Pages

Thursday, October 6, 2016

बंद मूठ

*बंद मूठ*
*प्रवीण दवणे*
भाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, *"मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात? काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात?"*
आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी वळलेल्या होत्या; पण हा प्रश्न मला कधीच पडलेला नव्हता. छोट्या रुचिरला मात्र मात्र तो पडला. बहीण म्हणाली, "कालपासनं मला विचारून भांडावलंय, म्हणून मी तुझ्याकडे पाठवलंय. दे आता उत्तर! शेजारच्या घरात नवं बाळ आलंय - स्वारीनं पाहिलं आणि हेच विचारतोय!"
भाच्यानं माझा चांगलाच 'मामा' केला होता; पण त्याला देण्यासाठी एका उत्तराचा विचार करताना नवाच विचार तरारून आला. म्हटलं, *"अरे, देवाच्या घरून जेंव्हा बाळ येतं ना पृथ्वीवर, तेंव्हा देव प्रत्येकाच्या हातात एकेक नवी गंमत देतो न् म्हणतो, याच्या साहाय्याने स्वतः आनंद घे आणि जगाला आनंद दे. बघ, कुणाच्या हातात सुरेल गळ्याचा खाऊ, कुणाला तबला वाजवण्याची कला, कुणाच्या हाती उत्तम भाषणाची कुवत, कुणाला खेळाचा छंद, कुणाला झाडंच लावण्याची आवड, कुणाला कवितेचे पंख! एक ना दोन! जितके हात, तितक्या प्रकारचा खाऊ देवाकडे आहे, बेटा! देव म्हणतो, ही कला देतोय - मूठ घट्ट कर व पृथ्वीवर जा. हळूच उघडून बघ नि ओळख, स्वतःकडे कुठली कला आहे ते!"*
"म्हणजे सर्वांकडे एखादी कला असतेच?"
*"परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवीत नाही. शहाण्या मुलांना वेळीच कळतं न् ते त्या कलेच्या, छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात!"*
"अस्सं! माझ्याही हातात कलेचा खाऊ दिला असणारच देवानं!"
"निश्चितच. चल आत्तापासून स्वतःत कुठली कला, कुठली क्षमता आहे हे शोधायला सुरुवात कर!"
*आपल्याही भोवती असे पुतणे, भाचे असतीलच! त्यांच्या बंद मुठीतल्या क्षमतांचं भान देणारे मामा - काका - आई - बाबा होता येणं हीही कलाच! मूठ उघडून बघा तरी...*

Wednesday, October 5, 2016

ज्ञानरचनावाद - संपूर्ण संकल्पना

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jOGZROGRhT1JKZmc/view?usp=इगdrivesdk

शालेय नवोपक्रम

*शालेय नवोपक्रम*


नवोपक्रम व्याख्या

📚📚📚📚📚📚📚

पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळा, नाविण्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशिल उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय

☘☘☘☘☘☘☘☘

नवोपक्रम कशासाठी?

 📚वेगळ्या वाटेने चालणार्‍या, आगळा वेगळा विचार करणार्‍या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याकरीता संधी मिळते

📚विद्यार्थांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली समस्या स्व—प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी.

📚 धडपडणार्‍या व उत्कृष्टतेचा ध्यास असनार्‍या  शिक्षकाने सातत्याने  स्व—प्रेरना मिळवित राहण्याकरीता

💐💐💐💐💐💐💐💐

नवोपक्रम करणार्‍या शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत

👇🏾👇🏾

♨कल्पकता♨चिकाटी

♨ सर्जनशीलता♨सकारात्मक दृष्टीकोण♨चिकीत्सक♨स्वयंप्रेरणा

🌴🌴🌴🌴🌴🌴

नवोपक्रम निकष📝📝

👇🏾👇🏾

१)नवीनता


अ)कालसापेक्ष नवीनता

ब)स्थलसापेक्ष नवीनता

क)व्यक्तीसापेक्ष नवीनता


२)यशस्वीता


३)उपयुक्तता

❇❇❇❇❇❇❇❇❇


नवोपक्रम कार्यवाही टप्पे

👇🏾👇🏾👇🏾

१)समस्यांची यादी.


२)कारणे.


३)शीर्षक.


४)उद्दिष्टे.


५)नियोजन.


६)कार्यवाही.


७)माहितीचे संकलन.


