Pages

Tuesday, May 31, 2016

शिक्षण व्यवहाराशी जोडताना

📝शिक्षण व्यवहाराशी जोडताना...
   प्रसाद मणेरीकर📝

मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. तेव्हा विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर प्रत्यक्ष व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की अभ्यासक्रमाची रचना करणे सोपे होईल.
मुले शिकावीत, अधिक चांगल्या पद्धतीने शिकावीत, यासाठी केलेल्या विविध व्यवस्थांपैकी शाळा ही एक व्यवस्था. मुले शाळेत यावीत, तिथे शिक्षकांकरवी शिकती व्हावीत आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावीत, यासाठी सगळी धडपड असते. मात्र तरीही काही मुले मागे पडतात, काही नापास होतात, काही अर्ध्यावरच शाळा सोडतात, हे वास्तव आहे. मुलांना शाळेत शिकायला आवडत नाही, तिथे त्यांना कंटाळा येतो, असा सार्वत्रिक समज आहे आणि तो काहीसा खराही आहे. वर्गातील अमुक मुले काहीच शिकत नाहीत, त्यांना काहीच येत नाही, असे सांगणारे शिक्षक आहेत. सरकारलाही याची जाणीव आहे, म्हणून तर सरकार अप्रगत मुलांसाठी स्वतंत्र वेळ देऊन उपक्रम राबवते; पण तरीही मुले मागे पडतात, हे वास्तव उरतेच.
हे असे का होते याचा धांडोळा घेतल्यास अनेक कारणे पुढे येतात. यातले एक कारण, मुले शाळेत जे शिकतात ते व प्रत्यक्ष व्यवहारात जे करतात ते, यांची सांगड घातलेली त्यांना दिसत नाही व त्यांनाही ती घालता येत नाही. त्यामुळे शाळेतले शिकणे त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ते कंटाळवाणे होते. वास्तविक मुले शाळेत जे शिकतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त घरात, परिसरात, समाजात वावरताना शिकतात. परिसरातील घटना पाहत, समजून घेत, उपक्रमांत सहभागी होत, विविध व्यक्तींशी संवाद साधत असताना ही शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. किंबहुना शाळेत जायच्या कितीतरी आधीपासूनच ही प्रक्रिया सुरू होते. परिसरात वावरताना सहजपणे, कुणीही न शिकविता त्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट होत असतात. मुद्दा असा, की परिसरातून अनुभव घेत मूल शिकत असेल, तर ते "शिकत नाही‘ असे आपण का म्हणतो आणि त्याला "ढ‘ का ठरवतो? म्हणजेच इथे आपली शिक्षक म्हणून जबाबदारी सुरू होते आणि ती दुहेरी स्वरूपाची आहे. एक, मूल ज्या वातावरणातून आले आहे, ते वातावरण समजून घेणे आणि दुसरे मुलाचे अनुभवविश्व लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना करणे. मूल परिसरातून ज्या प्रकारचे अनुभव घेते आहे, त्याचे शालेय शिक्षणात पर्यवसान कसे करायचे, असा तो मुद्दा आहे.
वरवर पाहता ही अवघड बाब वाटेल, कारण प्रत्येक मुलाचा विचार करायचा आणि तशी प्रत्येकासाठी अभ्यासक्रमाची आखणी करायची हे सोपे काम नाही. मात्र अगदी तसेच करायची गरज नाही. कारण ज्या परिसरातून शाळेत मुले येतात, तो परिसर बहुतांश मुलांचा समानच असतो किंवा तसा समान परिसर असणाऱ्या मुलांचे गट करता येतात व त्या आधारे अभ्यासक्रम आखता येतो.
उदा. ग्रामीण व निमशहरी भागांतील मुलांसाठी शेती हा रोजचा अनुभव असतो. ती शेतात वावरतात, शेतीशी संबंधित अनेक क्रिया त्यांना माहिती असतात. याचा आधार घेत भाषा, गणित, परिसर अभ्यास यांतील अनेक संकल्पना मुलांना सोप्या करून सांगता येतील. असेच घरातील व्यवहारांचेही असते. मग या मुलांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर शालेय विषयांतील संकल्पना समजणे सोपे जाईल. तो अभ्यासक्रम अवघड वाटणार नाही आणि दुसरे म्हणजे घरचे आणि परिसरातले व्यवहार ती अधिक समजून-उमजून करतील. या दोन्हीतून मुलांचे आकलन वाढेल.
आपली गफलत झालेली आहे, ती पाठ्यपुस्तक केंद्रिभूत मानून सगळे व्यवहार करण्यातून. खरे तर सरकारही आता त्या मानसिकतेतून बाहेर पडू पाहतेय. विषयातील संकल्पना पाठ्यपुस्तकातून शिकता येत नाहीत, तर व्यवहारातून शिकता येतात, हे एकदा समजून घेतले, की पुढची रचना करणे सोपे जाईल.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांना पाठ्यपुस्तकातील धडे समजत नाहीत व वर्गात चालणाऱ्या गणिती क्रियाही समजत नाहीत, हे त्या त्या भागांतले शिक्षकही मान्य करतात. याचाच परिणाम मुलांना शिकण्यात रस वाटण्यावर होतो. नाहीतर दुकानात जाऊन रोजचे व्यवहार करणाऱ्या मुलांना, किंवा आई-वडिलांना भाजीच्या दुकानात मदत करणाऱ्या मुलांना शाळेतील बेरीज-वजाबाकी येणार नाही असे कसे होईल? आणि हे व्यवहाराशी जोडून शिकणे केवळ प्राथमिक इयत्तेच्या टप्प्यावरच नाही, तर माध्यमिक इयत्तांसाठीसुद्धा लागू आहे. कारण न्यूटनचे नियम आपल्याला तोंडपाठ असतात, पण ते रोजच्या जगण्याला लावता येत नाहीत. रस्सीखेच करताना दोरी तुटून पडल्याचा अनुभव अनेक मुलांना असतो. बस सुरू झाल्यावर ढकलले गेल्याचा अनुभवही असतो, पण याच्याशी नियमांचा संबंध ते शिकूनही मुलांना लावता येत नाही. या अशा रोजच्या अनुभवातून नियमांकडे गेलो, तर शब्दश: नियम कदाचित नाही लक्षात राहणार; पण ती संकल्पना समजेल आणि नियम पाठ करण्यापेक्षा ते केव्हाही महत्त्वाचे!
हे मान्य असेल तर यापुढे आपल्याला अभ्यासक्रमाचा विचार वेगळा करावा लागेल. शाळेत जाऊन मुलांना काय आले पाहिजे, हे नीट ठरवावे लागेल. म्हणजे मुलांना पाठ्यपुस्तक वाचता आले पाहिजे, की मुलांची वाचन क्षमता विकसित व्हायला हवी? आणि वाचन क्षमता विकसित व्हायला हवी असेल, तर वाचनाचे कोणते किती आणि विविधांगी अनुभव मुलांना देता येतील, जे सुरवातीच्या टप्प्यावर परिसराशी जोडलेले असतील, हे पाहावे लागेल. कारण ज्या वयात वाचनाची गोडी लागायची त्या वयात अनाकलनीय वाचावे लागले, तर मुले वाचनापासून दूर जाण्याची शक्यताच जास्त. कारण वाचन ही आपली आपण करण्याची व समजून घेण्याची बाब आहे.
सरकारने शिक्षकांचा पाठ्यपुस्तकाधारित शिक्षणाचा भ्रम लवकरात लवकर दूर करायची गरज आहे. प्रत्येक वयोगटासाठीच्या क्षमता निश्चित कराव्यात. या क्षमतांपर्यंत पोचण्यासाठी साह्यभूत होतील, अशा क्रमबद्धपणे घ्यायच्या उपक्रमांची यादी करावी आणि शिक्षकांना अधिकाधिक मोकळीक द्यावी. सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेलही कदाचित, पण तो सरकारचा हातखंडा आहे. मुलांना शालेय शिक्षणाची गोडी लावण्याचा हा एक मार्ग ठरू शकेल.

