेता या सुविधेमधून add करत आहे अशा शाळेंना सूचना आहे की अशा पद्धतीने आपण जर विद्यार्थी add करून घेतले तर ते विद्यार्थी सिस्टिम द्वारे यथावकाश काढण्यात येतील.त्यामुळे भविष्यात जर आपले हे विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसले नाही तर यासाठी केवळ संबंधितास जबाबदार धरले जाईल याची गाम्भीर्याने नोंद घ्यावी तसेच असे विद्यार्थी संच मान्यतेसाठी गृहीत धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपण भरलेल्या प्रत्येक मुलाचे verification होणार आहे याची नोंद घ्यावी.

*महत्वाचे* : आपल्या शाळेला आलेली विद्यार्थी ट्रान्स्फर request ही approve करणे हे सर्व शाळांवर बंधनकारक आहे.जर एखाद्या मुलासाठी ज्या शाळेने request पाठवायला हवी परंतु त्या ऐवजी दुसऱ्याच शाळेने request पाठवली असेल तर सदर विद्यार्थी जोपर्यंत approve अथवा reject होत नाही तोपर्यंत कोणत्याही शाळेस अशा विद्यार्थ्यांसाठी request पाठवण्यासाठी दिसत नव्हता.अशा वेळी नविन शाळेला असे वाटत होते की सदर विद्यार्थ्याची मागील वर्षी नोंद झालेली नाही आहे तरी आपण या विद्यार्थ्यांची new entry म्हणून नोंद करून घ्यावी.असे वाटणे सहाजिक आहे हे लक्षात घेऊन आता अशा केस मध्ये एक नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.जर एखाद्या शाळेने आपल्या आधी student ट्रान्स्फर ची request पाठवली असेल तरी तो विद्यार्थी आता इतर शालेना देखील दिसून येईल.त्या विद्यार्थ्याला इतर कोणत्या शाळेने request पाठवली आहे हे देखील दिसेल.अशा मुलाच्या बाबतीत त्यांच्या गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांची संपर्क माहिती आपणास दाखवण्यात येणार आहे जेणेकरून आपण सदर गटशिक्षणाधिकारी याना संपर्क करून सदर request ही reject करण्यास सांगु शकाल जेणेकरून request पाठवण्याकरता सदर विद्यार्थी त्याच्या नविन शाळेस उपलब्ध होऊ शकेल.

तसेच कालपासून सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या login मध्ये student search करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मधून student सरल id असलेले विद्यार्थी परंतु student पोर्टल मध्ये दिसत नसलेले विद्यार्थी शोधता येतील.

      *३)विद्यार्थी out of school करणे*

      मागील वर्षी student पोर्टलमध्ये नोंद केलेले आपल्या शाळेतील मुले काही कारणास्तव शाळा सोडून गेले आहेत आणि अशा मुलांना त्या वर्गाच्या पटामधून कमी करणे गरजेचे आहे यासाठी एक नविन सुविधा म्हणजेच त्या विद्यार्थ्याला out of school करण्याची सुविधा student पोर्टल मध्ये मुख्याध्यापक login मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील माहिती वाचा.

सर्वप्रथम आपल्या शाळेचे login करावे आणि maintenance tab मधील update standard data या बटनावर क्लिक करावे.यानंतर दिसून येणाऱ्या Type या tab मधील out of school हा पर्याय निवडावा आणि select reason मध्ये  विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेतून म्हणजेच या वर्षी लागणाऱ्या संच मान्यतेसाठीच्या विद्यार्थी संख्येमधून कमी करण्यासाठी ज्या कारणामुळे कमी करणार आहोत ते कारण select करावे.
सदर कारणामध्ये खालील कारणांचा समावेश करण्यात आलेला आहे.

*Absent Since Long Period* : असे विद्यार्थी जे बऱ्याच दिवसापासून शाळेत येत नाही.(कायम गैरहजर)

*Couldn’t Continue Higher Education* : पुढील शिक्षण पूर्ण करू शकला नाही आणि शाळा सोडून गेला आहे असे विद्यार्थी.

*Died* : मयत विद्यार्थी.

