Pages

Tuesday, September 6, 2016

जपानमधील शिक्षण

माणसाला घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील नागरिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्या त्या देशातील सरकार प्रयत्न करत असते. पण सध्या जपानमधल्या एका गावात जपान रेल्वे प्रशासनाने जो निर्णय घेतला त्याचे जगभर कौतुक होत आहे. जपानमधल्या एका गावातील रेल्वे सेवा प्रवासी नसल्यामुळे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला होता. परंतु या मार्गावरील रेल्वे सेवेचा वापर शाळेत जाणारी एक मुलगी नियमितपणे करते हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले. जर ही सेवा बंद झाली तर त्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते त्यामुळे प्रवासी नसतानाही फक्त त्या मुलीसाठी जपान रेल्वेने सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
जपानमध्ये कामी शिराताकी नावाचे स्टेशन आहे. येथे प्रवासी नसल्याने या स्टेशनवरची रेल्वे सेवा थांबवण्याचा निर्णय जपान रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पण या स्टेशनवरून एक मुलगी रोज शाळेत जात असल्याने रेल्वे प्रशासनाने ही सेवा सुरू ठेवली होती. या मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रेल्वेचे नुकसान होत असताना देखील हा निर्णय घेण्यात आला. काहीही झाले तरी या मुलीचे शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाने ठरवले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जपानमध्ये फक्त एका प्रवाशासाठी ही ट्रेन सुरू होती. याचवर्षी या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे या गावातील रेल्वे सेवा आतापूर्णपणे बंद झाली आहे. जपान रेल्वे प्रशासनाने या रेल्वेची वेळ या मुलीच्या शाळेच्या वेळेप्रमाणे ठरवली होती. ती सांगेल तेव्हा ही वेळ बदलण्यात यायची. जपानमधील शिक्षणाला प्राधान्य देण्याचा या निर्णयाची गोष्ट आज इंटरनेटवर फिरत आहे. या निर्णयातून खरेच शिकण्यासारखे आहे.

Monday, September 5, 2016

साने गुरुजींची शाळा

शिक्षक दिन विशेष


साने गुरुजी ६ वर्षे शिक्षक म्हणून अमळनेर ला होते..पण त्यांनी शिक्षक म्हणून कसे काम केले याविषयी फार माहिती नसते .शिक्षकदिनानिमित्त आज लोकमत च्या रविवार पुरवणीत मी साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कोणते उपक्रम केले ?ते कसे शिकवत ?यावर लेख लिहिलाय ((शेअर करून शिक्षकापर्यंत हे पोहोचवावे


साने गुरुजींची शाळा

- हेरंब कुलकर्णी

आज  शिक्षक दिन. शिक्षकांचे शिक्षक असलेल्या साने गुरुजींनी सहा वर्षांच्या नोकरीत शिक्षक म्हणून जे प्रयोग केले त्यांची चर्चा फारशी झाली नाही. गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा, शिक्षणविचारांचा, शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रयोगकाळ म्हणता येईल. टिळक, अण्णासाहेब विजापूरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख हे सारे मूलभूत प्रवृत्तीने शिक्षक व शैक्षणिक तत्त्वज्ञ होते.

साने गुरु जी अमळनेरला १९२४ ला शिक्षक झाले. त्यांचा स्वभाव संकोची होता. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणशास्त्राची पदवी नसताना कसे शिकवणार हा प्रश्न होता. सुरुवातीला ते पाचवीला इंग्रजी व संस्कृत आणि सहावीला मराठी शिकवत. पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. गुरुजींचा स्वभाव शांत असूनही त्यांना वर्ग शांत करण्यासाठी फार काही करावे लागले नाही. बोलण्यात इतकी माहिती आणि जिव्हाळा असे की मुलांना त्यांचा तास संपूच नये असे वाटे. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि नकळत गुरु जींच्या डोळ्यात पाणी येत असे.

त्यांचे शिकवणे मुले पुढेही विसरली नाहीत. कवी दत्त यांचा शिकविलेला पाळणा आणि शेक्सपिअरच्या नाटकातला शायलॉकचा संवाद नंतर अनेक वर्षे मुले एकमेकांना सांगत असत. गुरुजींनी कवी दत्त यांचा पाळणा शिकवताना दारिद्र्यामुळे झालेल्या श्यामच्या आईच्या आशा- आकांक्षाचे उद्ध्वस्त स्मशान त्यांच्या डोळ्यांपुढे आले. गुरु जी म्हणाले की, ‘आई असणं ही मानवी जीवनातील अति महत्त्वाची घटना आहे. आईचे प्रेम तेच खरे प्रेम.’ गीत संपल्यावर गुरुजींनी आणि मुलांनी डोळे पुसले.