Monday, May 30, 2016

शिक्षण लेख

पालकनीतीमध्ये आलेला शिक्षणशास्त्रlचे अभ्यासक किशोर दरक यांचा हा लेख जरा वेळ काढून जरुर वाचाल.

 ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स

 · भाषा शिक्षण
 · शिक्षण
 · शिक्षण - माध्यम

सांस्कृतिक भांडवल आणि पिअर बोर्द्यू
शिक्षण, संस्कृती आणि त्यांच्या परस्परसंबंधांतून होणार्‍या सामाजिक विषमतेच्या पुनर्निर्मितीचं भान निर्माण करणार्‍या पिअर बोर्द्यू आणि त्यांची सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना यांची चर्चा करणारा हा लेख.
"The point of my work is to show that culture and education aren’t simply hobbies or minor influences. They are hugely important in the affirmation of differences between groups and social classes and in the reproduction of those differences." - Pierre Bourdieu
“आठाठ वर्षं शाळेत जात असूनही काही मुलं शिकती होत नाहीत”, हा मुद्दा किती प्रमाणात सत्य आहे यावर मतभिन्नता आहे. मात्र हा मुद्दा पूर्णपणे असत्य आहे असं आज देशात कुणीही म्हणू शकत नाही. आर. टी. ई. कायदा लागू झाल्यापासून देशात अनेक राज्यांत गुणवत्ता विकासाचे जे विविध कार्यक्रम चालू आहेत ते सर्व कार्यक्रम सगळी मुलं शिकती करणं हे उद्दिष्ट (किमान कागदोपत्री तरी) समोर ठेवून चालतायत. मुलं शाळेत जातात, किमान एका शाळेत किंवा एका वर्गात तरी एकसमान शिक्षण मिळतं, एकसारख्या सोयी-सुविधा मिळतात तरी मुलं शिक्षणातून एकसारखी किमान गुणवत्ता प्राप्त करताना दिसत नाहीत. असं का होत असावं, याची अनेकविध मानसशास्त्रीय कारणं आहेतच, शिवाय सामाजिक, सांस्कृतिक कारणं देखील आहेत.
शाळांमधून मिळणारं शिक्षण कुणासाठी फायदेशीर ठरतं, तर कुणासाठी गैरसोयीचं. ते नेमकं कुणाच्या फायद्याचं असतं आणि कुणासाठी नुकसानकारक, त्यातून समाजात समता, सामाजिक न्याय अशी आधुनिक मूल्यं प्रस्थापित होतात की विषमता निर्माण होत राहते, शिक्षणाच्या प्रक्रियेतली सामाजिक जटिलता समजावून कशी घ्यायची, अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांची समाजशास्त्रीय उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार्या विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या काही नावांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे पिएर बोर्द्यू (Pierre Bourdieu, 1930-2002). गेल्या शतकातील एक महत्त्वाचे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून बोर्द्यू ओळखले जातात. कला, संस्कृती, शिक्षण, भाषा, सार्वजनिक माध्यमं, सामाजिक संरचना, समाजातले सत्तासंबंध अशा अनेक विषयांमध्ये मूलभूत संशोधन करून सामाजिक महत्त्वाच्या या विषयांच्या विश्लेषणासाठी नवे सिद्धांत जगापुढे मांडण्याचं महत्त्वाचं काम बोर्द्यू यांनी केलं.
1960 च्या दशकाच्या पूर्वार्धात फ्रान्सध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक वर्गांतील मुलांच्या संपादणुकीतील फरकाविषयी घमासान चर्चा सुरू होत्या. शिक्षणातील संपादणुकीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध शैक्षणिक-समाजशास्त्रीय साधनं अपुरी पडू लागली होती. बुध्यांकासारख्या (आय. क्यू.) बोधनक्षमतेवर (cognitive ability) आधारित पद्धतीची मर्यादा अधिकाधिक प्रमाणात लक्षात येऊ लागली होती. अशा वेळी बोर्द्यूंनी संख्याशास्त्रीय पृथक्करणाचा आधार घेऊन शिक्षणक्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारी समाजशास्त्रीय मांडणी केली.
एखाद्या क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक आणि मिळणार्या नफ्याचा वाटा हे एकमेकांशी समानुपाती असतात. ज्याचं भांडवल जास्त त्याचा/तिचा नफ्यातला वाटा जास्त, हा अर्थशास्त्रीय व्यवहारातला ढोबळ सिद्धांत. या सिद्धांताशी साधर्म्य सांगणारासांस्कृतिक भांडवलाचा (cultural capital) सिद्धांत बोर्द्यूंनी मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार औपचारिक शिक्षणातली परिस्थिती समाजातल्या वर्चस्वधारी वर्गातली (dominant class) किंवा उच्च वर्गातील मुलांना समाजातील कनिष्ठ वर्गीय मुलांपेक्षा अधिक फायदा देणारी असते. उच्च वर्गीय मुलं शिक्षणप्रक्रियेत दाखल होतानाच त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा संबंध नसतो. अशा मुलांसाठी घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात सातत्य (continuity) असतं, साम्य असतं. या मुलांची भाषा, सामाजिक आंतरक्रियेची पद्धत, सौंदर्यदृष्टी असे सर्व सांस्कृतिक जडणघडणीचे घटक शाळेच्या संस्कृतीशी मिळतेजुळते असतात. शिक्षणाचा आशय (content) आणि वापरलं जाणारं अध्यापनशास्त्र (pedagogy) या दोन्ही गोष्टी समाजातील वर्चस्वधारी गटातल्या मुलांना परक्या वाटत नाहीत. या उलट कनिष्ठ वर्गीय किंवा कामगार वर्गीय मुलांना शाळेचं वातावरण परकं, विरोधी वाटू लागतं. त्यांच्यामध्ये उपरेपणाची भावना वाढीला लागते आणि ते शालेय प्रक्रियेपासून तुटत जातात, किंवा शालेय प्रक्रियेशी कधी जोडलेच जात नाहीत. त्यांच्या घरची संस्कृती आणि शाळेची संस्कृती यात खूप तफावत असते म्हणूनदेखील त्यांची शैक्षणिक संपादणूक कमी प्रतीची असते.
शाळेत येताना प्रत्येक मूल आपल्यासोबत जी संस्कृती - म्हणजे त्याची भाषा, बोलण्या-वागण्याच्या पद्धती, आवडी-नावडीच्या गोष्टी, खाण्या-पिण्याचे प्रकार, गाणी, गोष्टी - घेऊन येतं ते झालं त्याचं सांस्कृतिक भांडवल. शाळा मात्र या भांडवलाबाबत पक्षपाती धोरण अवलंबतात. म्हणजे उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाचा सन्मान राखत त्या मुलांना संस्कृतीसातत्याचा फायदा देतात. त्याचवेळी खालच्या सामाजिक स्तरातील मुलांच्या संस्कृतीला नाकारतात, त्यात सुधारणा सुचवतात किंवा तिचा तिरस्कार करतात. याचाच दुसरा अर्थ उच्चवर्गीयांचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारार्ह म्हणून त्यांना शिक्षणातून नफा मिळवून देणारं ठरतं. हानफा शैक्षणिक यशाच्या स्वरूपात असतो आणि भविष्यात त्याचं रूपांतर आर्थिक यशात होतं. याउलट, कनिष्ठ वर्गाची संस्कृतीच त्यांच्या यशात अडसर ठरते आहे, असं भासवलं जातं. शाळा उच्चवर्गीयांच्या सांस्कृतिक भांडवलाला महत्त्व देत असल्यामुळे उच्चवर्गीय मुलं पुढील आयुष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना दिसतात. अशा प्रकारे विषमताधारित समाजात शिक्षणातून विषमतेचं पुनरुत्पादन होतं.