*Don’t Have Higher Standard And Not Requested For Transfer* : शिक्षणासाठी पुढील वर्ग उपलब्ध नाही आणि इतर शाळेत शिकण्यास गेला नाही किंवा नवीन शाळेत शिकण्यास गेला आहे पण नविन शाळेची ट्रान्स्फर ची विनंती आलेली नाही असे विद्यार्थी.

*Not Required Transfer* : विद्यार्थी ट्रान्स्फर ची आवशकता नसलेले विद्यार्थी.

*10th Fail* : १० वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

*12th Fail* : १२ वी इयत्ता अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

*12th pass* : १२ वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी.

select reason मध्ये वरील योग्य कारणाचा पर्याय निवडावा आणि त्या समोर असलेल्या Enter Remark या बटनासमोर असलेल्या रकान्यात शक्य असेल तर शेरा (remark) लिहावा.

यानंतर आपणास ज्या विद्यार्थ्याला कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्याला शोधावयाचे आहे.तो विद्यार्थी शोधण्यासाठी आपण दिलेल्या कोणत्याही पर्यायाचा वापर करू शकाल.अशा विद्यार्थ्यास शक्य तो त्याच्या standard निहाय शोधणे योग्य असते. यामध्ये शैक्षणिक वर्ष,इयत्ता,शाखा आणि तुकडी या बटनासमोर आपणास लागू असलेला पर्याय निवडा आणि शेवटी असलेल्या submit  बटनावर क्लिक करा.शेवटी असलेल्या submit  बटनावर क्लिक केल्यावर विद्यार्थी यादी  उपलब्ध होते.ज्या विद्यार्थ्याला आपणास कमी करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यास आपण select करून घ्यावे.विद्यार्थ्यास select केल्यावर शेवटी असणाऱ्या submit बटनावर क्लिक करावे.त्यानंतर विद्यार्थी त्या तुकडीमधून out of school केलेला आहे अशा अर्थाची सुचना पहावयास मिळेल.म्हणजेच विद्यार्थ्यास out of school करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असे समजावे.

आता सदर विद्यार्थी आपल्या शाळेच्या सन २०१६-१७ च्या कॅटलॉग  मध्ये दिसून येणार नाही हे लक्षात घ्यावे.विद्यार्थी out of school केला म्हणजे system मधून कायमचा delete केलेला आहे असे समजणे चुकीचे आहे.out of school केलेले विद्यार्थी हे फक्त या वर्षीच्या संचमाण्यतेसाठी गृहीत धरण्यात येणार नाही आहे.असे विद्यार्थी पुन्हा शाळेत आणण्यासाठी शाळेने प्रयत्न करावयाचे आहेत.तसेच सदर मुलांची यादी ही सर्व login ला दाखवण्यात येणार आहे.
महत्वाचे : चुकून एखादा विद्यार्थी हा out of school झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा त्याच शाळेत घेता येईल.तसेच out of school   केलेले विद्यार्थी इतर शाळेला ट्रान्सफर साठी उपलब्ध असतील हे लक्षात घ्यावे.
तसेच विद्यार्थ्याला out of school कसे करावे याबाबत whatsapp वर बऱ्याच वेगवेगळ्या पोस्ट share होताना दिसत आहेत.सदर माहिती ही केवळ समजुतीचा घोटाळा आहे. *काही post मध्ये विद्यार्थ्याला notknown तुकडीत update केल्याने विद्यार्थी out of school करता येईल असे सांगण्यात आलेले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे* .तरी सर्वांना सूचित करण्यात येत आहे की अशा कोणत्याही पद्धतीने विद्यार्थी out of school करू नये.आणि जर या चुकीच्या माहितीच्या आधारे जर यापूर्वीच आपण सदर विद्यार्थी out of school केला असेल तर तर आता वरती सांगितलेल्या पद्धतीने विद्यार्थ्यास out of school करावे.अधिकृत सुचना आणि post व्यतिरीक्त कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये अशा सुचना या post द्वारे देण्यात येत आहे.