मधली सुटी सुरू झाली पण तरीही मुले हलली नाहीत. इतर वर्गातील मुले डोकावून बघत की हा वर्ग का सुटला नाही. ‘माझी जन्मभूमी’ ही कविता शिकवताना डोळे भरून आले. कवितेतील ‘नि:सत्त्व निर्धन तुला म्हणताती लोक’ ही ओळ त्यांनी म्हटली. डोळ्यातून अश्रू येऊ लागल्याने पुढे शिकविणेच त्यांना अशक्य झाले. पुस्तक बंद करून ते वर्गाच्या बाहेर निघून गेले.

गुरु जी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात. दररोज पाचपंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत. इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. यावेळी त्यांचा देशाभिमान, मातृभूमीवरील भक्ती उचंबळून येत असे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत. गुरु जी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांचे स्वत:चेच तंत्र बनविले होते. ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते. मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत.

वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर गुरुजींचा भर होता. त्यांनी छात्रालयाचे काम बघायला सुरुवात करताच छात्रालयाचे अनाथपण गेले. ते मुलांना शिस्तीतून बदलवण्यापेक्षा प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करीत. गुरु जी गोड प्रार्थनागीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर, पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरु जी मुलांना उठवत. कोरडेच रुक्ष उपदेशाचे घोट उठता बसता त्या बालजिवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय देत.

छात्रालयात मुले कपडे धूत नसत. खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके, सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत. मुले शाळेत गेली की साने गुरु जी गुपचूप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत, कंदिलाच्या काचा पुसून ठेवत. मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुले म्हणायची, ‘‘आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय?’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘अरे, आई का मुलाला लाजविण्यासाठी हे सारे करत असते?’’

मुलांची त्यांना टोकाची काळजी असे. कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवाशुश्रूषा केली. मुलांच्या मदतीने गुरु जींनी बाग तयार केली. एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरु जींनी सजविले. मुलांनी गाणी म्हटली. बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गाविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरु जी एकदा शिकवत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला.

गुरु जींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू?’’ आणि त्यांनी वर्ग सोडून दिला. समानतेची शिकवण गुरु जी मुलांना कृतीतून देत. छात्रालयात जेवण एकाच पंगतीत दिले जाई. एकदा मुले आणि गुरु जी सहलीला गेली. रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली. पण गुरुजी म्हणाले, ‘‘जर मुले सतरंजीवर झोपली आहेत तर मग मी गादीवर झोपणार नाही.’’

सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. वर्तमानपत्रात मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करून ठेवीत. महात्मा गांधींचा ‘यंग इंडिया’ तिथे येत असे. अमृतबझार पत्रिकाही तिथे येत असे. त्यातील निवडक माहिती मुले वाचत असत.

छात्रालय दैनिक अशी एक वेगळीच कल्पना गुरुजींना सुचली. ते रोज रात्री- पहाटे उठून दोन तास एकटेच ते संपूर्ण दैनिक लिहून काढत आणि सकाळी मुलांसाठी लावत. इतके टोकाचे कष्ट ते मुलांसाठी घेत होते. देश-विदेशातील विविध घटनांची नोंद असे. थोरांची चरित्रे, विज्ञानातील विविध प्रयोगांची माहिती, कधी आठवणी दिल्या जात. स्थानिक गावातील शाळेतील आणि छात्रालयात जे घडायचे तेसुद्धा या दैनिकात असायचे. एखाद्या विद्यार्थ्याने काही चांगले काम केले की त्याची माहिती असे आणि एखाद्याच्या वागण्यात काही उणेपणा असला तरी त्याचे नाव न घेता निनावी नोंद केलेली असे. यातून त्या मुलाला आपली चूक दुरुस्तीचा संदेश आपोआप मिळायचा.

या दैनिकात मुलांच्या खोल्यांची वर्णने येत. मुलांच्या गुण-दोषांची चर्चा असे. मुलांमधील भांडणे, अबोला सर्व काही असे. विनोद, कविता असे. देशाविषयी चिंतन असे. इतिहास, समाज, शिक्षण, धर्म असे नाना प्रश्न असत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद, कधी चुटके, स्फुट विचार असे खूप काही असे. जगातील विविध देशांचे स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन असे, तर कधी रवींद्रनाथ, इकबाल, व्हीटमन, गटे, बायरन, शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे असत.

मुले मैदानावर असताना गुरुजी तिथे जात. त्यांच्यात भाग घेऊन खेळत. विटीदांडूचाही खेळ खेळत. मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसांत मुले गाढवांना जो त्रास देतात त्याविरोधात काम करणाऱ्या ‘गर्दभ क्लेशनिवारण मोहिमे’ला प्रोत्साहन दिले. त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.

साने गुरु जींनी सुरुवातीला वाचनालय काढले. विद्यार्थ्यांना दरमहा दोन आणे वर्गणीत पुस्तके, मासिके वाचायला मिळत. गुरु जी मुलांनी गांधींचा ‘यंग इंडिया’ वाचावा म्हणून त्यावर लाल पेनने खुणा करून ठेवत. गुरुजी मुलांची खानेसुमारी करीत. त्यात लेखक, चित्रकार, खेळाडू असे मुलांचे वर्गीकरण करीत.