सांस्कृतिक भांडवलाची बोर्द्यूंची ही संकल्पना भारतासारख्या बहुविधतेच्या (plurality) देशांना अनेक अर्थांनी उपयुक्त आहे. ही संकल्पना आपण आपल्या शैक्षणिक संदर्भातली काही उदाहरणं घेऊन समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. भारतातील विषमता बहुआयामी आहे. जात, लिंग, धर्म या तीन आधारांवरची विषमता वर्गीय विषमतेपेक्षा जटिल असल्याचं अभ्यासक मानतात. शाळांचा विचार करता तिथं शिकवला जाणारा आशय सहसा उच्चजात, उच्चवर्ग धार्जिणा असतो.
प्रसिद्ध विचारवंत कांचा आयलया यांनी ‘व्हाय आय एम नॉट अ हिंदू’ या नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. ब्राम्हणी हिंदू धर्माची चिकित्सा करणार्या या पुस्तकात स्वतःच्या शाळेचा अनुभव सांगताना ते म्हणतात, ... पाठ्यपुस्तकांमधून ज्या कथा सांगितल्या जात असत त्या आम्ही कधीही ऐकलेल्या नव्हत्या. राम आणि कृष्ण यांच्या कथा, रामायण आणि महाभारत ही काव्ये शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वारंवार समोर येत राहिली..... ब्राम्हण आणि वैश्य वगैरे मुलांसाठी या कथा अगदी परिचित, त्यांच्या देवांच्या होत्या..... ही नावं आमच्यासाठी किती परकी होती ते मला अजूनही ठळकपणे आठवतं. कालिदास हे नाव आमच्यासाठी शेक्सपिअर इतकंच परकं होतं. फरक इतकाच की एक नाव तेलगु पाठ्यपुस्तकात असे तर एक इंग्रजी पाठ्यपुस्तकात..... आजतागायत मला कधीही कोणत्याही पाठ्यपुस्तकात एकाही पाठात पोचम्मा, पोतराजु, कट्टमैसम्मा, काटम्माराजु, बिरप्पा अशी आमच्या देवांची नावं आढळली नाहीत.... त्यांच्याविषयी कथाच उपलब्ध नाहीत असं नाही पण पाठ्यपुस्तक लेखकांना ती नावं पुस्तकांत देण्याच्या लायकीची वाटत नाहीत. (संदर्भ: कांचा आयलया, व्हाय आय एम नॉट अ हिंदू, पान 13, साम्या प्रकाशन, कलकत्ता, 1996) शिक्षणाच्या आशयामध्ये अशा प्रकारे उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाचंच प्रतिबिंब पडत राहतं. साहजिकच कनिष्ठ जात किंवा कनिष्ठ वर्गीय मुलं शाळेच्या पहिल्या दिवसापासून मागे पडू लागतात.
सांस्कृतिक भांडवलाची कल्पना केवळ शिक्षणाच्या आशयाचं नियंत्रण करते असं नाही तर शिक्षणाचा एकूण व्यवहार नियंत्रित करते. उदाहरणार्थ, परीक्षा हा शिक्षणाचा गाभा समजला जातो. परीक्षा घ्यायची पद्धत बदलली की शिक्षणाचा सगळा व्यवहार बदलतो कारण अधिकाधिक गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे शिक्षण, असं आपण मानतो. 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत ज्या सार्वत्रिक परीक्षा घेण्यात आल्यात त्यांच्या स्वरूपामुळे पहिल्यांदा पाठांतरावरचा भर कमी झालेला दिसतोय. अर्थात यातून संपादणूक पातळी वाढायला हवी असेल तर अजून बरीच मजल मारायची आहे. पण दहावी किंवा बारावी बोर्डाची परीक्षा मुख्यत: पाठांतर या एकमेव कौशल्यावर आधारित असते. भारतीय संदर्भात अशा प्रकारच्या परीक्षादेखील उच्चजातीय सांस्कृतिक भांडवलाला स्वीकारार्ह मानणार्या आहेत. पुढील उदाहरण हा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत करेल.
अभिजन महाराष्ट्र आजही ज्या एकमेव आईच्या स्मरणरंजनात गुंगतो त्याश्यामची आई या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. आपल्या बालपणाची आठवण सांगतांना पुस्तकाचे लेखक म्हणतात - आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत...... रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे....... वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. .... आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. (संदर्भ: पां.स.साने, श्यामची आई, रात्र सातवी - पत्रावळी,http://saneguruji.net/या संकेतस्थळावर उपलब्ध) स्वतः जातीभेद न मानणारे साने गुरुजीदेखील उच्चजातीतील जन्मामुळे मिळणार्या सांस्कृतिक सवयीजन्य फायद्याचे धनी होते. भारतात कोट्यावधी घरांमध्ये पाठांतराला प्रोत्साहन तर सोडा, पाठांतराचा विचारही नसतो आणि जगण्याच्या संघर्षात तशी उसंतही नसते. अशा घरांतली मुलंदेखील केवळ अफाटपाठांतराधारीत परीक्षा देतात तेव्हा पुढं कोण जाणार हे परीक्षेआधीच ठरलेलं असतं.
सांस्कृतिक सवयी या सांस्कृतिक भांडवालाचा अविभाज्य भाग असतात. देवा-धर्माच्या नावाने लागलेली अर्थ न समजता पाठांतर करण्याची सवय सांस्कृतिक भांडवल बनून अभिजन मुलांचा शैक्षणिक नफा वाढवत राहते. अर्थात् हे योगायोगाने घडत नाही. समाजातले अभिजन घटक आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक भांडवलाला अधिकाधिक स्वीकारार्ह बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी लागणारं आर्थिक भांडवलही त्यांच्याकडे असतं, अशा आशयाची मांडणी आपल्या फॉर्मस् ऑफ कपिटल या निबंधात बोर्द्यूंनी केली आहे. अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाला केवळ त्यांचीच मान्यता असते असं नाही तर सांस्कृतिक प्रतीकांवरील (cultural symbols) प्रभुत्त्वामुळे हा वर्ग आपल्या सांस्कृतिक भांडवलाचं श्रेष्ठत्व राज्यकर्त्यांच्या गळी उतरवतो. थोडं दूरचं उदाहरण घेऊन या प्रक्रियेकडे पाहूयात.