महत्वाचे : out of school चे काम कसे करावे हे समजून घेण्यासाठी कृपया आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या. अथवा out of school चे manual mobile मध्ये download करून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लीक करा.
*लिंक* :  https://goo.gl/ZnYYRR

                     *४)प्रमोशन*

इयत्ता १ ते ८ चे system द्वारे *ऑटो प्रमोशन* आणि इयत्ता ९ ते १२ चे मुख्याध्यापकाने करावयाचे *manual प्रमोशन* या दोन प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन होणे अपेक्षित होते.परंतु हे प्रमोशन होत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रमोशन होऊ शकले नाही त्यासाठी प्रमोशन मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे,हे बदल समजून घ्यावेत.

अ) इयत्ता १ ते ८ चे ऑटो प्रमोशन केल्यावर देखील काही मुलांचे प्रमोशन अद्याप झालेले नाही अशा मुलांचे प्रमोशन होऊ न शकल्याने सदर मुले हे कॅटलॉग मध्ये सं २०१५-१६ ला दिसत आहे.त्यामुळे सन २०१६-१७ च्या होणाऱ्या संच मान्यतेसाठी सदर मुलांना system गृहीत धरणार नाही त्यासाठी या मुलांना सन २०१६-१७ या वर्षीच्या कॅटलॉग मध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.ही मुले २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये कसे घेऊन जावे यासाठी पुढील केस चा विचार करून काम करावे.

*जर विद्यार्थी सध्या आहे त्याच वर्गात दिसत असेल म्हणजेच योग्य वर्गात दिसत असेल परंतु २०१५-१६ च्या कॅटलॉगला दिसत असेल तर अशा मुलांना आपण प्रमोशन या सुविधेचा उपयोग करून पुढील वर्गात घेऊन जावे.अशा रीतीने तो विद्यार्थी आता सं २०१६-१७ च्या कॅटलॉग मध्ये दिसेल परंतु तो विद्यार्थी त्याच्या आहे त्या वर्गापेक्षा पुढील वर्गात दिसून येईल.त्यासाठी मुख्याध्यापक login ला असलेल्या standard change या बटनाचा वापर करून आपण सदर मुलास पुन्हा आहे त्या वर्गात घेऊन येऊ शकाल.
या ठीकानी एक बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे की student प्रमोशन मध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष बदलते परंतु student ट्रान्स्फर मध्ये आणि standard अपडेशन मध्ये मात्र शैक्षणिक वर्ष बदलत नाही याची नोंद घ्यावी*

*जर विद्यार्थी २०१६-१७ च्या कॅटलॉग ला दिसत आहे परंतु मागील वर्गात आहे अशा मुलांना आपण standard अपडेशन या सुविधेद्वारेच पुढील वर्गात घेऊन जावे.अशा केस मध्ये student प्रमोशन करू नये.अशी मुले आपणास प्रमोशन मध्ये दिसणार नाही* .

*जर विद्यार्थी २०१६-१७ च्या कॅटलॉग ला दिसत आहे परंतु खऱ्या वर्गापेक्षा पुढील वर्गात दिसत आहे अशा मुलांना आपण standard अपडेशन या सुविधेद्वारेच मागील वर्गात घेऊन यावे* .

*महत्वाचे* : जे विद्यार्थी आपणास २०१५-१६ च्या कॅटलॉग मध्ये दिसत आहे परंतु आता ते विद्यार्थी manual प्रमोशन करताना मात्र दिसत नाही असे फार थोडे विद्यार्थी आहेत असे दिसत आहे.फक्त अशा केस मधील विद्यार्थी आपण आम्हाला त्वरीत कळवावे.यासाठी आपण idreambest@gmail.com या आय डी वर email करू शकाल.आपली समस्या सोडवण्यात येईल अन्यथा या  http://goo.gl/9vBAQ8  लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला आपली समस्या कळवा.ती दूर केली जाईल.

ब) इयत्ता ९ ते १२ वीच्या manual प्रमोशन मध्ये प्रमोशन करताना काही शाळांनी इयत्ता १० वीचे प्रमोशन ११ वी ला करताना same school ला करण्याऐवजी चुकून different school ला केले आहे आणि आता ते मुले त्याच शाळेत same school ला हवी आहेत अशा केस मध्ये ही मुले त्या शाळेला दिसत नाही.अशा केस मध्ये बऱ्याच शाळा इतर शाळांना ही मुले ट्रान्स्फर करतात आणि पुन्हा आपल्या शाळांना परत ट्रान्स्फर करून मुलांना आपल्या शाळेत आणतात.कारण different school ला प्रमोट केलेली मुले ही जरी त्या शाळेला दिसत नसतील तरी इतर शाळांना ही मुले ट्रान्स्फर साठी दिसतात.ही प्रोसेस पूर्णपणे चुकीची आहे हे लक्षात घ्यावे.अशा मुलांना पुन्हा आपल्या शाळेत दाखवण्यासाठी येत्या दोन दिवसात आपणास नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,त्या द्वारे आपण सदर मुलांना आपल्या शाळेत दाखवू शकाल याची नोंद घ्यावी.