असाचा एक उपक्र म हा मुलांनी आपल्या गावांची वर्णने लिहायची. त्यातून गावातील जातिव्यवस्था, भांडणे, दारूचा परिणाम, ऐतिहासिक-पौराणिक ठिकाणे, शिक्षणाची स्थिती, पाण्याच्या बाबतीत स्थिती, पिके व शेतीची अवस्था, कर्ज, अनेक गावांत सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा अशी विविध माहिती जमवायला सांगत.

१९४६ मध्ये ‘कुमारांपुढील कार्य’ या भाषणात ते म्हणतात की, ‘‘तुम्ही गोष्टी, गाणी, ओव्या, दंतकथा सारे गोळा करा.

एकेका तालुक्यात ४/४ कुमारांनी हिंडावे व ते गोळा करून त्याचे नीट संपादन करा. ते अमर कार्य होईल.’’

गुरु जींनी जरी शिक्षकी पेशा सोडला तरीसुद्धा त्यांना पुन्हा शिक्षक होण्याची ओढ होती. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर ते मित्राला म्हणाले की, ‘‘मला कुठे तरी ग्रामविभागात मुलांत राहावे, त्यांच्यासोबत खपावे, त्यांना चार अक्षरे शिकवावी असे वाटते.

परंतु देवाने येथे गुंतवून टाकले आहे.’’

साने गुरुजींचे

शिक्षणासंबंधी विचार..

मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. आदळआपट आणि शिक्षा, दंड यांनी मुलांचा खरा विकास होत नाही. खरा विकास हृदयात शिरल्याने व प्रत्यक्ष सेवेने होईल. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक लहानपणी मुलांना मिळायला हवेत. मुलांना कितीही देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. उलट त्यांना याच गोष्टींचा कंटाळा वाटू लागतो. मुलांच्या मनावर जर संस्कारच नाही तर एकदम तुमच्या गोष्टी त्यांना कशा आवडू लागतील? शिक्षकांनी प्रथम ५ ते ६ मिनिटे सामाजिक, राष्ट्रीय विषय मुलांशी बोलावे. सर्वच शिक्षक जर असे करू लागले तर मुलांची मने फुलतील...

(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com  phone 9270947971

------------------------------------------------
शिक्षक दिनानिमित्त गुरुजींचा हा प्रेरणादायी लेख आपल्या  शिक्षक मित्रांना पाठवा 

Friday, September 2, 2016

झिका रोग

ब्राझिलमध्ये थैमान घालणारा झिका रोग आशियायी खंडात देखील पसरत आहे. आशिया खंडातील काही देशांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने पसरू शकतो असे नव्या संशोधनातून समोर आहे आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे होणा-या झिकाने आधिच ब्राझिल आणि दक्षिण अमेरिकी देशांत थैमान घातले आहे. पण नव्या माहितीप्रमाणे भारतात देखील हा रोग पसण्याची शक्यता आहे. भारताबरोबर चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, नाजेरिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांना या झिकाचा धोका अधिक आहे.
या देशांमध्ये पर्यटकांचा राबता हा जास्त आहे. ज्या देशांत झिकाचा प्रार्दुभाव आहे अशाच देशांतून भारत आणि वर नमूद करण्यात आलेल्या देशांत अधिक पर्यटक येतात त्यामुळे झिकाचा प्रसार या देशांत होऊ शकतो अशी भिती या संशोधातून व्यक्त करण्यात आली आहे. कमरन खान यांनी केलेल्या संशोधनातील प्रंबधात याविषयी अधिक माहिती मांडण्यात आली आहे. तसेच झिकाचा विषाणूचा प्रसार होण्यासाठी या देशातील बदलते हवामान कारणीभूत आहे त्यामुळे झिकाचा धोका या देशांना अधिक असल्याचे म्हटले आहे. या देशांतील लोकसंख्या ही सगळ्यात जास्त असल्याने यातून होणारे नुकसान हे मोठे असणार आहे असेही त्यात म्हटले आहे. झिकाची लागण होऊ नये यासाठी अनेक देशांत आधीच उपाययोजना केल्या आहेत पण मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर हे अवलंबून असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात सिंगापूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर गुरूवारीच तेथील १३ भारतीयांना झिकाची लागण झाल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मलेशियामध्ये देखील झिकाचा रुग्ण आढळला त्यामुळे आशियायी देशांत झिकाचा प्रसार होण्यास सुरूवात झाली हे नक्की. आता भारतासहित अनेक देशांची नावे समोर आल्याने भारताला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपायोजना कराव्या लागणार आहेत.