 ८)यशस्वीता.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻


नवोपक्रम अहवाल लेखनाची मुद्दे

👇🏾👇🏾

१)शीर्षक

२)नवोपक्रमाची माझी गरज

३)नवोपक्रमाची माझी उद्दिष्टे

४)नवोपक्रमाचे नियोजन

५)उपक्रमाची कार्यवाही

६)यशस्वीता

७)समारोप

८)संदर्भग्रंथ व परिशिष्टे

९)अहवाल लेखनाचे फायदे

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

नवोपक्रम यादी 👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾➖➖➖➖➖➖➖

१.जो दिनांक तो पाढा

२.पेपरलेस प्रशासन

३.शब्द संग्रह वाढवणे

४.प्रोजेक्ट ई लर्निंग

५. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे

६.   दिवस नवा, भाषा नवी

७ पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती


८.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह

९.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण

१०.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती

११.. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक करणे

१२रद्दीतुन ग्रथालय

१३. एक तास राष्ट्रासाठी

१४.  भाषिक प्रयोगशाला

१५.  पर्यावरण संरक्षक दल

१६. सौरऊर्जा जागरुकता व वापर

१७.  विषय खोली

१८. आम्ही स्वच्छता दूत

१९  तंबाखु मुक्त शाळा

१७.  प्लास्टिक मुक्त शाळा

२०.  विज्ञान भवन

२१.  मैत्री अंकाची , संख्यांची

२२.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन करणे

२३.  एक दिवस गावासाठी, समाजाकरीता

२४  विषय कोपरा - प्रभावी माध्यम

२५.  विशेष विद्यार्थी कोपरा

२६  पुस्तक भिशी

२७.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प

२८.  स्वच्छता  दूत

२९.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा.

३१.  हरित शाळा.

३२.  प्रदूषण हटवा अभियान राबवणे

३३.  चालता बोलता प्रश्न मंजुशा घेणे.

३४. माझा मित्र परिवार

३५. माझे पूर्व ज्ञान

३६. शब्दगंगा

३७. कौन बनेगा ज्ञानपती

३८. वर्ड पॉट

३९.सुंदर हस्ताक्षर मोहिम

४०.  संख्यावरील क्रिया - एक छंद

४१.  प्रश्नमंजूषा

४२.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास

४३.  बालआनंद मेळावे

४४.  सातत्य पूर्ण उपस्थिती

४५.  पुस्तक जत्रा

४६.  फन एंड लर्न

४७.  शंकापेटी

४८. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध

४९.  रोपवाटिका निर्मिती

५०. एक तास इंटरनेट

५१  गांडूळ खत निर्मिती

५२  आजचा  बेस्ट मुलगा

५३.  एक तास मुक्त अभ्यास

५४. समस्या व सूचना पेटी

५५. किशोरवयीन मुलींचे शिक्षण

५६.  लोकसंख्या शिक्षण

५७.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव

५८.  वाचाल तर वाचाल

५९.  बिखरे मोती

६०. पुस्तका करीता एक दिवस

६१.  गावातील विशेष व्यक्तींच्या मुलाखती.

६२.  बालसभा आयोजन

६३.  माझ्या गावचा इतिहास

६४.  परिसरातील भूरुपांची ओळख

६५.  विविध शिबीरांतून विविध प्रकारची यादी करणे.

६६.औपचारीक गप्पा

६७.कथालेखन

६८.कविता लेखन

६९.वाढदिवस ,दिनविशेष च्या माध्यमातुन नैतिक मुल्य रुजवणे

७०.परीसरातील बिया गोळा करणे

७१.अप्रगत करीता ओंजळीणे ग्लास भरणे

७२.प्राण्यांची यादी तयार करणे

७३. बाजार भेट

७४. दुकानातील, बाजारातील,ई. वस्तुंची यादी तयार करणे

७५. टाकावू पासुन टिकावू वस्तु तयार करणे

७६. नाणी नोटांचा संग्रह करणे

७७.एक झाड लावू मिञा.

७८.आपले सण आपली झाडे

७९.मनोरंजनात्मक खेळ

८०.सांस्कृतीक कार्यक्रम

८१.माता प्रबोधन

८२.आनंद दायी शिक्षण

८३.बालमंद्वारे व्यक्तीमत्व विकास

८४.औषधी वनस्पतीची ओळख

८५.गितांचा संग्रह करणे.

८६.निबंध स्पर्धा

८७.वत्तृत्व स्पर्धा

८८.निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे

८९.कागदी पिशव्या तयार करणे

९०.शोभिवंत झाडाच्या कुंड्या तयार करणे.

सत्याचे प्रयोग (अात्मकथा) - महात्मा गांधी

https://drive.google.com/file/d/0B3HCa04kgm8jb2Z6ek40TmR3R28/view?usp=drivesdk

प्रगत शाळेनंतर पुढे काय.....?