1953-54 पासून देशात आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. या शाळांचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा व मद्यपान इत्यादीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जनजातीतील मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षण, शिस्त व वैयक्तिक आरोग्य यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करणे असं आहे. (संदर्भ: आश्रमशाळा संहिता, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, पान एक, 2006). आदिवासी मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत स्वीकारार्ह असं काहीही शासनाला दिसत नाही! त्यापासून मुलांना दूर काढून योग्य शिक्षण देणं हा वांशिक शुद्धीकरणाचा (ethnic sanitisation) एक प्रकार आहे. अशी आदिवासी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा शाळांनी आधीच अभिजनवर्गाचं सांस्कृतिक भांडवल स्वीकारलेलं असतं. इतकंच नव्हे तर आदिवासी मुलांचं सांस्कृतिक भांडवल केवळ दुरुस्तीयोग्य मानून किंवा त्याला पूर्णपणे नाकारून या मुलांच्या दाखल होण्याआधीच शाळा त्यांच्या अपयशाची सोय करून ठेवतात. अर्थात् शाळा आदिवासी मुलांसाठी असल्या तरी त्यांची रचना, आखणी, उभारणी आणि कार्य हे सगळं अभिजनांचं वर्चस्व असलेल्या विचारसरणीतून घडत असतं. आदिवासींच्या सांस्कृतिक भांडवलाला संपूर्ण नकार देऊन एका बाजूला प्रतीकात्मक हिंसा (symbolic violence)केली जाते आणि दुसर्या बाजूला अभिजनांच्या संस्कृतीजन्य ज्ञानाला वैध ज्ञानाचा दर्जा देऊन तेच एकमेव प्राप्य (desirable goal) बनवलं जातं. आर्थिक आणि सांस्कृतिक भांडवलाच्या पाठबळामुळं उच्चजात-वर्गीयांच्या किंवा अभिजनांच्या चवीच योग्य आहेत असं बहुजानांसकट सगळा समाज मानू लागतो. आपल्या .... जजमेंट ऑफ टेस्टया ग्रंथात बोर्द्यूंनी त्याचं गंभीर विश्लेषण केलंय.
आपले कपडे, घरांचे रंग, जेवणाच्या चवी, बोलण्याच्या लकबी, कलेची जाणीव, मनोरंजनाचे प्रकार, शिक्षणाचा अर्थ इत्यादी सर्वांमध्ये अभिजनांचं अनुकरण करणं म्हणजे उर्ध्वगमनशील (upwardly mobile) होणं, अशा विचाराला समाजात मान्यता मिळत जाते. जे जे अभिजनांचं ते ते उत्तम आणि दर्जेदार, अशी जाणीव समाजातल्या विविध घटकांमध्ये निर्माण होते. कनिष्ठ जात किंवा वर्गातले लोक देखील अभिजनमान्य तेच योग्य असं अगदी नैसर्गिक सूत्र असल्यासारखं मान्य करू लागतात. अर्थात या सर्व सवयी दर वेळी शाळेतून किंवा औपचारिकरीत्या शिकवल्या जातात असं नाही. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते. या प्रक्रियांच्या विश्लेषणासाठी उपयुक्त अशी हॅबिटससारखी संबोध चौकट (conceptual framework) देखील बोर्द्यूंनी मांडली.
सांस्कृतिक भांडवलाला गृहीत धरण्याची सवय तर जगभर इतकी मुरलेली आहे की शाळांच्या बाबतीत कोणताही वेगळा विचार अगदी गुलबकावलीच्या फुलासारखा वाटू लागतो. गेल्या वर्षी काही संशोधनाच्या निमित्ताने मी उत्तरेतील एक राज्य, दक्षिणेतील एक राज्य आणि महाराष्ट्रातील काही शाळांना भेटी दिल्या. मुख्यत: सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या आणि अधिकार्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलांच्या असमाधानकारक संपादणुकीचं कारण सांगताना जवळजवळ सगळे शिक्षक आणि अधिकारी ही मुलं गरीब घरांतली आहेत. त्यांचे आईवडील मोलमजुरी करतात. काही मुलं हलक्या जातींची आहेत. या मुलांच्या घरचं वातावरण शिक्षणाला पोषक नाहीय. कसं या मुलांना यश मिळणार? अशा आशयाचं बोलत होती. मुलांच्या शैक्षणिक अपयशाचा विचार करताना कुणीही शिक्षक, अधिकारी किंवा इतर प्रौढ शाळेत काही कमतरता असून ती दूर करायला हवी, असा विचारही करताना सहसा दिसत नाहीत. मुलांच्या घरचं वातावरण त्यांच्या शिक्षणाला पोषक नाही कारण ते शाळेसारखं नाही, असं सर्रास सांगितलं जातं. शाळेतलं वातावरण शिक्षणाला पोषक नाही कारण ते घरच्यासारखं नाही असा विचार, अगदी काल्पनिक प्रयोग म्हणूनही कुणी करत नाही. कारण शाळेचं वातावरण हे अभिजनांच्या किंवा भारतात बोलायचं झालं तर उच्चजातींच्या सांस्कृतिक भांडवलाला साजेसं असणार किंवा असायलाच हवं, असं आपण गृहीत धरलेलं आहे.
अभिजनांच्या सांस्कृतिक भांडवलाच्या अशा धाकाचं आणि त्यातून होणार्या विषमतांच्या पुनर्निर्मितीचं सखोल विश्लेषण बोर्द्यूंनी केलं. अर्थात् आधी उल्लेख केल्याप्रमाणे ते केवळ समाजशास्त्रज्ञ नव्हे तर तत्त्ववेत्ते, संस्कृतीचे उत्तम अभ्यासक होते. सत्तर वर्षांच्या अत्यंत उत्पादक आयुष्यात अभिजनांची कलेची चव, भाषेतील प्रतीकात्मकता, सौंदर्यदृष्टीवर आधारित सामाजिक स्तरीकरण, समाजातील संरचना आणि सत्तासंबंध, माध्यमं आणि सांस्कृतिक उत्पादनं अशा विविध विषयांचा सखोल आणि मूलभूत अभ्यास त्यांनी केला. तीसहून अधिक ग्रंथ लिहिले - Distinction: - Social Critique of the Judgment of Taste (1984), The Logic of Practice (1990), Homo academicus (1990), Language and Symbolic Power (1991), The Love of art: European art Museums and Their Public (1991), State Nobility: Elite Schools in the Field of Power (1998), On Television (1999) हे त्यातील काही प्रमुख ग्रंथ. (वरील यादीतील पुस्तकांचे साल हे त्यांच्या इंग्रजीतील प्रकाशनांचे आहेत. त्यांनी त्यांचं लेखन त्यांच्या शिक्षणाच्या भाषेतून म्हणजे फ्रेंच भाषेतून केलं होतं.)
भारतामध्ये गेलं दशकभर सरकारी शाळांतील म्हणजे गरीब, दलित, बहुजन, अल्पसंख्य वर्गातील मुलांच्या शैक्षणिक संपादणुकीचा प्रश्न मोठ्ठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. मुलांच्या घरचं अशैक्षणिक वातावरण जबाबदार असल्याचं सांगून शिक्षक आणि व्यवस्था या प्रश्नातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायात. दुसर्या बाजूला केवळ आकडेवारीचा विचार न करणारे काही संवेदनशील अभ्यासक performance of government school children is same (or comparable) as that of private school children, when family background is controlled अशी मांडणी करतात. विश्लेषणाचे मार्ग भिन्न असले तरी शिक्षक आणि अभ्यासक हे दोन्ही घटक अप्रत्यक्षपणे बहुजन मुलांच्या सांस्कृतिक भांडवलाला शाळांतून फारशी किंमत दिली जात नसल्याचंच सांगत असतात.
मुलांचं शाळेतलं शिक्षण आणि संपादणूक पातळी केवळ शाळेतल्या प्रक्रियांवर अवलंबून नसतात तर या प्रक्रिया मुलांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल किती संवेदनशील आहेत, यावर देखील अवलंबून असतात. सांस्कृतिक भांडवलाचा विचार मांडून, त्याचा संपादणुकीशी संबंध दाखवून पिएर बोर्द्यूंनी जगाला चाळीसेक वर्षांपूर्वीच सावध केलंय. अशा जायंटच्या खांद्यावर उभं राहून आपल्या शैक्षणिक समस्येच्या मुळाला हात घालायचा की अल्पजीवी, अल्पकालीन, अल्पखर्चाच्या उपाययोजना करून अल्पसमाधानालाच उत्तुंग यश मानायचं, हे भारतासारख्या देशांनी ठरवायची वेळ उलटत चालली आहे.
******
लेखक परिचय: किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व विश्‍लेषक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे.
Email :kishore_darak@yahoo.com