Saturday, August 27, 2016

Rules of Spelling

⭕ Rules of Spellings⭕

इंग्रजी भाषेत प्रत्येक स्पेलिंगचे ठराविक नियम नसतात. इंग्रजीत काही स्पेलिंग वाचतांना विचित्र वाटतात. म्हणून उच्चाराचे व स्पेलिंगचे कितीही नियम शिकले तरी स्पेलिंग बद्दल संपूर्ण माहिती घेतली असे म्हणता येणार नाही. तरी स्पेलिंग वर प्रभूत्व मिळविण्यासाठी वाचन एक प्रभावी माध्यम आहे. इंग्रजीचे जास्तीत जास्त वाचन केल्यामुळे इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगमधील चूका सहजच कमी होत जातील. आपण तीन गोष्टीं बघणार आहोत.

 ***अक्षराची पुनरावृती करण्यासंबंधीचे नियम

शब्दातील शेवटचे अक्षर व्यंजन असताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती करण्यासंबंधीचे नियम

*1a. एका syllable ( syllable म्हणजे मराठीत एका शब्दात 'शब्दावयव'.) च्या शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती केली जाते.

उदा. cut + ing = cutting

stop + er = stopper

fat + est = fattest

thin +er= thinner

*1b. पण व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होत नाही.

उदा. fat +ness = fatness

thin +ly =thinly

*2a. शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर असल्यास प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होत नाही.

उदा.  fear +ed = feared

cook + ing =cooking

keep + er = keeper

*2b. अपवाद-

acquit +ed = acquitted

quit +er = quitter

wool + en = woolen

***great, rich, fall  आणि fat या शब्दांमधे प्रत्येकी एकच शब्दावयव आहे. कारण उच्चाराच्या दृष्टीने या शब्दांचे एकापेक्षा जास्त तुकडे पाडता येत नाहीत. पण fat-ness आणि  joy-ful यांचे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी दोन तुकडी पडतात. म्हणून  fatness, joyful मधे दोन  syllable आहे. आणि im-por-tant आणि joy-ful-ness मधे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी तीन  syllable आहेत.

*3a. एकापेक्षा जास्त शब्दावयव ( =syllable) असलेल्या शब्दात शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असेल आणि शब्दाच्या शेवटच्या अवयवावर जोर पडत असेल तरच स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती केली जाते.

उदा.  begin +er = beginner
admit + ance = admittance
occur + ence = occurrence
recur + ence = recurrence
commit + ed = committed  (दोन )
commit + ment = commitmet
regret + ed = regretted

*3b. आता पुढील शब्दांना प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होणार नाही कारण पुढील शब्दांच्या  शेवटच्या भागावर जोर पडत नाही.

उदा. open + ing = opening
offer + ed = offered
proffer + ed = proffered
happen + ing = happening
enter + ed = entered
conquer+ or = conqueror

*3c. अपवाद- handicap, kidnap आणि worship अपवाद आहेत. या शब्दांच्या शेवटच्या भागावर जोर पडत नसला तरी प्रत्यय जोडताना शेवटच्या अक्षराची पुनरावृती होते.

जसे. worship +er = worshipper; kidnap +ed = kidnapped; handicap + ed= handicapped

3d. focus आणि  bias मधे ed जोडताना दोन s  (=ss) किंवा एकच s काहीही लिहले जाऊ शकते.

focus + ed = focused/focussed   bias + ed= biassed/biased

4. शब्दाच्या शेवटी -l (एल) आणि -l पूर्वी एक स्वर असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना -l ची पुनरावृती होते.

उदा.

cancel + ed = cancelled
model + ing = modelling
travel + er = traveller
अपवाद : parallel + ed = paralleled

5. शब्दाच्या शेवटी l असल्यास आणि l पूर्वी दोन स्वर असल्यास आणि दोन स्वरांचा उच्चार स्वतंत्र होत असल्यास साधारणपणे l ची पुनरावृती केली जाते.

उदा.  duel + ist = duellist

(duel (ड्यूअल) द्वंद्वयुद्ध; duellist (ड्यूअलिस्ट) द्वंद्वयोद्धा)

dial + ing = dialling

(dial  (डाइअल) = घड्याळ, इ. ची तबकडी, फोन लावणे )

fuel + ing = fuelling

(fuel (फ्युअल)= इंधन, सरपण, जळतण, ला इंधन पुरविणे )

पण

feel + ing = feeling

fail + ed = failed

fool + ed = fooled

6. शब्दाच्या शेवटी w किंवा y असताना मात्र त्याआधी एक स्वर असला तरी प्रत्यय लावताना w किंवा y ची पुनरावृती होत नाही.

उदा. play + er= palyer   slow + est = slowest


 7. शब्दाच्या शेवटी e असताना e काढण्याचा किंवा न काढण्यासंबंधीचे नियम

 i .)  शब्दाच्या शेवटी e असल्यास स्वराने सुरू होणारे प्रत्यय जोडताना e काढले जाते.

