Pages

Monday, August 7, 2017

एक बिनभिंतीची शाळा

एक बिनभिंतीची शाळा...शिक्षण हे माणूस घडणीचे ..आयुष्याला आकार देणारे

सर्वच विषयांत नापास होणारा तरूण चालवत आहे.

या शाळेला भिंती नाहीत, अभ्यास नाही, गृहपाठ नाही, परीक्षा नाही आणि पास नापासाचे मापदंडही नाहीत. खेळा आणि फक्त खेळा अस म्हणणारी ही शाळा दर शनिवारी भरते. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलात. तिच नावच आहे 'स्कूल विदाउट वॉल्स' बिनभिंतीची शाळा.

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची अपेक्षा करणाऱ्या आजच्या व्यवस्थेत साताठ तरुणांनी आपल्या पातळीवर शिकण्याची व्याख्या बदलण्याच ठरवल आणि उभी राहिली एक बिनभिंतीची शाळा. परिस्थितीशी जुळवून हवे ते साध्य करणारा तरुण म्हणजे पंकज गुरव. बारावीमध्ये जवळपास सर्वच विषयांत नापास होणारा हा तरूण आज येऊर मध्ये लहान मुलांमध्ये बिनभिंतीची शाळा चालवत आहे. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करून आलेले सामाजिक भानच त्याच्यासाठी दिशादर्शक ठरले.

चिरागनगर इथल्या वस्तीत राहणारा पंकज गुरव 'समता विचारक संस्थे'च्या विविध उपक्रमांमध्ये २००२ पासून काम करत होता. गावाभेटीच्या उपक्रमातून विविध गावांच्या समस्यांची जाणीव पंकजला झाली. ग्रामीण भागातील मुलांसाठी वेगळे काम करण्याचा निश्चय त्याने केला.येऊर गावात पंकजने बिनभिंतीची शाळा सुरू केली. खेळ, नाटक, नृत्य आणि अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम या शाळेत घेतले जातात. मात्र यातून मिळणारे शिक्षण हे माणूस घडणीचे आणि आयुष्याला आकार देणारेच असते.कोणत्याही साहित्याशिवाय स्थानिक खेळांवर भर असतो. मात्र खेळांतून शिक्षण कस देता येइल, भूगोल, गणित वगैरे विषयांशी जोडण्यावर भर असतो.

ठाण्यापासून इतक्या जवळ असूनही या मुलांचा शहरी संस्कृतीशी कोणताही परिचय नाही. शाळेत येण्यापेक्षा आई-वडिलांबरोबर जंगलात जाण, त्यांना कामात मदत कारण, धाकट्या भावंडांना सांभाळण, जंगलात रहात असल्यामुळे जनावरांच्या भीतीने लवकर घरी जाण या त्यांच्या सहाजिक गरजेच्या गोष्टी.शाळा सुरू झाल्यापासून हळूहळू उपस्थिती वाढू लागली. पाचवीत शिकणाऱ्या मुलाला स्वत:चे नावही लिहिता येत नाही अशी परिस्थिती होती. अशा मुलांना अक्षर ओळखण्याचे शिक्षण देण्यात आले.

ठाण्यातील अभिनव उपक्रमात  शाळेच्या मुलांचा सहभाग असतो आणि त्यात त्यांनी पारितोषिके मिळवली ज्याचे महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांनी खूप कौतूक केले आणि मुलांना प्रोत्साहन दिले. अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेल्या पंकजने अशाच वर्गातील मुलांसाठी उचललेले हे पाउल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

256 वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट!

२५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट!

२५६ वर्षात एकदाही दारू किंवा तंबाखूला स्पर्श केला नाही

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: August 5, 2017 7:37 PM



एखाद्या माणसाचं वयोमान जास्तीत जास्त किती असू शकतं तुम्हाला कल्पना आहे का? कुणी म्हणेल ७५ ते ८५ कुणी म्हणेल १०० वर्षे.. पण आज आम्ही तुम्हाला या बातमीतून सांगतोय २५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट. वाचून आश्चर्य वाटेल पण चीनच्या ली-चिंग यूएन या माणसाचा मृत्यू वयाच्या २५६ व्या वर्षी झाला. ही गोष्ट कोणतीही परिकथा नाही तर वास्तव आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं या ली चिंग यूएन यांच्या १५० व्या वाढदिवसासंबंधीचा एक लेख १९३० मध्ये प्रकाशित केला होता. चेंगाडू विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक वू- चुंग- चियाह यांनी ली-चिंग यूएन यांना १५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा १८२७ मध्ये दिल्या होत्या आणि ते १५० वर्षे कसे जगले यासंदर्भातला लेख लिहीला होता, जो १९३० मध्ये पुन्हा छापण्यात आला होता.