१० वी आणि १२ वी चे विद्यार्थी जर प्रमोशन करून देखील त्याच वर्गात दिसत असेल तर असे विद्यार्थी वरील email id वर मेल द्वारे कळवा अन्यथा या http://goo.gl/9vBAQ8  लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला आपली समस्या कळवा.ती दूर केली जाईल.

            *५) Student Transfer*

विद्यार्थी जर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी गेला असेल तर नविन शाळेने जुन्या शाळेस student पोर्टल मध्ये त्या विद्यार्थ्याची भरलेली माहिती online ट्रान्स्फर करण्यासाठी request पाठवावी.सदर request जुनी शाळा खात्री करून approve करेल.त्यानंतर ट्रान्स्फर झालेली सदर मुलाची माहिती ही नविन शाळा update करेल आणि सदर विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
परंतु या प्रोसेस मध्ये खालील प्रकारच्या केस दिसून येत आहे.

 *नविन शाळांनी जुन्या शाळेस request न पाठवणे* :

या केस मध्ये जुन्या शाळेच्या पटावर तो मुलगा दिसून येत आहे पण खर आर तो मुलगा शिकण्यासाठी इतर शाळेमध्ये गेलेला आहे.अशा जुन्या शाळांनी सदर मुलगा maintanance  या tab मध्ये जाऊन update standard data या tab चा वापर करून सदर मुलास out of school करून घ्यावे.अशाने सदर मुलगा आपल्या कॅटलॉग मध्ये दिसणार नाही आणि जेंव्हा नविन शाळा त्या विद्यार्थ्याची ट्रान्स्फर साठी request करेल तेंव्हा या मुलांना जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाने ट्रान्स्फर करावे.  out of school कसे करावे हे जाणून घेण्यासाठी या post मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहेच.तसेच अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या तेथे या विषयीचे manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

*ट्रान्स्फर साठी आलेली request approve न करणे* :

काही शाळा अद्याप देखील आपल्या शाळेस आलेल्या request या approve करत नाही असे दिसते.अशा केस कारण नसताना नविन शाळेस विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसत नाही आहे.त्यामुळे आपल्या संच मान्यतेसाठी सदर विद्यार्थी येईल की नाही अशी भीती या शाळांना वाटत आहे.परंतु नविन शाळेने अशा बाबतीत अजिबात न गोंधळता संयमाने घ्यावे.बऱ्याच शाळा अशा मुलांना new entry द्वारे नोंद करून duplication करत आहे.हे योग्य नाही आहे.एकत्र ज्या शाळा आपल्याला आलेल्या request approve करत नाही आहे अशा मुख्याध्यापकाला आणि त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांना यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्व शाळांनी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी आपणास आलेल्या सर्व request त्वरीत approve कराव्यात अशा सूचना मा.डॉ.मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य यांच्याकडून परवा झालेल्या व्ही सी मध्ये दिलेल्या आहेत.

*विद्यार्थी ट्रान्स्फर होऊन आलेला आहे परंतु नविन शाळांनी तो विद्यार्थी अद्याप update केलेला नाही आहे* :

या केस मध्ये जुन्या शाळेने विद्यार्थी request approve केलेली आहे परंतु नविन शाळेने सदर मुलास अद्याप update केलेले नाही आहे.जोपर्यंत ट्रान्स्फर झालेला मुलगा update केला जात नाही तोपर्यंत मुलगा हा कॅटलॉग ला दिसनार नाही याची नोंद घ्यावी.असे लाखो विद्यार्थी अद्याप update करावयाचे बाकी आहे हे student पोर्टल च्या dash बोर्ड वरील आकड्यावरून समजते.तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपली ही मुले update करून घ्यावी.मुलाना update कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या तेथे या विषयीचे manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