उदा. belive + er = believer
sincere + ity = sincereity
believe + able= believable

अपवाद :-
dye + ing = dyeing
singe + ing = singeing

ii.) 'e' शेवटी असलेल्या शब्दाला व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना शेवटचे e काढले जात नाही.

उदा. sincere + ly = sincerely
hope + less = hopeless
care + full = carefree
polite + ness = politeness

अपवाद :-
argue + ment= argument
nine + th = ninth
awe + full = awfull

due/undue/true/whole/ + ly = duly/unduly/truly/wholly

iii.) judge, abridge आणि acknowledge e काढल्यास किंवा e लिहल्यास दोन्ही प्रकारे स्पेलिंग बरोबर होतात.

उदा. judge +ment = judgement/judgment

iv.) शब्दाच्या शेवटी -ce  किंवा -ge  असल्यास o, a किंवा व्यंजनाने सुरू होणारे प्रत्यय जोडताना e काढले जात नाही.

उदा.  notice + able = noticeable
replace + replaceable
courage +ous = courageous
change + able = changeable
manage + ment = management
peace + full = peaceful
marriage + able = marriageable

v.) शब्दाच्या शेवटी -ee असल्यास प्रत्यय जोडताना e काढले जात नाही.

उदा. see + ing = seeing
agree + able = agreeable
agree + ment = agrement

8. शब्दाच्या शेवटी -y असल्यास प्रत्यय जोडताना स्पेलिंग बदलांसंबंधीचे नियम

   i .)शब्दाच्या शेवटी -y असल्यास प्रत्ययजोडताना y चे i करावे.

उदा. happy + ly = happily
lazy + ness = laziness
hurry + ed = hurried
study + es = studies
beauty + full = beautiful

पण शेवटच्या y पूर्वी स्वर असताना मात्र कोणतेही प्रत्यय जोडताना y चे i केले जात नाही, जसे, obey + ed = obeyed; play + er = player; buy+ ing = buying

ii. ) शेवटी  y असललेल्या शब्दात ing हे प्रत्यय जोडताना y चे i कधीच केले जात नाही किंवा y काढलेही जात नाही.

उदा. study + ing = studying   worry + ing = worrying  try + ing = trying

iii ) twenty, thirty, forty, fifty, sixty इत्यादी संख्यांमध्ये th मिळवताना शेवटचे y चे ie होते.

उदा. twenty +th = twentieth;  thirty + th = thirtieth

9) क्रियापदाच्या शेवटी -ce असल्यास त्या शब्दात -ed/-ing जोडताना k वाढवतात.

उदा. frolic + ing = frolicking  panic + ed = panicked

10) क्रियापदाच्या शेवटी -ie असल्यास त्याला ing लावताना ie चे y करतात.

उदा. belie + ing = belying
 lie + ing = lying
die + ing = dying
tie + ing = tying
vie + ing = vying

11 a) full हे  प्रत्यय एखाद्या  शब्दात जोडताना full मधील एक l काढून टाकले जाते.

उदा. 1. use + full = useful
2. care + full = careful
3. wonder + full = wonderful
4. fear + full = fearful

11b) ज्या शब्दात full जोडले जात आहे त्या शब्दाच्या शेवटी पण ll असल्यास त्यातील एक सुद्धा काढले जाते.

उदा.
skill + full = skilful
  full+ fill = fulfill.. 

सरल माहिती भरणे

Mobile वरून MDM भरण्यासाठी सोपा मार्ग guttedattatray.blogspot.com वर क्लिक करा माझा blog open होईल, त्यानंतर सर्वात खाली vew web version वर क्लिक करा म्हणजे PC वरील blog open होईल त्यानंतरblog वर प्रथम उजव्या बाजूला शैक्षणिक websites मुद्यामध्ये सरल या शब्दावर क्लिक करा, सरल website open होईल त्यातील म भो यो (MDM)वर क्लिक करा login करा व mobile वरून MDM माहिती भरा

blog कसा तयार करावा

1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 माहिती कशी दिसते हे priview पाहुन तपासा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !

Thursday, August 25, 2016

आधार माहिती भरणे शंका आणि समाधान. Student Portal

*आधारकार्ड माहिती शंका आणि समाधान*

(पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल. आणि योग्य वाटली तर नक्कीच इतर अनेक ग्रुपवर शेअर करा. )
  🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵  
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶ *डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे*

➡ *उत्तर*- सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला *100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे.* पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर *जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी.* त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे.

▶ *मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी*

➡  *उत्तर* - Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  *All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click* करा.
       आता तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुले दिसतात. ज्या मुलांच्या पुढे valid Adhar असे दिसते. अशा मुलांचे आधार नंबर योग्य आहे हे आपल्याला कळेल.