ली चिंग यूएन हे २०० वर्षांचे झाल्याचंही १८७७ मध्ये चीन सरकारनं आपल्या दप्तरी नोंदवलं होतं. तसंच शाही घराण्यानं त्यांचा सत्कारही केला होता. वयाच्या दहाव्या वर्षी ली चिंग यूएन यांनी वनऔषधींचा विक्रेता म्हणून काम करायला सुरूवात केली. ली चिंग यूएन हे डोंगर रांगांमध्ये जाऊन वनऔषधी गोळा करत असत. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत त्यांनी हा व्यवसाय केला आणि ते डोंगरांमध्ये जाऊन त्यांना वनऔषधींची चांगली माहिती झाली.



आहार काय घ्यावा आणि तंदुरूस्त कसं राहावं यासंबंधी त्यांनी काटेकोर पथ्य पाळायला सुरूवात केली. लिंग ची यूएन यांचा जन्म १६७७ साली चीनच्या शेजिया शहरात झाला होता. आपल्या संपूर्ण आयुष्यात ली चिंग यूएन यांनी २३ वेळा विवाह केला आणि त्यांना २०० मुलं झाली. ली चिंग यांनी वनऔषधी देणारा डॉक्टर म्हणूनही ख्याती मिळवली. ६ मे १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय २५६ वर्षे होतं.





आपल्या १० वर्षे ते ४० वर्षांच्या वयात ली चिंग यांनी कान्सू, शन्सी, तिबेट, अनाम, सिआम आणि मंचुरिया इथल्या पर्वतरांगा पालथ्या घातल्या होत्या आणि तिथल्या वनऔषधींची त्यांना खडान् खडा माहिती होती. ली चिंग यांना मार्शल आर्टचीही माहिती होती. त्यांनी जवळपास २५ पिढ्या आपल्या डोळ्यासमोर मोठ्या होताना पाहिल्या आहेत. ली चिंग यूएन यांच्याबाबत हा लेख ‘स्टीव्हन बॅनक्राझ’ यांनी लिहीला आहे आणि ‘स्पिरिट अँड मेटा फिजिक्स’ या संस्थेनं हा लेख प्रकाशित केला आहे.

मृत्यूशय्येवर असताना काय म्हटले होते ली चिंग?

मन शांत ठेवा, कबुतराप्रमाणे चाला, कासवासारखं बसा आणि कुत्र्यासारखं झोपा तुमचं आयुष्य वाढेल असं ली चिंग मृत्यू शय्येवर असताना म्हटले होते. आहाराची काटेकोर पथ्य पाळणं हेदेखील माझ्या दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे असंही ली यांनी म्हटलं आहे. मी या जगात जन्माला आलो आणि मला हवं ते सगळं केलं असंही ली यांनी आपल्या शेवटच्या क्षणी म्हटलं होतं.

ली चिंग यूएन यांची संपूर्ण माहिती विकिपीडियावरही उपलब्ध आहे. १९०८ मध्ये या दीर्घायुषी माणसावर एक पुस्तकही लिहीलं गेलं. मार्शल आर्ट ही कला त्यांनी ज्या ज्या शिष्यांना शिकवली ते कायम निरोगी राहिले. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकदाही अॅलोपथी औषध घेतलं नाही, दारू, तंबाखू किंवा इतर व्यसनांना स्पर्शही केला नाही. तसंच आहारावर कायम नियंत्रणही ठेवलं असंही ली चिंग यूएन यांनी म्हटलं आहे. एखाद्या माणसाचं वयोमान हा चर्चेचा विषय नसतो. मात्र ली चिंग यूएन यांचं २५६ वर्षांचं वय हेच आता चर्चेचा विषय ठरलं आहे.

NATIONAL SECURITY - Indian Navy: Ensuring secure seas for a resurgent na...

NATIONAL SECURITY - ITBP: वैली ऑफ़ गॉड्स

NATIONAL SECURITY: BSF in Mysterious Rann of Kutch (रण का रहस्य)

MISSION KASHMIR - " RAKSHAK" THE REAL HEROES OF INDIA

NATIONAL SECURITY: सीमा सुरक्षा बल: पूर्वी सरहद | BSF in Eastern Theatre

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...