*चुकीच्या ट्रान्स्फर request करणे/approve करणे* :

 काही शाळांनी चुकीच्या मुलांच्या ट्रान्स्फर request केलेल्या आहेत त्या गटशिक्षणाधिकारी यांनी त्वरीत reject करून देणे गरजेचे आहे.कारण जोपर्यंत सदर ट्रान्स्फर request reject होत नाही तोपर्यत इतर शाळांना तो मुलगा ट्रान्स्फर request साठी लिस्ट मध्ये दिसून येत नाही.अशा वेळी नविन शाळांना असे वाटणे सहाजिक आहे की सदर विद्यार्थी हा मागील वर्षी नोंदवला गेला नाही आहे.अशा केस मध्ये मग नविन शाळा या विद्यार्थ्याला new entry मधून नोंदवत आहे. अशाने विद्यार्थ्यांचे dulpication वाढत असल्याचे दिसत आहे.यासाठी आता एका शाळेने ट्रान्स्फर request केली असले तर इतर शाळांना देखील तो मुलगा दिसेल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.सदर मुलास कोणत्या शाळेने ट्रान्स्फर request केलेली आहे त्या शालांचे आणि त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांचे डिटेल देखील दाखवण्यात येणार आहे.त्याना संपर्क करून सदर ट्रान्स्फर request reject करण्यास सांगावे आणि मुलाला आपण ट्रान्स्फर करून घ्यावे.कोणत्याही परिएथितीत मुलाच्या नोंदी दुबार होऊ नये ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे.

*ट्रान्स्फर request केलेली मुले जुन्या शाळेने approve केली आहे परंतु update ला नविन शाळेला न दिसणे* .:

अशा केस मध्ये जुनी शाळा बऱ्याचदा असे म्हणते की आम्ही ट्रान्स्फर request approve केलेली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र तसे केलेले नसते.यासाठी आधी खात्री करून घ्यावी की जुन्या शाळेने आपण पाठवलेले ट्रान्स्फर request approve केले आहे की नाही.यासाठी आपल्याच login ला आपण ट्रान्स्फर request status या tab चा वापर करून  सदर बाबीची खातरजमा करू शकतो.आणि खरोखर असे झाले असेल तर कृपया  http://goo.gl/9vBAQ8   या लिंक ला क्लिक करा आणि आम्हाला डिटेल कळवा.आपली समस्या सोडवण्यात येईल.

*६) जनरल रजिस्टर चुकून create  झाल्याबाबत* :

बऱ्याच शाळांनी माहिती भरत असताना आपणास लागू नसताना जनरल रजिस्टर create केले आहे.त्यामुळे पूर्वी येत असणारे entire रजिस्टर न येता नविन create केलेले रजिस्टर येत आहे असे दिसून येत आहे.अशा वेळी पुन्हा चुकून केलेले रजिस्टर delete करता येत नाही.आणि नविन मुले upadate करताना समस्या येत आहे.तरी अशा शाळाना सुचना आहे की जर आपले जनरल रजिस्टर वेगळेच दिसत असले तरी त्या रजिस्टर ला select करून आपल्या शाळेतील मुलांना update करून घ्यावे.कॅटलॉग आणि संच मान्यता साठी ही सर्व मुले गृहीत धरली जाणार आहेत.तसेच सदर जनरल रजिस्टर दुरुस्थ/update करण्याची सुविधा देखील लवकरच दिली जाणार आहे.त्यामुळे गोंधळून न जाता आपले काम सुरु ठेवावे.

*७) Exceptions या नविन tab विषयी* .:

आपल्या शाळेतील मागील वर्षीचा रेकॉर्ड पाहता या वर्षी ज्या प्रोसेस होणे गरजेचे होते परंतु काही कारणास्तव प्रमोशन सारख्या प्रोसेस अद्याप झालेल्या नाही आहे अशा मुलांची आकडेवारी आणि सविस्तर माहती या tab मध्ये देण्यात आलेली आहे म्हणजेच आपली पेंडिंग कामे आपणास दाखवण्यात आलेली आहे.ही माहिती पाहून आपण आपली कामे पूरम करून घ्यावी.

*student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.*
लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी *लिंक* :  
https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...