▶ *आधार च्या डाउनलोड केलेल्या Excel file मध्ये पटसंख्येपेक्षा मुले कमी का दिसतात?*

➡  *उत्तर* - मागील वर्षी आपण मुलांची माहिती भरलेली होती. त्यामधील काही मुलांचे आधार नंबर valid (म्हणजे बरोबर) झालेले होते. ज्या मुलांचे आधार नंबर बरोबर आहेत अशा मुलांची नावे परत आधार नंबर भरण्यासाठी येणार नाहीत. म्हणून मुलांची नावे कमी दिसतात.

▶ *आणि आधार डाउनलोड फाईल मध्ये जर मुले कमी दिसत असली तर काय करावे?*

➡  *उत्तर* - मुले कमी दिसत असली तरी आपण त्याठिकाणी वाढीव मुले अॅड करू शकत नाही. म्हणून डाउनलोड फाईल मध्ये जे मुलं दिसत असतील तेवढ्या मुलांची आधार माहिती भरून फाईल अपलोड करुन टाका.

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

➡  *उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही. आता *Enter* दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.
   
▶ *आधारकार्ड चुकीची माहिती असली तरीही आपल्याला भरायची आहे. यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थी डाटा बदलेल का?*
                         
➡ *उत्तर* - *अजिबात बदलणार नाही.* आपण हे लक्षात घ्या की आधारकार्ड वरील जशी आहे तशी माहिती भरण्यामागे एकच उद्देश आहे की ही माहिती *UID department* कडे *Verification* साठी जाणार आहे. आपण जशी आहे तशी माहिती भरल्यामुळे आपल्या मुलांचे आधार नंबर *valid* (म्हणजे बरोबर) ठरतील. आणि *तो मुलगा किंवा मुलगी हे याच शाळेत शिक्षण घेत आहेत हे सिद्ध करणे हाच शासनाचा हेतू आहे.*

▶  *विद्यार्थी आधार माहिती भरली की ती  uid मध्ये दिसते. पण आधार रिपोर्ट मध्ये दिसत नाही यासाठी काय करावे लागेल?*

 ➡ *उत्तर* - आपण भरलेली माहिती ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर *UID department कडे Verification साठी जाणार आहे.* त्यांच्याकडून *Verification* झाल्यानंतरच त्याचा *Report* आधार रिपोर्ट मध्ये येईल. यासाठी मोठा कालावधी लागतो. म्हणून *आपण भरलेली माहिती लगेच आधार रिपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ही माहिती UID Details मधून दिसते.*

▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

आधार माहिती भरणे Student Portal

*आधार फाईल भरतांना व अपलोड करताना घ्यायची काळजी*
        (मित्रांनो पोस्ट काळजीपूर्वक वाचा.)
   🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶  *save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?*

*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶ *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   🔵 *हे सर्व करताना घ्यायची काळजी* 🔵
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

*उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

▶ *आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?*

*उत्तर* -  मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील.
▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      राहुरी 🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  

इ.1ली नवीन विद्यार्थी Student Portal वर माहिती भरणे, सन 2016-17

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : २४/०८/२०१६*
(कृपया सर्व बांधवांना share करावे ही विनंती)

*student पोर्टल* :

१)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली च्या मुलांची सरल student पोर्टल मध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.दिनांक २३ ऑगस्ट पासून  पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.दिनांक 24 ऑगस्ट पासून ही सुविधा संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता लवकरच पूर्ण करावयाची असल्याने ही माहिती दिलेल्या वेळेत भरणे अत्यावश्यक आहे.या माहितीसाठी मुदत वाढ देण्यात येणार नाही आहे ही बाब या वेळी लक्षात घ्यावी.

२)नविन विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी याबाबत सखोल आणि विस्तृत माहिती आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.

*नवीन विद्यार्थी माहिती कशी भरावी यासाठीचे Manual डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* : http://goo.gl/qikIvJ

३)इयत्ता १ ली व्यतिरीक्त इतर वर्गातील मुले जी मागील वर्षी भरावयाची राहून गेलेली आहे त्या मुलांची माहिती भरण्यासाठीची सुविधा योग्य वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्याविषयी काळजी करू नये.

४)इयत्ता पहिली वगळता ज्या मुलांची माहिती मागील वर्षी नोंद झालेली आहे अशा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती त्या जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घेणे बंधनकारक आहे.काही शाळा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती नविन विद्यार्थी म्हणून भरण्याचा प्रयत्न करतील म्हणून सध्या फक्त पहिलीचे विद्यार्थी भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांच्या मुलांची माहिती जे मागील वर्षी नोंद झालेले नव्हते त्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या नंतर फक्त अशाच मुलांची माहिती आपणास भरता येणार आहे ज्यांची खरोखर मागील वर्षी नोंद झालेली नव्हती.जर मागील वर्षी नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची इतर शाळेत ट्रान्स्फर झाली असेल आणि नविन शाळेच्या मुख्याध्यापकाने जर त्या विद्यार्थ्याला जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून न घेता नविन विद्यार्थी म्हणून भरावयाचा प्रयत्न केला तर system अशा मुलांची माहिती स्वीकारणार नाहे याची गांभीर्याने नोंद घ्यावे.त्यासाठी आपण ट्रान्स्फर होऊन आलेल्या मुलांची माहिती त्वरीत जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घ्यावी.