हेमलकसा : अंधारातून उजेडाकडे

हेमलकसा : अंधारातून उजेडाकडे - डॉ. प्रकाश आमटे | आपल्या पद्धतीचं आयुष्य जगताना आपले अनुभवही आपणच घ्यायचे असतात. त्याच्या बर्‍यावाईट परिणामांची जबाबदारीही स्वतःच घ्यायची असते. आणि हे सगळं तक्रार न करता सहज स्वीकारलं तर मिळणारं समाधान वेगळंच असतं, हे तत्त्व मला शिकवलं हेमलकशातल्या सुरुवातीच्या मुक्कामाने ... इथल्या निसर्गाने, जंगलाने, नदी-नाल्यांनी, प्राण्यांनी आणि अर्थातच माणसांनी!
••••••
आज आम्ही चाळीसहून अधिक वर्षं महाराष्ट्राच्या एका टोकाला, भामरागडच्या जंगलात- हेमलकशात राहतो आहोत. हा कालखंड कुठल्याही सुधारणेसाठी कमी असला, तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. हेमलकशात स्थिरावण्याचा प्रवास हा फक्त अदिवासींसाठीच नव्हे, तर आम्हा सर्वांना शब्दशः अंधाराकडून उजेडाकडे नेणारा आहे. कारण इथे पहिली सतरा वर्षं वीज नव्हतीच!
भामरागड हा आनंदवनापासून २५० किलोमीटरवर असणारा चंद्रपूरच्या जिल्ह्यातला भाग. नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरचा जंगलाने व्यापलेला हा प्रदेश. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तिथे वस्ती आहे, एवढंच आम्हाला ऐकून माहीत होतं. १९७३ साली बाबांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी इथे ‘लोकबिरादरी प्रकल्प’ सुरू केला. तेव्हा इथला परिसर सुंदर होता, पण ते सौंदर्य रौद्र होतं. जंगल एवढं दाट की सूर्यप्रकाशही आत येऊ शकायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. दुथडी भरून वाहणार्‍या नद्या आणि जंगली जनावरं यांच्या आवाजापलीकडे तिसरा आवाज या भागात ऐकू येत नसे. पावलापावलांवर साप आणि विंचू यांचं अस्तित्व होतं. हेमलकशाच्या जंगलात प्राण्यांनी, विशेषतः अस्वलांनी माणसांवर हल्ला करणं ही अगदी वारंवार घडणारी गोष्ट. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. इथे ना वीज होती, ना पाणी, ना राहण्यासाठी सपाट जागा. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि जंगली श्‍वापदं. आनंदवनातल्या सुरुवातीच्या काळात अशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असल्याने मला अशा अडचणींची थोडीफार तरी सवय होती; पण माझी पत्नी मंदा आणि इतर कार्यकर्त्यांनी हेमलकशात स्थिरावण्यासाठी ज्या अडचणींना तोंड दिलं त्याला तोड नाही.
•••
हेमलकशातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की थांबायचं नावच घेत नाही. अफाट पावसामुळे आणि नंतर येणार्‍या पुरामुळे हेमलकशापासून पासष्ट किलोमीटरवर असलेला नागेपल्लीचा प्रकल्प हा आमचा ‘बेस कँप’ बनला. या प्रकल्पाची जबाबदारी जगन मचकले या आमच्या कार्यकर्त्याकडे होती. हेमलकसा ते नागेपल्ली हा रस्ता चढाचा होता. रस्ता कसला, जंगलातल्या वाटाच त्या. वाटेत आठ-दहा ओढे-नाले आणि बांदिया नदी. पाऊस सुरू झाला की बदाबदा कोसळायचा. ओढे-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. पूर्णपणे ‘कट-ऑफ’. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद असायचं. वाहतूक अशी नसायचीच. एखाद्याला त्या पावसात कुठे जायची वेळ आलीच तर तो त्या ठिकाणी किती दिवसांनी पोहोचेल याचा काही भरवसा नाही.
आम्ही ज्या भागात आमचं नवं जीवन थाटू पाहत होतो तिथून बाहेर पडण्यासाठी ना रस्ते होते ना वाहनं. इतरांशी संपर्क करण्यासाठी ना फोन होते ना पोस्टाची पेटी. उर्वरित जगाशी आणि तोही प्रामुख्याने आनंदवनाशी जोडणारा एकच दुवा होता, तो म्हणजे जगन मचकले. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचा आणि काही महत्त्वाचा निरोप किंवा सामान पोचवायचं असेल तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. 