*प्रगत शाळेनंतर पुढे काय............?*
*आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करण्याची  प्रत्येक जिल्ह्यतील शंभर शाळाना संधी*
मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, श्री नंदकुमार साहेब यांची राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेस भेट देऊन आता शाळाना आंतरराष्ट्रीय होण्याची संधी देणार असल्याचे सांगितले.
1) महाराष्ट्रातील शाळांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची इच्छा बाळगावी व ही क्षमता महाराष्ट्रातील शाळांमध्ये असल्याचा विश्वास. दर्जा सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांनी PISA, PULSE व STEAM यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी चमकावेत.
2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा करीत असतांना पहिल्या दहा क्रमांकामध्ये शाळा आणण्याचे ध्येय उराशी बाळगण्याचे आवाहन. हिमाचल प्रदेश व तामिळनाडू यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ७४ वा क्रमांक मिळविला असल्याचे प्रतिपादन. महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय दर्जाची योग्यता संपादन करण्याचे आवाहन.
3) काही मुठभर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कसे देता येईल यावर विचार करण्याचे आव्हान. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा सर्व बालकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन.
4) CSR च्या माध्यमातून शाळा आंतरराष्ट्रीय करण्याची दूरदृष्टी मा.नंदकुमार साहेबांनी दिली. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या विदेशी शाळांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय स्पर्धा करण्यासाठी अधिक पटांच्या शाळांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन.
5) राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था राबवीत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती मा.नंदकुमार साहेबांनी घेतली. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीमध्ये मदत होण्यासाठी मराठी-इंग्रजी शब्दकोषाच्या वापरास प्रोत्साहन देण्याची सुचना. संस्था राबवीत असलेल्या Spoken English project च्या यशाबद्दल मा. नांदकुमार साहेबांनी सर्वांचे अभिनंदन केले. पालकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व बालकांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संभाषण करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचा पुनरुच्चार.
6) Continuous Professional Development साठी शिक्षकांच्या कार्यगटांची (Teachers’ Activity Groups) स्थापना व कार्यपद्धती, व यामध्ये ब्रिटीश कौन्सिल व राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था यांची भूमिका मा.नंदकुमार साहेबांनी समजून घेतली. TEJAS प्रकल्पांतर्गत TAG मधील विविध कृती,उपक्रम मा.साहेबांनी समजून घेतले व शिक्षकांचा व्यावसायिक विकास शाश्वत कसा होईल व त्याद्वारे विद्यार्थी विकास कसा होईल याकडे लक्ष वेधले.
7) पालकांच्या इंग्रजीबाबत अपेक्षा पूर्तीसाठी विविध उपक्रम व चाचण्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्यास कशा मदत करू शकतील याबद्दल विचार करून अंमलबजावणी करण्याची व्हावी
या वेळी बैठकीला मा भाऊसाहेब तुपे शिक्षण  उपसंचालक मा रहीम मोगल शिक्षणाधिकारी प्रा, मा भगवान सोनवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक,मा MK देशमुख
SIEM मधील सर्व अधिकारी कर्मचारी आणि SARPs उपस्थित होते.
या वेळी siem मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण डॉ उज्ज्वल करवंदे
यांनी केले
डॉ सुभाष कांबळे
संचालक,राज्य आंग्ल भाषा औरंगाबाद

ज्ञानरचनावाद फरशीवरील फोटो





















Tuesday, October 4, 2016

साळु व साप

📝🍃📝🍃📝🍃📝🍃
➖➖➖➖➖➖
     *साळु व साप*
〰〰〰〰〰〰
*मला आपल्या बिळात जागा द्याल तर* मी तुमची फार आभारी होईन.' अशी एका साळूने सापांना विनंती केली.
          सापांनी अविचारांनी ती तिची विनंती मान्य करून तिला आपल्या बिळात येऊ दिले. ती आत शिरताच तिची काट्यासारखी तीक्ष्ण पिसे अंगास रुतून सापांना फार दुःख झाले.
          मग ते तिला म्हणाले, 'साळूबाई, आता तुम्ही येथून जाल तर बरं होईल. तुमचा हा उपद्रव आमच्याच्याने सहन करवत नाही.' हे ऐकताच साळू म्हणाली, 'मी का जाईन ? मला तर ही जागा फार आवडली, ज्यांना ती आवडत नसेल त्यांनी पाहिजे तर खुशाल जावं.'
〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *काही लोक इतके दुष्ट असतात की एकदा त्यांना दुसर्‍याच्या घरी आश्रय मिळाला की हळूहळू त्याला घरातून बाहेर काढून ते घर ते बळकावून बसतात.*
➖➖➖➖➖➖

Monday, October 3, 2016

बैल आणि चिलट

🌻*बैल आणि चिलट*🌻

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!

🌿🌿तात्पर्य🌿🌿
👉*काही लोकांना आपण फार मोठे आहोत असे वाटते. पण लोक त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत*.

बेअरफुट काॅलेज, तिलोनिया



जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली.

त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला.

त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती.

‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

Sunday, October 2, 2016

मोहनदास करमचंद गांधी

*मोहनदास करमचंद गांधी*

जन्म: ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत

मृत्यू: जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, भारत

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस

पुरस्कार: टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती

प्रमुख स्मारके: राजघाट

धर्म: हिंदू

प्रभाव: लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले

पत्नी नाव: कस्तुरबा गांधी
अपत्ये: हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास


मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.         नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

 १९१५ मध्ये असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली, गांधीजींची "अर्धनग्न फकीर" म्हणून कुचेष्टा केली होती. (It is alarming and also nauseating to see Mr. Gandhi, a seditious Middle Temple lawyer of the type well-known in the East, now posing as a fakir, striding half naked up the steps of the Viceregal palace to parley on equal terms with the representative of the King-Emperor.) त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.

२ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.

गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगितावादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...