५)जर आपण ट्रान्स्फर विनंती केलेल्या मुलाची माहिती जुन्या शाळेतले मुख्याध्यापक ट्रान्स्फर विनंती approve करत नसतील आणि त्यामुळे जर नविन शाळेला संच मान्यतामध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर त्यासाठी  जुन्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला दोषी धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

६)ट्रान्स्फर विनंती पाठवली जात नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.यासाठी आपण पुढील लिंक ला क्लिक करून आपली समस्या त्वरीत कळवा.समस्या मांडताना समस्येविषयी सविस्तर माहिती भरा.माहिती भरत असताना समस्या नसताना विनाकारण काहीही लिहित बसू नये,त्रास होईल असे लिखाण करू नये.आम्ही आपणास केवळ आणि केवळ मदत करण्याच्या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत याची नोंद घ्यावी.

*समस्या कळवण्यासाठीची लिंक* :
http://goo.gl/9vBAQ8

७)नविन विद्यार्थी माहिती भरताना जर इयत्ता पहिलीला मागील वर्षीपेक्षा या वर्षी तुकडीची संख्या वाढली असेल तर आपणास या वर्षी तुकडी वाढवून घ्यावी लागेल.तुकडी वाढवली तरच आपल्याला excel sheet उपलब्ध होईल.तुकडी वाढवण्यासाठी create division ची tab आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

८) या वर्षी नविन शाळा चालू झालेली असेल तर आपल्या शाळेचा udise आणि password साठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९)अद्यापही बऱ्याच गटशिक्षणाधिकारी लेवल वर ट्रान्स्फर च्या विनंती पेंडिंग आहे.तरी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना विनंती आहे की आपण त्वरीत या सर्व विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्याना ट्रान्स्फर करावे.तालुकानिहाय पेंडिंग स्थिती बाबतच्या आकडेवारीची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अशा पेंडिंग कामाच्या पूर्ततेबाबत शिक्षणाधीकारी यांनी त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.आपले काम अपूर्ण राहिल्यास भविष्यात होणाऱ्या online कामात अडचण निर्माण झाल्यास संबंधिताना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

१०)आपणास हे देखील कळविण्यात येत आहे की मागील १० दिवसापूर्वी विद्यार्थांची आधार माहिती भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अद्यापही बऱ्याच मुलांची माहिती भरली गेलेली नाही आहे.तरी ती माहिती त्वरीत भरण्यात यावी.या वर्षी आपणास १००% मुलांची आधार माहिती भरावयाची आहे.ज्या मुलांनी अद्याप आधार नंबर मिळवला नसेल अशा मुलांच्या पालकांचे प्रबोधन करून त्याच्याकडून त्वरीत आधार नंबर मिळविण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक यांनी करावयाचा आहे.आधार नंबर कसे भरावयाचे आहे याबाबत सविस्तर माहितीपत्रक मॅन्युअल havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.

११)student पोर्टल संदर्भात सर्व प्रकारच्या कामासाठीचे manual पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तसेच आपण havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.

12) *duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* :
http://goo.gl/7lSj8b

*school पोर्टल*  :

१3)या शैक्षणिक वर्षात शाळा पोर्टल मध्ये आपणास माहिती भरण्यासाठीची सुविधा येत्या २ दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे.या वर्षी माहिती भरण्यासाठी आपणास ही सुविधा offline पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.offline पद्धतीने माहिती कशी भरावी यासाठीची काही दिवसापूर्वीच
E-GOVERNANCE सेल कडून राज्यस्तरीय विभागीय ट्रेनिंग घेण्यात आलेल्या आहे.सर्व शिक्षक बांधवाना या ट्रेनिंग जिल्हा,तालुका पातळीवरून दिल्या जाव्यात अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.आपणास सदर बाबतीत ट्रेनिंग मिळाली नसेल अथवा अडचण निर्माण होत असेल तर कृपया आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती.तसेच या बाबतीत school पोर्टल ला लवकरच manual देखील उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.याबाबत आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.

*MDM (शालेय पोषण आहार पोर्टल)* :

१४)शालेय पोषण आहार योजनेंतर्गत opening balance, daily attendance, stock inward बाबत माहिती सरल पोर्टल मध्ये नोंद्विन्याबाबत या शैक्षणिक वर्षापासून सूचना देण्यात आलेल्या आहेत.परंतु अद्यापही काही शाळांची माहिती पूर्ण झालेली नाही आहे असे दिसून आले आहे.अशा शाळांची माहिती पूर्ण करण्याच्या हेतूने शासनाने अंतिम मुदत वाढवून दिनांक २५ ऑगस्ट २०१६  दिलेली आहे.या नंतर आपणास मुदत वाढवून देण्यात येणार नाही अशा सुचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहे याची नोंद घ्यावी.