वर्षभरातील दिनविशेष

वर्षभरातील दिनविशेष

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == बालिका दिन
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————————–
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————————-
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————————-
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————————-
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————————-
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२० जून == पित्र दिन
21 जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
————————————————————————-
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————————————————-
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
—————————————————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०५ सप्टेंबर == शिक्षक दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
————————————————————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
————————————————————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————————————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

Tuesday, April 19, 2016

गणित

💝 गणित रोमन अंक 💘
Roman Numerals
Roman numerals List
Number Roman numeral
0 not defined
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX

🎯 हसत खेळत गणितीय शिक्षण            
      💎💎💎💎💎💎💎      
                   
(१)    १  मिनिट = ६० सेकंद .
(२)    १  तास = ६० मिनिटे .
(३)    २४ तास  = १ दिवस .
(४)    पाव तास =१५ मिनिटे.
(५)    अर्धा तास =३० मिनिटे.
(६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७)     ७ दिवस = १ आठवडा.
(८)     ३० दिवस = १ महिना.
(९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०)   १० वर्ष = १ दशक .
(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२)   पाव वर्षे = ३ महिने .
(१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५)    एकशे =१००
(१६)    अर्धाशे =५०
(१७)    पावशे =२५
(१८)    पाऊणशे =७५
(१९)    सव्वाशे =१२५
(२०)    दीडशे = १५०
(२१)    अडीचशे =२५०
(२२)    साडेतीनशे =३५०
(२३)    १डझन=  १२ वस्तू
(२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
(२५)    पाव डझन=३ वस्तू
(२६)    पाऊण डझन=९ वस्तू
(२७)    २४ कागद = १ दस्ता
(२८)    २० दस्ते=१ रीम
(२९)    ४८० कागद = १  रीम
(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
(३१)    १ हेक्टर =१०० आर
३२ )    १एकर= ४००० चौ .मी
(३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
(३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
(३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
(४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
(४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
(४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
(४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
(४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९)   १हजार=१०००
(५०)   अर्धा  हजार =५००
(५१)   पाव हजार =२५०
(५२)   पाऊण हजार  =७५०
(५३)   १२ इंच =१ फूट
(५४)   ३ फूट =१ यार्ड
(५५)   १ मैल =५२८० फूट
(५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम
(५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६0)   १ टन= १० क्विंटल
शिक्षक मित्र समूह ✒

🎯वर्तुळ -

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.

वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.

वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.

जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.

वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.

वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.

वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D

अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7

अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22  

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30

अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2

अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.

दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -


घनफळ -

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2    

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ

घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2

वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h

वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2

वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे -

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh

अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h

समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2

(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)

वक्रपृष्ठ = πrl

शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती -

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.

n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.

सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप

बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे    

0.1 तास = 6 मिनिटे  

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद    

0.01 तास = 36 सेकंद  

1 मिनिट = 60 सेकंद    

0.1 मिनिट = 6 सेकंद

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.

 दशमान परिमाणे -

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल

10 क्विंटल = 1 टन
   1 टन = 1000 कि.ग्रॅ.

1000 घनसेंमी = 1 लिटर

1 क्युसेक=1000घन लि.  

12 वस्तू = 1 डझन
   12 डझन = 1 ग्रोस  
     24 कागद = 1 दस्ता

20 दस्ते = 1 रीम  
 1 रीम = 480 कागद.

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -

अ) अंतर –

1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

1 से.मी. = 0.394 इंच

1 फुट = 30.5 सेमी.

1 मी = 3.25 फुट

1 यार्ड = 0.194 मी.
           1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ -  

1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

1 सेमी 2 = 0.155 इंच 2

1 एकर = 0.405 हेक्टर

1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल

1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर

क) शक्ती -  

1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

1 किलो वॅट = 1.34 एच.पी.

ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3

क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

1 मी 3 = 35 फुट 3

1 यार्ड 3 = 0.765 मी. 3

इ) वजन -  

1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0

1 पौंड (lb) = 454 ग्रॅम

1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)

वय व संख्या -

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2

वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

दिनदर्शिका –

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.