१५)मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षामुळे जर सदर माहिती भरण्याची अपूर्ण राहिल्यास संबंधित आहाराचे बील देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असेल असेही वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.त्यामुळे सर्वाना विनंती आहे की दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत आपली माहिती भरण्यात यावी.

१६)ज्या शाळेचा ओपेनिंग balance चुकला असेल आणि beo लेवल वरून verify झालेला असेल तसेच stock inward भरून beo ने verify केलेला असेल तर अशा शाळेचा ओपेनिंग balance व stock inward दुरुस्थ करण्यासाठी तो ओपेनिंग balance व stock inward शिक्षणाधिकारी यांना परत पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१७)daily attendance ची माहिती शाळेला रोजच्या रोज पाठवणे बंधनकारक आहे.ही माहिती भरण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे.आपण ही माहिती रोज सकाळी ९:३० नंतर भरू शकणार आहात.त्या अगोदर आपणास ही माहिती भरता येणार नाही.

१८)एखाद्या दिवशी काही महत्वाच्या अडचणीमुळे शालेय पोषण आहार शिजवून दिला नसेल तो का देण्यात आलेला नाही याबाबत system मध्ये कारण नमूद करावे लागतात.या कारणाच्या लिस्ट मध्ये आता other या नविन कारणाचा समावेश करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी.

19)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 20) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364

Saturday, August 20, 2016

तपश्चर्या गुरूशिष्येची

तपश्चर्या गुरूशिष्येची!

अकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद

 August 20, 2016



अकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद

ही घटना आहे २००१ मधील. बॅडमिंटन विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ऑल इंग्लंड स्पर्धेचं जेतेपद पटकावलेला तो तरुण खेळाडू विमानतळावर उतरला. पायाभूत सुविधांचीही वानवा असताना आणि दुखापतींनी सातत्यानं सतावूनही या तरुणानं अवघड असं जेतेपद नावावर केलं होतं. विमानतळावर स्वागताला त्याची आई आली होती. जेतेपदाचा चषक उंचावत मुलगा बाहेर येईल अशी आईची अपेक्षा. परंतु तो तरुण शांतपणे बाहेर आला. आईला नमस्कार केला. पण मुलगा वेगळ्याच विचारात असल्याचं आईला जाणवलं. आईनं काळजीनं विचारलं- ‘‘काय झालं?’’ तो तरुण बॅडमिंटनपटू म्हणाला, ‘‘हे जेतेपद अतिशय आनंद आणि समाधान देणारं आहे. यासाठी तुम्ही केलेला त्याग मला आठवतो आहे. अडथळ्यांच्या शर्यती पार करत सातत्यानं संघर्ष करत मला या जेतेपदापर्यंत वाटचाल करावी लागली. दुखापतीमुळे मी आणखी किती दिवस खेळू शकेन ठाऊक नाही. परंतु पुढच्या पिढीतील खेळाडूंना हा त्रास होऊ नये, यासाठी मी काही तरी करणार आहे.’’

तो तरुण होता पुल्लेला गोपीचंद. ते निव्वळ बोलून थांबले नाहीत. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांनी लवकरच निवृत्ती स्वीकारली. त्याआधीच प्रशिक्षण सुरू केलेल्या गोपीचंद यांच्या मनात अकादमीचा विचार होता. खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण असताना बॅडमिंटन अकादमीचा विचार धाडसाचा होता. ऑल इंग्लंड जेतेपदाच्या निमित्तानं आंध्र प्रदेश सरकारनं गोपीचंद यांना अकादमीसाठी हैदराबादजवळच्या गच्चीबाऊली इथं पाच एकर जागा देण्याचं जाहीर केलं. जागेचा प्रश्न सुटला, पण वास्तू उभारणीसाठी निधी नव्हता. उद्योजक आणि नातेवाईक निम्मगडा प्रसाद यांनी गोपीचंद यांची तळमळ लक्षात घेऊन पाच कोटी रुपये रक्कम दिली. अन्य नातेवाईकांच्या मदतीनं दीड कोटी रुपये जमले, पण तरीही पैसे कमी पडत होते. अखेर गोपीचंद यांनी स्वत:चं राहतं घर गहाण ठेवलं. गोपीचंद यांचे वडील, आई आणि पत्नी यांनी त्यांच्या अभियानात पुरेपूर साथ दिली. यातूनच उभी राहिली गोपीचंद अकादमी. एकापेक्षा एक प्रतिभावान बॅडमिंटनपटूंना घडवणारी बॅडमिंटन पंढरी. १२व्या वर्षांपासून याच अकादमीत गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालत पदक परंपरा कायम राखली आहे. ऑलिम्पिक पदकाच्या निमित्ताने या गुरूशिष्य जोडीच्या तपश्चर्येला फळ मिळालं आहे.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...