नाणी -

एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज

एकूण नोटा = पुडक्यातीलv शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1

पदावली -

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
💐💐💐💐💐💐💐💐💐

Monday, April 18, 2016

शिक्षणविषयक free app
1st grade
35kids picture story
ABC English
ABC handwriting
About India
Amazing science
Animal encyopedia
Animal planet
Archaeoist
Bheem rupee game
Biology for kids
First learning game
 Brain trainer special
Country list
Doch sight words
English conversation
English for kids
Evomemo
Farm scratch
1st grade words
1st grade math
1st grade word play lite
Forts of Maharashtra
Fundoscience
Funny vitamins
Fun with dots
Gadwat
Fun easy learn English
First words
Hangama kids
IMO 1 maths
Hindi writing
Isro programs
Jr science master
Kids creation
Kids craft idea
Kids educational games
Kids encyclopedia
Kids gk test
Kids jigsaw2
Kids learning flowers names
Kids learning math lite
Kids measurements
Kids science experiments
Kids tangram free
Kids creative puzzle
Four seasons
Kids maths
Kidspedia
Kids zoo
Know abacus
Learn body part in English
Learn Hindi number
Learn to read
Learn to read lite
Lit charm pro
Lines and shapes free

Logic free
Logic with bheem
Marathi
Mharathi mhani
Marathi panchatratra
Match spell
Math art for kids
Math challenge
Math tricks
Mind games
Missing letters
Nao
Olypiad eng grade 1
Panchtratra
Phonics spelling and sight words
Piano lessons
Planet dino
Planets space
Play and learn
Play learn English
Play ground for kids
Sage kids
Sana Olympiad
Science experiments
Science lab
Science school
Shivaji &maratha empire
Simple drawing lessons
Singular plular
Sky guide for kids
Smarts kids
Space puzzle
Speakaboos
Spelling
Tabala master
True or false
Barakhadi

महत्वपूर्ण शब्दांचे पूर्ण नाव

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
कुछ महत्वपूर्ण शब्दो का पूर्ण नाम
1.) GOOGLE - Global Organization Of Oriented Group Language Of Earth.
2.) YAHOO - Yet Another Hierarchical Officious Oracle.
3.) WINDOW - Wide Interactive Network Development for Office work Solution.
4.) COMPUTER - Common Oriented Machine Particularly United and used under Technical and Educational Research.
5.) VIRUS - Vital Information Resources Under Siege.
6.) UMTS - Universal Mobile Telecommunications System.
7.) AMOLED - Active-matrix organic light-emitting diode.
8.) OLED - Organic light-emitting diode.
9.) IMEI - International Mobile Equipment Identity.
10.) ESN - Electronic Serial Number.
11.) UPS - Uninterruptiblepower supply.
12. HDMI - High-DefinitionMultimedia Interface.
13.) VPN - Virtual private network.
14.) APN - Access Point Name.
15.) SIM - Subscriber Identity Module.
16.) LED - Light emitting diode.
17.) DLNA - Digital Living Network Alliance.
18.) RAM - Random access memory.
19.) ROM - Read only memory.
20.) VGA - Video Graphics Array.
21.) QVGA - Quarter Video Graphics Array.
22.) WVGA - Wide video graphics array.
23.) WXGA - Widescreen Extended Graphics Array.
24.) USB - Universal serial Bus.
25.) WLAN - Wireless Local Area Network.
26.) PPI - Pixels Per Inch.
27.) LCD - Liquid Crystal Display.
28.) HSDPA - High speed down-link packet access.
29.) HSUPA - High-Speed Uplink Packet Access.
30.) HSPA - High Speed Packet Access.
31.) GPRS - General Packet Radio Service.
32.) EDGE - Enhanced Data Rates for Globa Evolution.
33.) NFC - Near field communication.
34.) OTG - On-the-go.
35.) S-LCD - Super Liquid Crystal Display.
36.) O.S. - Operating system.
37.) SNS - Social network service.
38.) H.S - HOTSPOT.
39.) P.O.I - Point of interest.
40.) GPS - Global Positioning System.
41.) DVD - Digital Video Disk.
42.) DTP - Desk top publishing.
43.) DNSE - Digital natural sound engine.
44.) OVI - Ohio Video Intranet.
45.) CDMA - Code Division Multiple Access.
46.) WCDMA - Wide-band Code Division Multiple Access.
47.) GSM - Global System for Mobile Communications.
48.) WI-FI - Wireless Fidelity.
49.) DIVX - Digital internet video access.
50.) APK - Authenticated public key.
51.) J2ME - Java 2 micro edition.
52.) SIS - Installation source.
53.) DELL - Digital electronic link library.
54.) ACER - Acquisition Collaboration ExperimentationReflection.
55.) RSS - Really simple syndication.
56.) TFT - Thin film transistor.
57.) AMR- Adaptive Multi-Rate.
58.) MPEG - moving pictures experts group.
59.) IVRS - Interactive Voice Response System.
60.) HP - Hewlett Packard.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

भारतीय ध्वजसंहिता

‬ 🇮🇳🇮🇳 ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.

🇮🇳 ध्वजसंहितेत झालेले बदल-

1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)

4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.

🇮🇳🇮🇳ध्वजप्रतिज्ञा 🇮🇳🇮🇳

 "मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."

🇮🇳🇮🇳ध्वजारोहन क्रम🇮🇳🇮🇳

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
2) राष्ट्रीय सलामी
3) राष्ट्रगीत
4) ध्वजप्रतिज्ञा
5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

 *****!!!!!*****‬: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.

ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

 संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.

मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.

शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.

प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

 ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.

 अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.

 ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.

जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

 कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.

केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.

तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.

ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.

कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.

तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.

राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.

सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

फिनलंडमधील शैक्षणिक प्रणाली

नवे प्रवाह : फिनलंडमधील शैक्षणिक प्रणाली

डॉ. हेमचंद्र प्रधान-होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र.
Published: Monday, March 18, 2013
१९६० पूर्वी फिनलंडमधील शिक्षणपद्धती साधारणत: आज आपल्याकडे आहे, तशीच होती. शाळा सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या होत्या. शिक्षण सर्वसामान्यांना परवडेल असे नव्हते आणि ते अनिवार्यसुद्धा नव्हते. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठे होते. उच्च तसेच चांगले शिक्षण ही काही थोडय़ा लोकांचीच मक्तेदारी होती.
सहाशे वष्रे स्वीडनच्या आधिपत्याखाली राहिलेला फिनलंड देश स्वीडनच्या राजाने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशियाच्या सार्वभौम झारला आंदण देऊन टाकला. झारने या देशाला रशियाच्या वर्चस्वाखालील मांडलिक, परंतु स्वायत्त राज्याचा दर्जा दिला. १९१८ साली साम्यवादी सोव्हिएट युनियनची स्थापना झाल्यानंतर फिनलंडने आपण संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र असल्याची घोषणा केली. परिणामी, १९२० ते १९४५ या काळात रशियाबरोबरची दोन आणि जर्मनीबरोबरचे एक अशा युद्धांना फिनलंडला सामोरे जावे लागले. १९५० ते ६०च्या दशकात आपल्या देशाची नव्या उमेदीने उभारणी करण्यास फिनलंडच्या नागरिकांनी सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून १९६३ मध्ये त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी केली. 'शिक्षण ही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शिक्षणात आणि शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक देशाच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे,' या विचाराने याच काळात मूळ धरले. आज फिनलंडमधील सर्व राज्यकत्रे, मग ते सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा विरोधी पक्षाचे, शिक्षणाचे महत्त्व जाणून आहेत आणि शैक्षणिक सुधारणांना नेहमीच पाठिंबा देत आहेत. गेली ५०-६० वष्रे विद्यार्थ्यांचे वाचन-लेखन, गणित आणि विज्ञान यातील पायभूत साक्षरता यात सातत्याने सुधारणा होत असून आजच्या या बदललेल्या चित्रामागे राजकीय इच्छाशक्ती दाखवून आखलेल्या धोरणांची सर्वसंमतीने केलेली अंमलबजावणी आहे.
या अंमलबजावणीचा आधास्तंभ आहे तो फिनलंडमधील अध्यापकवर्ग. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करणे हा फिनलंडच्या तरुणांमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो. तेथील अध्यापकांचे वेतनही इतर व्यावसायिकांना मिळणाऱ्या वेतनाइतके आहे.
फिनलंडमध्ये एकूण तीन हजार ५०० शाळा आाहेत आणि या शाळांमधून ६२ हजार अध्यापक आहेत. हे सगळे अध्यापक देशातल्या एकूण पदवीधरांपकी सगळ्यात वरच्या १० टक्के पदवीधरांमधून निवडले जातात. अध्यापक म्हणून निवड करण्यापूर्वी त्या उमेदवाराची शैक्षणिक प्रगती आणि आवड लक्षात घेतली जाते. त्याचबरोबर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. पण या प्रवेशपरीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांची लांबच लांब रांग नसते. या परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातात आणि त्यामधून त्या विद्यार्थी उमेदवाराचे ज्ञान, समज आणि अध्यापक होण्याच्या दृष्टीने अभिव्यक्ती ज्याद्वारे तपासले जाईल असे अभिनव आणि व्यामिश्र प्रश्न असतात. या परीक्षेमधून निवड झालेल्या प्रत्येकाला 'मास्टर इन एज्युकेशन' हा दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभवाधारित अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. समुपदेशन, विज्ञान व गणित विषयांचे अध्यापन, दृष्टिहीनता किंवा अन्य शारीरिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षण या क्षेत्रात जायचे असल्यास मास्टर इन एज्युकेशन झाल्यानंतर आणखी एक-दोन वष्रे विशेष अभ्यास करावा लागतो.
फिनलंड हा लोकशाही देश असल्याने तेथे अध्यापकांच्या हक्कांसाठी झगडणारी मान्यताप्राप्त युनियन आहे. ही युनियन देशव्यापी आहे. या युनियनच्या जागरूकतेमुळे वर्गातील विद्यार्थीसंख्या मर्यादित राहते. एका वर्गात सर्वसाधारणपणे २०पेक्षा जास्त विद्यार्थी नसतात. अध्यापकांची क्षमता जपण्यावर आणि वाढवण्यावरसुद्धा युनियनचा भर असतो. आपल्या अध्यापकांची क्षमता चांगली असल्याचा युनियनला अभिमान आहे.
अध्यापकांच्या निवडीसाठी परीक्षा असली तरी फिनलंडच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये मोठय़ा प्रमाणावर मानसिक ताण निर्माण होईल अशा कोणत्याही वार्षकि, सत्राच्या अंतिम किंवा प्रमाणित परीक्षाच नसतात. केवळ एक परीक्षा नऊ वर्षांच्या प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागते.
फिनलंडच्या शाळांमध्ये शैक्षणिक स्पर्धा हा प्रकार तसा निषिद्ध आहे, असे म्हणता येईल. येथे कोणतीही 'मेरीट लिस्ट' प्रसिद्ध केली जात नाही. पण असे असले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतांची, त्यांच्या प्रगतीची काळजीपूर्वक नोंद केली जाते. मूल्यमापनासंदर्भात विद्यार्थ्यांना ग्रेडस् म्हणजे श्रेणी दिल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांला कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर अध्यापक स्वत: किंवा विशेष शिक्षक वा समुपदेशक योग्य ती मदत करतात.
जागतिक शैक्षणिक क्रमवारीत जेव्हा फिनलंड पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर असतो तेव्हा त्याचे अप्रूप इथल्या शिक्षकांना वाटत नाही. 'जगाने नोंद घेतली, ठीक झाले' अशी या शिक्षकांची यावर संयमित प्रतिक्रिया असते. कारण त्यांच्या मते, जगात प्रथम क्रमांक मिळवणे हे त्यांच्या कार्यपद्धतीचे उद्दिष्ट नाहीच! त्यांचे उद्दिष्ट आहे ते मुलांना 'शिकावे कसे' हे शिकवणे आणि त्यांना सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत करणे.
फिनलंडचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, इथले ७५ टक्के नागरिक नियमितपणे रोजचे वर्तमानपत्र वाचतात. या देशात एकूणच वाचन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. ग्रंथालयांचा सर्वात जास्त
वापर होणारा देश अशीही या देशाची ओळख सांगता येईल. दर वर्षी इथले नागरिक सरासरी १७ पुस्तके वाचतात, असे निदर्शनास आले आहे.
ही आहेत शैक्षणिकदृष्टय़ा जगात अग्रणी असलेल्या फिनलंडच्या शालेय शिक्षण पद्धतीतील काही टिपणे. तेथील शिक्षणपद्धती संपूर्ण निर्दोष आहे असा दावा करणे कदाचित योग्य ठरणार नाही. परंतु आपल्याला काय हवे, हे त्यांच्याकडून शिकायला, त्यांच्याकडून स्फूर्ती घ्यायला प्रचंड वाव आहे, हे मात्र नक्की!

जीवन प्रवास

जॉनी लिवर.....कसा घडला तो..

जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा 'जॉन प्रकाश ' लहानाचा मोठा झाला.
घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची.
त्याचे वडील 'हिंदुस्तान लिवर 'मध्ये मजुरी करायचे.

त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत.
अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा.कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील 'लिवर' त्याच्या नावाला जोडून त्याला 'जॉनी लिवर' हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार.अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला.त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या "कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा 'गॉडडफादर ' मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली.

पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या 'बाजीगर' मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला 'फिल्मफ़ेअर' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच.

यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं.

त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला.
मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही.

मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात
ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल...???

हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...